शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

"अयोध्या निकालापूर्वी देवासमोर प्रार्थना केली नव्हती";माजी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 19:51 IST

माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका मुलाखतीमध्ये अयोध्येच्या निकालावरुन भाष्य केलं.

Former CJI DY Chandrachud: भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्या कार्यकाळाबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे. अयोध्या निकालाच्या वेळी आपण देवाजवळ का बसलो होतो, याबाबत माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी खुलासा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घरी गणेश पूजेसाठी बोलवल्याबद्दलही माजी सरन्यायाधिशांनी भाष्य केलं. या दोन्ही मुद्द्यांवरुन विरोधी राजकीय पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता धनंजय चंद्रचूड यांनी सगळ्या मुद्द्यांबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

अयोध्या निर्णयापूर्वी मला मार्ग दाखवा अशी देवाकडे प्रार्थना करण्याबाबत मी कधीच बोललो नव्हतो असा खुलासा माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. अयोध्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर माजी सरन्यायाधिश चंद्रचूड यांनी, निर्णयापूर्वी मी या समस्येवर उपाय सुचवण्यासाठी देवाला प्रार्थना केली होती, असं म्हटल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. काही वृत्तांमध्ये, मी देवासमोर बसलो आणि प्रार्थना केली की काहीतरी उपाय शोधला पाहिजे, असं न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले होते असं सांगण्यात आलं होतं.

मात्र आता मुलाखतीमध्ये माजी सरन्यायाधिशांनी हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटलं आहे. "मी हे आधी स्पष्ट केले आहे आणि मी पुन्हा स्पष्ट करतो की हे पूर्णपणे चुकीचे आहे. जर तुम्हाला सोशल मीडियाद्वारे न्यायाधीशांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला चुकीचेच उत्तर मिळेल. मी धार्मिक व्यक्ती आहे हे मी नाकारत नाही. स्वतंत्र न्यायाधीश होण्यासाठी तुम्ही नास्तिक असायला हवे, अशी आमच्या राज्यघटनेची गरज नाही आणि मी माझ्या श्रद्धेचा आदर करतो. माझी श्रद्धा मला धर्माची सार्वत्रिकता शिकवते.  माझा धर्म सर्व धर्मांचा आदर करतो आणि माणूस कोणत्याही धर्मात आला तरी तुम्हाला समान न्याय द्यावा लागेल," असं माजी सरन्यायाधिश चंद्रचूड म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या भेटीवरही केलं भाष्य

"संवैधानिक जबाबदाऱ्यांबद्दल बोलताना मूलभूत शालीनतेला जास्त महत्त्व दिले जाऊ नये. मला वाटते की सर्वोच्च संवैधानिक पदे धारण करणाऱ्यांमध्ये मूलभूत शालीनतेचा खटल्याशी काहीही संबंध नाही हे समजून घेण्यासाठी आमची यंत्रणा पुरेशी परिपक्व आहे. भेटीपूर्वी, आम्ही इलेक्टोरल बाँड्ससारख्या विषयांवर निर्णय दिला होता, ज्यामध्ये आम्ही तो कायदा मोडून काढला होता. त्यानंतर आम्ही असे अनेक निर्णय दिले जे सरकारच्या विरोधात गेले," असं माजी सरन्यायाधिश म्हणाले. 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर