शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

भाजपचे आणखी चार, काँग्रेसचे १० उमेदवार निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 04:24 IST

भाजपने अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, जे.पी. नड्डा यांच्यासह ८ केंद्रीय मंत्र्यांना राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर आता पक्ष राज्यसभेच्या ५८ जागांसाठी होणाºया निवडणुकीसाठी दुसºया टप्प्यातील यादी तयार करीत आहे. या यादीत महासचिव सरोज पांडे, डॉ. अनिल जैन यांच्यासह प्रवक्ते अनिल बलुनी आणि जीव्हीएल नरसिंह राव यांचे नाव समाविष्ट केले जाऊ शकते.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली - भाजपने अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, जे.पी. नड्डा यांच्यासह ८ केंद्रीय मंत्र्यांना राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर आता पक्ष राज्यसभेच्या ५८ जागांसाठी होणाºया निवडणुकीसाठी दुसºया टप्प्यातील यादी तयार करीत आहे. या यादीत महासचिव सरोज पांडे, डॉ. अनिल जैन यांच्यासह प्रवक्ते अनिल बलुनी आणि जीव्हीएल नरसिंह राव यांचे नाव समाविष्ट केले जाऊ शकते. तथापि, काँग्रेसने राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कुमार केतकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय अन्य ९ उमेदवार जाहीर केले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने या चार नेत्यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित केले आहे. याशिवाय अशोक वाजपेयी यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते. हरियाणा आणि छत्तीसगडचे प्रभारी महासचिव अनिल जैन हे पक्षातील दिग्गज नेत्यात गणले जातात, तर राजस्थानातून पक्षाने किरोडीलाल मीणा यांना संधी देण्याचे ठरविले आहे. त्यांनी आपल्या राष्ट्रीय जनतांत्रिक पार्टीचे विलीनीकरण भाजपत केले आहे. महाराष्ट्राच्या प्रभारी महासचिव सरोज पांडे यांनाही छत्तीसगडच्या एकमेव जागेवरून उमेदवारी दिली जाऊ शकते.१६ राज्यांत निवडणुकाज्या जागांवर निवडणुका होणार आहेत त्यात उत्तर प्रदेशातील १०, महाराष्ट्र आणि बिहारमधील ६, मध्यप्रदेशातील ५ आणि आंध्र, ओडिशा तथा राजस्थानच्या तीन-तीन जागा आहेत. याशिवाय अन्य काही राज्यांत राज्यसभेच्या जागा रिक्त होत आहेत. राज्यसभेत आपल्या जागा वाढविण्यासोबतच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणिते जुळविली जात आहेत.७ केंद्रीय मंत्र्यांसह८ उमेदवारांची घोषणाभाजपने आतापर्यंत ज्या ८ जणांची नावे जाहीर केली त्यात अर्थमंत्री अरुण जेटलींना उत्तर प्रदेशातून, मध्यप्रदेशातून थावरचंद गेहलोत व धर्मेंद्र प्रधान, गुजरातेतून मनसुखभाई मंडाविया व पुरुषोत्तम रुपाला, आरोग्यमंत्री जगत प्रसाद नड्डा हिमाचल प्रदेशातून, बिहारमधून रविशंकर प्रसाद यांना उमेदवार बनविण्यात आले आहे.एप्रिल आणि मे महिन्यात राज्यसभेच्या ज्या जागा रिक्त होणार आहेत त्यांच्यासाठी २३ मार्च रोजी मतदान होईल व २६ मार्चपर्यंत निकाल जाहीर होतील. त्यासाठी १२ मार्चपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. १५ मार्च रोजी अर्ज मागे घेता येईल.उमेदवारांची नावेनारायण राणे महाराष्ट्रव्ही. मुरलीधरन महाराष्ट्रसरोज पांडे छत्तीसगढअनिल बलुनी उत्तराखंडकरोडीलाल मीणा राजस्थानलेफ्ट. जी.डी.पी. वत्स हरियाणाअजय प्रताप सिंह मध्य प्रदेशकैलाश सोनी मध्य प्रदेशअशोक वाजपेयी उत्तर प्रदेशविजय पाल सिंह तोमर उत्तर प्रदेशसकल दीप राजभर उत्तर प्रदेशकांता करदम उत्तर प्रदेशडॉ. अनिल जैन उत्तर प्रदेशजी.व्ही.एल. नरसिंहराव उत्तर प्रदेशहरनाथसिंह यादव उत्तर प्रदेशराजीव चंद्रशेखर कर्नाटकसमीर उरोव झारखंडकाँग्रेसचे उमेदवारकुमार केतकर महाराष्ट्रनारनभाई राथवा गुजरातअमी याज्ञिक गुजरातधीरजप्रसाद साहू झारखंडडॉ. एल. हनुमंथय्या कर्नाटकडॉ. सय्यद नासीर हुसेन कर्नाटकजी. सी. चंद्रशेखर कर्नाटकराजमानी पटेल मध्य प्रदेशपोरिका बलराम नायक तेलंगणाअभिषेक मनू सिंघवी पश्चिम बंगाल

टॅग्स :ElectionनिवडणूकRajya Sabhaराज्यसभा