शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांचा शपथविधी

By admin | Updated: May 14, 2016 03:10 IST

अजय खानविलकर, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एल. नागेश्वर राव या चार न्यायाधीशांना शुक्रवारी सकाळी सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली.

नवी दिल्ली : अजय खानविलकर, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एल. नागेश्वर राव या चार न्यायाधीशांना शुक्रवारी सकाळी सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. आता सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह न्यायाधीशांची एकूण संख्या २९ झाली आहे. उपरोक्त चार न्यायाधीश अनुक्रमे मध्य प्रदेश, अलाहाबाद, केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. न्या. राव हे माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल राहिले आहेत. त्यांना बारमधून पदोन्नती देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या सरन्यायाधीशांसह ३१ आहे. आर. बानूमती ह्या एकमेव महिला न्यायाधीश आहेत. गेल्यावर्षी आॅक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायदा (एनजेसीए) रद्द केल्यानंतर कॉलेजियमच्या शिफारशींनुसार या न्यायाधीशांना पदोन्नतीचा पहिला मान मिळाला आहे. यावर्षी पाच न्यायाधीश निवृत्त होत आहेत. ए.आर. दवे १८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होतील. सरन्यायाधीश ठाकूर यांची कारकीर्द ३ जानेवारी २०१७ रोजी संपत आहे. (वृत्तसंस्था)न्या. खानविलकर २९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश तर ८ एप्रिल २००२ पासून कायम न्यायाधीश बनले होते. ते २४ नोव्हेंबर १३ रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले. त्याआधी ते ४ एप्रिल १३ पासून हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. न्या. चंद्रचूड ३१ आॅक्टोबर १३ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले. १९९८ ते २००० या काळात ते अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते.न्या. भूषण १९७९ मध्ये उत्तर प्रदेश बार कौन्सिलचे वकील बनले. २४ एप्रिल २००१ रोजी ते अलाहाबाद उच्च न्यायालयात कायम न्यायाधीश नियुक्त झाले. उच्च न्यायालयीन सेवा समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांनी २६ मार्च २०१५ रोजी केरळच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली होती. आंध्र प्रदेशचे वरिष्ठ वकील राहिलेले न्या. राव यांनी तीन टर्म अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदाची जबाबदारी सांभाळली. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.२०१४ मध्ये मोदी सरकार आल्यापासून बारकडून शिफारस झालेले एल. नागेश्वर राव हे चौथे न्यायाधीश आहेत. यू. यू. ललित आणि आर.एफ़. नरिमन यांची नियुक्तीही बारकडूनच झाली. माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रमण्यम यांची शिफारस बारने केली असता सरकारने त्यांच्या नियुक्तीची फाईल परत पाठविली होती.