शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

चार घुसखोर अतिरेक्यांना कंठस्नान

By admin | Updated: September 12, 2016 04:37 IST

शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या दौऱ्यानंतरही काश्मीर धुमसतच असून, रविवारी अनेक घटनांनी खोऱ्यातील अशांततेत भर पडली.

श्रीनगर/नवी दिल्ली : शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या दौऱ्यानंतरही काश्मीर धुमसतच असून, रविवारी अनेक घटनांनी खोऱ्यातील अशांततेत भर पडली. नियंत्रणरेषेवरून भारतात घुसणाऱ्या चार अतिरेक्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. पुंछमध्ये अतिरेक्यांसोबत चकमकीत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला व अधिकाऱ्यासह दोघे जखमी झाले. पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल च दगडफेक करणारे आंदोलक यांच्यातील हिंसाचारात अनेक जखमी झाले. दरम्यान, गेल्या आठवड्यात पोलीस गोळीबारात जखमी झालेल्या एका युवकाचा मृत्यू झाल्याने, ताज्या हिंसाचारातील मृतांची संख्या ७८ वर पोहोचली. नियंत्रणरेषेजवळ घुसखोरी करण्याचा अतिरेक्यांचा डाव हाणून पाडत, सैन्याने चार अतिरेक्यांना रविवारी ठार मारले. नौगाम भागात घुसखोरीचा हा प्रयत्न उधळून लावला, तर अन्य एका भागात तंगधरमध्ये दुसरा प्रयत्न हाणून पाडला आणि तिसरी घटना गुरेज भागात घडली. सैन्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘नौगाम भागात सीमारेषेजवळ सैनिकांना संशयास्पद हालचाली दिसून आल्या. याच वेळी अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलानेही या अतिरेक्यांना लक्ष्य केले. या चकमकीत चार अतिरेकी मारले गेले. घटनास्थळावरून स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत.’ आठवडाभरात परिस्थिती सुरळीत कराकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी रविवारी सायंकाळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काश्मीरमधील ताज्या परिस्थितीचा आढावा घेतला. काश्मिरी युवकांना हिंसाचारासाठी चिथावणी देणाऱ्यांवर सुरक्षा दलांनी लक्ष केंद्रित करावे आणि एका आठवड्यात खोऱ्यातील परिस्थिती सुरळित होऊन, गेले दोन महिने बंद असलेले उद्योग-व्यापार, तसेच शाळा-कॉलेजे पुन्हा सुरू होऊन परिस्थिती सुरळीत होईल, यासाठी पावले उचलावीत, असे निर्देश त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.‘पेलेट’चा पुन्हा वापरदक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दगडफेक करणारे आंदोलक यांच्यात झालेल्या हिंसाचारात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, करिमाबाद व आजूबाजूच्या भागात राहणारे हजारो नागरिक रात्रीच्या छापेमारीच्या विरोधात रविवारी सकाळी रस्त्यावर उतरले.सलग ६५व्या दिवशी निर्बंध काश्मिरातील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या ७८ वर पोहोचली आहे. ५ आॅगस्टला पोलीस गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला, तर अन्य एका जखमीचाही मृत्यू झाला. श्रीनगरच्या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रविवारी संचारबंदीसदृश प्रतिबंध लावण्यात आले आहेत. काश्मिरात सलग ६५ व्या दिवशीही जनजीवन विस्कळीत आहे.