शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

२००० कोटींचे चौपदरीकरण

By admin | Updated: June 30, 2016 04:00 IST

महामार्ग क्र. २११ च्या औरंगाबाद ते तेलवाडी दरम्यानच्या ८७ किमी पट्ट्याचे चौपदरीकरण करण्याच्या सुमारे २,१०० कोटी रुपये खर्चाच्या कामाला बुधवारी मंजुरी मिळाली.

नवी दिल्ली : धुळे आणि सोलापूर या दोन शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ च्या औरंगाबाद ते तेलवाडी दरम्यानच्या ८७ किमी पट्ट्याचे चौपदरीकरण करण्याच्या सुमारे २,१०० कोटी रुपये खर्चाच्या कामाला बुधवारी मंजुरी मिळाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबीविषयक समितीने ही मंजुरी दिली. चौपदीरणाचे हे काम राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेच्या चौथ्या टप्प्यातील एक काम म्हणून केले जाईल. हे काम ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर खासगी कंत्राटदाराकडून करून घेतले जाईल व त्याचा खर्च टोल लागू करून वसूल केला जाईल, असे या निर्णयानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकात नमूद करण्यात आले आहे. मंजूर केल्या गेलेल्या या रकमेतून प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाखेरीज जमीन संपादन करणे व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे यासह बांधकामापूर्वीची कामेही होतील.महामार्गाच्या या चौपदरीकरणामुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासास हातभार लागेल व खासकरून औरंगाबाद ते तेलवाडी या पट्ट्यात होणारी अवजड वाहनांची कोंडी दूर होऊन वाहतुकीचा वेळ व खर्च कमी होईल. रस्ते वाहतूक सुलभ झाल्याने त्या भागातील आर्थिक-सामाजिक जीवनमान उंचावेल, अशी सरकारची अपेक्षा आहे.रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार महामार्गाच्या या कामामुळे स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. एक किमी महामार्गाचे बांधकाम करण्यासाठी साधारणपणे ४,०७६ मनुष्यदिन लागतात. या हिशेबाने या कामामुळे ३.५४ लाख मनुष्यदिन एवढा रोजगार स्थानिकांना उपलब्ध होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)