शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

चार राज्ये दुष्काळाच्या छायेत

By admin | Updated: July 7, 2014 04:15 IST

मान्सून दडी मारून बसल्याने यंदा महाराष्ट आणि देशातील आणखी तीन प्रमुख राज्यांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे़

नवी दिल्ली : मान्सून दडी मारून बसल्याने यंदा महाराष्ट आणि देशातील आणखी तीन प्रमुख राज्यांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे़ हीच स्थिती कायम राहिल्यास कृषी उत्पन्न घटण्यासोबतच पाणी आणि विजेच्या गंभीर संकटाला तोंड द्यावे लागू शकते़एका वृत्तसंस्थेने देशभरातील स्थितीचा अंदाज घेऊन एक अहवाल जारी केला आहे़ त्यानुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक यासारख्या राज्यांत दुष्काळसदृश स्थिती आहे़ पावसाने हुलकावणी दिल्याने अद्यापही अनेक भागांतील पेरण्या रखडल्या आहेत़ हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात सरासरीच्या ४३ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे़ मान्सून अनुकूल नसल्याच्या वृत्ताने आधीच खाद्यान्न, भाजीपाला व फळांच्या किमती वधारल्या आहेत़ येत्या दिवसांत या किमती आणखी भडकण्याची चिन्हे आहेत़ राज्य सरकारांनी दुष्काळ जाहीर केला तर शेतकऱ्यांना सवलतीने डिझेल आणि बियाणे देण्यावर केंद्र सरकारला अगत्याने विचार करावा लागेल. याशिवाय महागाई नियंत्रणासाठीही कसरत करावी लागेल. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाअभावी जलसाठ्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील जलशयांमध्ये फार कमी जलसाठा उरला आहे़ स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेने स्थिती आणखी गंभीर राहण्याचे सूतोवाच केले आहे़ उत्तर पश्चिम भारतात दुष्काळाची ८० टक्क्यांपेक्षा अधिक शक्यता असल्याचेही स्कायमेटने म्हटले आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)