शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

"अयोध्या निकालापूर्वी देवासमोर प्रार्थना केली नव्हती";माजी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 19:51 IST

माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका मुलाखतीमध्ये अयोध्येच्या निकालावरुन भाष्य केलं.

Former CJI DY Chandrachud: भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्या कार्यकाळाबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे. अयोध्या निकालाच्या वेळी आपण देवाजवळ का बसलो होतो, याबाबत माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी खुलासा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घरी गणेश पूजेसाठी बोलवल्याबद्दलही माजी सरन्यायाधिशांनी भाष्य केलं. या दोन्ही मुद्द्यांवरुन विरोधी राजकीय पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता धनंजय चंद्रचूड यांनी सगळ्या मुद्द्यांबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

अयोध्या निर्णयापूर्वी मला मार्ग दाखवा अशी देवाकडे प्रार्थना करण्याबाबत मी कधीच बोललो नव्हतो असा खुलासा माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. अयोध्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर माजी सरन्यायाधिश चंद्रचूड यांनी, निर्णयापूर्वी मी या समस्येवर उपाय सुचवण्यासाठी देवाला प्रार्थना केली होती, असं म्हटल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. काही वृत्तांमध्ये, मी देवासमोर बसलो आणि प्रार्थना केली की काहीतरी उपाय शोधला पाहिजे, असं न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले होते असं सांगण्यात आलं होतं.

मात्र आता मुलाखतीमध्ये माजी सरन्यायाधिशांनी हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटलं आहे. "मी हे आधी स्पष्ट केले आहे आणि मी पुन्हा स्पष्ट करतो की हे पूर्णपणे चुकीचे आहे. जर तुम्हाला सोशल मीडियाद्वारे न्यायाधीशांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला चुकीचेच उत्तर मिळेल. मी धार्मिक व्यक्ती आहे हे मी नाकारत नाही. स्वतंत्र न्यायाधीश होण्यासाठी तुम्ही नास्तिक असायला हवे, अशी आमच्या राज्यघटनेची गरज नाही आणि मी माझ्या श्रद्धेचा आदर करतो. माझी श्रद्धा मला धर्माची सार्वत्रिकता शिकवते.  माझा धर्म सर्व धर्मांचा आदर करतो आणि माणूस कोणत्याही धर्मात आला तरी तुम्हाला समान न्याय द्यावा लागेल," असं माजी सरन्यायाधिश चंद्रचूड म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या भेटीवरही केलं भाष्य

"संवैधानिक जबाबदाऱ्यांबद्दल बोलताना मूलभूत शालीनतेला जास्त महत्त्व दिले जाऊ नये. मला वाटते की सर्वोच्च संवैधानिक पदे धारण करणाऱ्यांमध्ये मूलभूत शालीनतेचा खटल्याशी काहीही संबंध नाही हे समजून घेण्यासाठी आमची यंत्रणा पुरेशी परिपक्व आहे. भेटीपूर्वी, आम्ही इलेक्टोरल बाँड्ससारख्या विषयांवर निर्णय दिला होता, ज्यामध्ये आम्ही तो कायदा मोडून काढला होता. त्यानंतर आम्ही असे अनेक निर्णय दिले जे सरकारच्या विरोधात गेले," असं माजी सरन्यायाधिश म्हणाले. 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर