शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

कर्नाटक सत्तावाटपाचा २४ तासांत फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 02:26 IST

कुमारस्वामी आज राहुल गांधींना भेटणार

बंगळुरू/नवी दिल्ली : कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला जवळपास तयार झाला असून, त्यानुसार जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे १३ मंत्री व काँग्रेसचे २0 मंत्री बुधवारी शपथ घेतील, हे निश्चित झाले आहे. शपथविधीनंतर आपण २४ तासांतच बहुमत सिद्ध करू, असा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी १५ दिवसांचा अवधी दिला असला तरी ते तोपर्यंत थांबणार नाहीत, असा त्याचा अर्थ आहे.फॉर्म्युला नक्की झाला असला तरी कुमारस्वामी उद्या, सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी तसेच यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी राहुल गांधी यांच्याशी त्यावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित आहे. कुमारस्वामी हेही उद्या स्व. राजीव गांधी यांच्या स्मारकाला भेट देतील व त्यांना आदरांजली अर्पण करतील, असे सांगण्यात येते. कर्नाटकातील काँग्रेसचे नेतेही उद्याच दिल्लीत पोहोचत आहेत. हा फॉर्म्युला गुलाम नबी आझाद, अशोक गहलोत व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून ठरेल आणि त्याला अंतिम स्वरूप राहुल गांधी देतील, असे समजते.कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणे नक्की आहे. तसेच काँग्रेस फोडण्याची येडियुरप्पांची खेळी उधळून लावणारे डी. के. शिवकुमार यांचेही मंत्रिमंडळातील स्थान नक्की आहे. कुमारस्वामींच्या पक्षाकडे वित्त खाते, तर काँग्रेसकडे गृह खाते राहील, असे सध्याचे चित्र आहे. हीच दोन अतिशय महत्त्वाची खाती मानली जातात. काँग्रेसकडून अधिकाधिक लिंगायत आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असा अंदाज असून, येडियुरप्पा यांचे भविष्यातील डाव यशस्वी होऊ नयेत, यासाठीच हे केले जाईल.बसपा, एक अपक्ष व एक मुस्लीम आमदारही सरकारमध्ये असेल.कुमारस्वामींनी बहुमत सिद्ध केले तरी भाजपा सरकार पाडण्याचा व आमदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न करेल, असे दोन्ही पक्षांना वाटत आहे. त्यामुळे अधिकाधिक आमदारांना खूष ठेवणे, हे कुमारस्वामी यांच्यापुढील आव्हान असेल. त्यासाठी विविध महामंडळांवर आमदारांच्या लवकर नियुक्त्या करणे आणि त्यासाठी दोन्ही पक्षांत मतैक्य घडवून आणणे गरजेचे आहे, असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले.सरकार चालवणे, ही आमची जबाबदारीकाँग्रेसच काही काळाने हे सरकार पाडेल, असे भाजपा नेते सांगत आहेत. पण सरकारने आपला काळ पूर्ण करावा, असे आमचे प्रयत्न राहतील, असे सांगून काँग्रेस नेता म्हणाला की, सध्या भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी राहुल गांधी प्रयत्नशील आहेत. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुकाही आहेत. यामुळे सरकार पाडण्याचे प्रयत्न वा सरकार पडेल, अशी कृती काँग्रेसकडून होणार नाही.अडीच वर्षांचा फॉर्म्युला नाहीच : कुमारस्वामीमुख्यमंत्रीपद अडीच वर्षे कुमारस्वामी यांच्याकडे राहील आणि नंतर ते काँग्रेसकडे जाईल, अशा बातम्या शनिवारपासून पसरल्या होत्या. पण तसे घडणार नाही आणि आपणच पूर्ण काळ मुख्यमंत्री राहू, असे कुमारस्वामी यांनी व काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले.विरोधी ऐक्याचे प्रदर्शनआंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, पंजाब, पुडुच्चेरी, सिक्किम येथील मुख्यमंत्र्यांना शपथविधीचे निमंत्रण त्यासाठीच दिले आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार, फारुख अब्दुल्ला, मायावती, मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ओमर अब्दुल्ला, तसेच दोन्ही डावे पक्ष आणि भाजपाविरोधात असलेले सर्व प्रादेशिक पक्षांचे नेते यांना शपथविधीसाठी निमंत्रित केले जाणार आहे. आम्ही भाजपाविरोधात एकत्र आलो आहोत, असे चित्र त्यातून निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८kumarswamyकुमारस्वामी