शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Wayanad Congress: राहुल गांधींना धक्का! काँग्रेसने दिशा गमावलीय सांगत वायनाडमधील बड्या नेत्याचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 10:36 IST

Wayanad Congress: बालाचंद्रन यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय हा सध्याच्या काँग्रेस नेतृत्वालाही धक्का देणारा असल्याचे सांगितले जात आहे. 

वायनाड: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेससाठी एकामागून एक धक्क्यांची मालिका सुरूच आहे. पंजाबमध्ये मोठी राजकीय उलथापालथ घडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघातील एका बड्या नेत्याने राजीनामा दिला असून, गेल्या ५२ वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. राहुल गांधींसाठी हा मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. (former wayanad district chief pv balachandran resigned from congress)

वायनाड येथील माजी जिल्हा काँग्रेस कमिटीचे (डीसीसी) अध्यक्ष पीव्ही बालचंद्रन यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. याशिवाय केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) कार्यकारी समिती सदस्य बालचंद्रन यांनी बहुमत आणि अल्पसंख्यांक दोन्ही समुदाय काँग्रेसपासून दूर जात असल्याचे सांगत पक्षाशी ५२ वर्षे असलेला संबंध संपवला. यावेळी बालचंद्रन यांनी काँग्रेसवर मोठे आरोप केले आहेत. 

काँग्रेस हा दिशा गमावलेला पक्ष

देशातील भाजपाचा विकास रोखण्यात सर्वांत जुना पक्ष अपयशी ठरल्याचा आरोप बालचंद्रन यांनी केला आहे. दिशा गमावलेल्या पक्षासोबत लोक उभे राहणार नाहीत, असा दावा करत काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाच्या कार्यशैलीवरही त्यांनी टीका केली. लोकांना प्रभावित करणाऱ्या मुद्यांवर ते स्पष्ट राजकीय भूमिका घेण्यास सक्षम नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसला कार्यकर्त्यांच्या भावनांनुसार काम करता येणार नाही असे वाटत असल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असे बालचंद्रन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

दरम्यान, वायनाडमध्ये काँग्रेसमध्ये होत असलेल्या राजीनाम्यांच्या मालिकेत बालचंद्रन यांचे नावही जोडले गेले असून, माजी आमदार के.सी. रोसाकुट्टी, केपीसीसी सचिव एमएस विश्वनाथन आणि डीसीसी सरचिटणीस अनिल कुमार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडला होता. बालाचंद्रन यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय हा सध्याच्या काँग्रेस नेतृत्वालाही धक्का देणारा असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीKeralaकेरळ