शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
3
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
4
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
5
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
6
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
7
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
8
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
9
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
10
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
11
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
12
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
13
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
14
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
15
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
16
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
17
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
18
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
19
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
20
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी

चार राज्ये दुष्काळाच्या छायेत

By admin | Updated: July 7, 2014 04:15 IST

मान्सून दडी मारून बसल्याने यंदा महाराष्ट आणि देशातील आणखी तीन प्रमुख राज्यांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे़

नवी दिल्ली : मान्सून दडी मारून बसल्याने यंदा महाराष्ट आणि देशातील आणखी तीन प्रमुख राज्यांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे़ हीच स्थिती कायम राहिल्यास कृषी उत्पन्न घटण्यासोबतच पाणी आणि विजेच्या गंभीर संकटाला तोंड द्यावे लागू शकते़एका वृत्तसंस्थेने देशभरातील स्थितीचा अंदाज घेऊन एक अहवाल जारी केला आहे़ त्यानुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक यासारख्या राज्यांत दुष्काळसदृश स्थिती आहे़ पावसाने हुलकावणी दिल्याने अद्यापही अनेक भागांतील पेरण्या रखडल्या आहेत़ हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात सरासरीच्या ४३ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे़ मान्सून अनुकूल नसल्याच्या वृत्ताने आधीच खाद्यान्न, भाजीपाला व फळांच्या किमती वधारल्या आहेत़ येत्या दिवसांत या किमती आणखी भडकण्याची चिन्हे आहेत़ राज्य सरकारांनी दुष्काळ जाहीर केला तर शेतकऱ्यांना सवलतीने डिझेल आणि बियाणे देण्यावर केंद्र सरकारला अगत्याने विचार करावा लागेल. याशिवाय महागाई नियंत्रणासाठीही कसरत करावी लागेल. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाअभावी जलसाठ्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील जलशयांमध्ये फार कमी जलसाठा उरला आहे़ स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेने स्थिती आणखी गंभीर राहण्याचे सूतोवाच केले आहे़ उत्तर पश्चिम भारतात दुष्काळाची ८० टक्क्यांपेक्षा अधिक शक्यता असल्याचेही स्कायमेटने म्हटले आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)