शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 14:06 IST

Farooq Abdullah News: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकविरोधात कठोर कारवाई करण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Farooq Abdullah News: पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी भारताकडून व्यापक रणनीतीवर काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बुधवारी उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू होते, तर भारतातील बैठकांचे सत्र बघून पाकिस्तानात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशियाचा दौरा रद्द करण्यात आला आहे. सुरक्षा संबंधित कॅबिनेट समिती, राजकीय व्यवहार संबंधित कॅबिनेट समितीसह इतर महत्त्वाच्या उच्चस्तरीय बैठका पंतप्रधान मोदी यांनी घेतल्या. यातच आता जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना, या सगळ्याचा काश्मिरी जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो, असे म्हटले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरक्षा दल घेत आहेत. काश्मीर खोऱ्यात विविध ठिकाणी छापेमारी केली जात आहेत. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक दहशतवाद्यांची घरे स्फोटांनी किंवा बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आली. दहशतवादी हाशिम मुसाचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी त्याच्यावर २० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. तसेच भारताने एअर स्पेस पाकिस्तानसाठी बंद केली आहे. 

सर्वाधिक त्रास काश्मीरमधील लोकांना होत आहे

पहलगामची घटना खूप वेदनादायक होती. यामुळे द्वेष आणखी वाढू शकतो. द्वेष पसरवणे हा कोणाचा हेतू आहे? ते असे का करत आहेत आणि त्यांना त्यातून काय फायदा मिळत आहे? असे प्रश्न उपस्थित करत, काश्मीरवासी मधल्या मधे अडकतात. गेल्या ३०-३५ वर्षांपासून हे पाहत आहोत. याचा सर्वाधिक त्रास काश्मीरमधील लोकांना होत आहे, असे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याची सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती. जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी केंद्र, जम्मू आणि काश्मीर, सीआरपीएफ, एनआयए यांना कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.  सर्वोच्च न्यायालायाने याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला.

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरFarooq Abdullahफारुख अब्दुल्ला