शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
4
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
5
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
6
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
7
टेबल फॅन खूपच खराब झालाय... स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' सोपी पद्धत, चमकेल नव्यासारखा
8
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
9
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
10
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
11
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
12
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
13
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
14
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
15
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
16
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
17
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
18
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
19
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
20
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी

विश्व शांती केंद्र अस्वस्थ जगाला अहिंसेचा मार्ग दाखवेल; माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 08:38 IST

अहिंसा विश्व भारतीद्वारे गुरुग्राम येथे बनविलेल्या विश्व शांती केंद्राचे उद्घाटन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : युद्ध, दहशतवाद, ग्लोबल वाॅर्मिंग आणि असमानता यांसारख्या समस्या संपूर्ण जगाला भेडसावत असताना जगात अहिंसा आणि शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी विश्व शांती केंद्र महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याचा विश्वास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला.

अहिंसा विश्व भारतीद्वारे गुरुग्राम येथे बनविलेल्या विश्व शांती केंद्राचे उद्घाटन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया, बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी, जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर, गोविंददेव गिरि, मुरारी बापू आदी मान्यवर उपस्थित होते. 

पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया म्हणाले की, राजस्थानमध्ये जन्मलेले आचार्य लोकेशजी यांना अमेरिकन राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे.  बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी विश्व शांती केंद्राच्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक सहिष्णुता आणि परस्पर सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल, असे सांगितले. हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी म्हणाले की, हरयाणाच्या या पवित्र भूमीवर विश्व शांती केंद्र स्थापन होणे हा केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी गर्वाचा क्षण आहे. 

श्री श्री रविशंकर म्हणाले की, ‘जहाँ हरी का आना होता हैं वह हरयाणा हैं’. अशा पवित्र भूमीवर विश्व शांती केंद्र अस्तित्वात येणे स्वतःमध्येच एक खूप मोठा संदेश आहे. भाईश्री रमेशभाई ओझा म्हणाले की, शांतता केंद्राची स्थापना हा समाजाची दिशा आणि स्थिती बदलण्याचा एक अद्भूत प्रयत्न आहे.

या परिषदेला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, स्वामी रामदेव, गोविंददेव गिरी, बौद्ध भिक्षू संघसेना, इमाम उमर अहमद इलियासी, स्वामी धर्मदेव, स्वामी दीपंकर, परमजीत सिंह चांडोक, स्वामी अभय दास जी, पुंडरिक गोस्वामी आणि देवी चित्रलेखा यांनीही संबोधित केले.

समाजाची दिशा आणि स्थिती बदलण्यास हातभार

जैन आचार्य लोकेश मुनीजी म्हणाले की, जागतिक शांती केंद्राचा उद्घाटन समारंभ हा अध्यात्म आणि समाजसेवेचा एक महाकुंभ आहे. येथून जागतिक शांती आणि सद्भावनेचा संदेश प्रसारित करेल. विश्व शांती केंद्राची स्थापना समाजाची दिशा, स्थिती बदलण्यास हातभार लावेल.

जगभरात शांती, बंधुभावाचा संदेश जाईल : डॉ. दर्डा

लोकमत वृत्तपत्र समुहाचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी खासदार डॉ.  विजय दर्डा म्हणाले की, या विश्व शांती केंद्रातून जगभरात शांती आणि बंधुभावाचा संदेश प्रसारित होणार आहे. अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक जैन आचार्य लोकेश मुनीजी श्रेष्ठतम जैन परंपरेची ध्वजा घेऊन अहिंसेचा संदेश देण्यासाठी निघाले आहेत. सिंगापूर येथे आयोजित ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये आचार्यश्री आले असताना त्यांची जैन परंपरेला समर्पित अशी जीवनशैली बघायला मिळाली. ते हॉटेलमध्ये आले होते. मात्र, हॉटेलचे जेवण केले नाही. तेथील पाणी सुद्धा प्यायले नाहीत. 

एका आठवणीचा उल्लेख करताना  डॉ. दर्डा म्हणाले की, एकदा आचार्यश्री तुलसी यांना एल. एम. सिंघवी म्हणाले होते की, आचार्य यांना थोडे मोकळे करून त्यांना अशा कार्यात लावायला हवे जे सर्व बंधनातून मुक्त असेल आणि शांती तसेच बंधूबावाचा प्रचार प्रसार करतील’. 

महत्वाचे म्हणजे, आचार्य लोकेश मुनीजी यांनी कॅनडाच्या संसदेत  बोलताना पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनाही सुनावले होते. त्यावेळचे भाषण ऐकून माझे डोळे भरून आले होते. त्यावेळेस सर्वत्र भीतीचे वातावरण होते. मात्र आचार्य लोकेश मुनीजी यांनी आपला संदेश एवढ्या प्रेमाने मांडला जे सर्वासाठी अनुकरणीय करण्यासारखे होते.

डॉ. दर्डा म्हणाले की, बिहारचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांचे ४० वर्षांपासून संबंध आहेत. ते राजकारण, कायदा अशा विविध विषयावर बोलतात. मात्र जेव्हा ते भगवान महावीर यांच्यावर बोलतात ते भल्याभल्याना आश्चर्यचकित करणारे असते. यूपीचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्या खासदार होते तेव्हा विविध समित्यामध्ये सोबत काम केले होते, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदVijay Dardaविजय दर्डा