शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 14:06 IST

Farooq Abdullah News: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकविरोधात कठोर कारवाई करण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Farooq Abdullah News: पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी भारताकडून व्यापक रणनीतीवर काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बुधवारी उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू होते, तर भारतातील बैठकांचे सत्र बघून पाकिस्तानात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशियाचा दौरा रद्द करण्यात आला आहे. सुरक्षा संबंधित कॅबिनेट समिती, राजकीय व्यवहार संबंधित कॅबिनेट समितीसह इतर महत्त्वाच्या उच्चस्तरीय बैठका पंतप्रधान मोदी यांनी घेतल्या. यातच आता जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना, या सगळ्याचा काश्मिरी जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो, असे म्हटले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरक्षा दल घेत आहेत. काश्मीर खोऱ्यात विविध ठिकाणी छापेमारी केली जात आहेत. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक दहशतवाद्यांची घरे स्फोटांनी किंवा बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आली. दहशतवादी हाशिम मुसाचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी त्याच्यावर २० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. तसेच भारताने एअर स्पेस पाकिस्तानसाठी बंद केली आहे. 

सर्वाधिक त्रास काश्मीरमधील लोकांना होत आहे

पहलगामची घटना खूप वेदनादायक होती. यामुळे द्वेष आणखी वाढू शकतो. द्वेष पसरवणे हा कोणाचा हेतू आहे? ते असे का करत आहेत आणि त्यांना त्यातून काय फायदा मिळत आहे? असे प्रश्न उपस्थित करत, काश्मीरवासी मधल्या मधे अडकतात. गेल्या ३०-३५ वर्षांपासून हे पाहत आहोत. याचा सर्वाधिक त्रास काश्मीरमधील लोकांना होत आहे, असे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याची सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती. जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी केंद्र, जम्मू आणि काश्मीर, सीआरपीएफ, एनआयए यांना कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.  सर्वोच्च न्यायालायाने याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला.

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरFarooq Abdullahफारुख अब्दुल्ला