शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

‘जननायक’ ‘भारतरत्न’...मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी मारली होती सत्तेला लाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 08:21 IST

बिहारचे माजी मुख्यमंत्री स्व. कर्पूरी ठाकूर यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ जाहीर झाला.

मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठीच्या शिफारसींना विरोध झाला म्हणून सत्तेला लाथ मारणारे बिहारचे माजी मुख्यमंत्री स्व. कर्पूरी ठाकूर यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ जाहीर झाला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने ही घाेषणा केली. ‘जननायक’ म्हणून त्यांना ओळखले जात हाेते.  कर्पूरी ठाकूर हे २२ डिसेंबर १९७० ते २ जून १९७१ आणि २४ जून १९७७ ते २१ एप्रिल १९७९ या कालावधीत दाेन वेळा बिहारचे मुख्यमंत्री हाेते. त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारीही हाेती. त्यांचा जन्म समस्तीपूर जिल्ह्यातील पिताैझिया गावात झाला हाेता. ‘छाेडाे भारत’ चळवळीदरम्यान ते २६ महिने तुरुंगात हाेते.

प्रथमच बिगर काॅंग्रेसी सरकार केले स्थापनशिक्षक असलेले ठाकूर हे १९५२ मध्ये साेशलिस्ट पार्टीच्या तिकिटावर सर्वप्रथम बिहार विधानसभेवर ताजपूर मतदारसंघातूननिवडून गेले. त्यांच्या नेतृत्वात १९६७च्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त साेशलिस्ट पार्टी माेठ्या ताकदीने उभी राहिली हाेती. त्यामुळेच बिहारमध्ये प्रथमच बिगर काॅंग्रेसचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी कर्पूरी ठाकूर उपमुख्यमंत्री बनले.

मुख्यमंत्री हाेते, मुलीसाठी टॅक्सीने गेलेकर्पूरी ठाकूर हे गरीब नेते म्हणून ओळखले जायचे. भत्त्यांशिवाय एकही अतिरिक्त रुपया त्यांनी घेतला नाही. त्यांच्या मुलीसाठी मुलगा बघण्यासाठी त्यांना रांची येथे जायचे हाेते. मुख्यमंत्री असूनही त्यांनी सरकारी वाहन न घेता टॅक्सीचा वापर केला.  

विमानही उतरु दिले नाहीपत्नीच्या इच्छेखातर मूळ गावी मुलीचा विवाह झाला. विवाहासाठी माेजक्या कुटुंबियांनाच बाेलावले हाेते. एवढेच नव्हे, तर त्या दिवशी दरभंगा आणि सहरसा येथील विमानतळांवर एकही विमान उतरणार नाही, असे त्यांनी आदेश दिले हाेते. जेणेकरुन काेणीही नेता लग्नाला येणार नाही. मुख्यमंत्री गावात असल्याचे पाेलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना दाेन दिवसांनी कळाले. ते गावी पाेहाेचले तेव्हा एवढा साधा माणूस मुख्यमंत्री असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला हाेता. 

म्हणून बनले ‘जननायक’कर्पूरी ठाकूर यांनी अनेक आंदाेलने केली. त्यांचा संबंध थेट जनतेशी हाेता. त्यासाठी अनेकदा त्यांना तुरुंगात जावे लागले. मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांना ‘जननायक’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ते हिंदी भाषेचे पुरस्कर्ते हाेते. शिक्षण मंत्री असताना त्यांनी इंग्रजी हा अनिवार्य विषय म्हणून दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमातून वगळला हाेता. बिहारच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीमुळे नुकसान हाेत असल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले, असे त्यावेळी बाेलले गेले. 

‘तपस्येचे फळ मिळाले’कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ जाहीर झाल्यानंतर पुत्र रामनाथ ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला. बिहारच्या जनतेच्यावतीने आभार मानले. आम्हाला ३६ वर्षांच्या तपस्येचे फळ मिळाले, असे ते म्हणाले.

टॅग्स :BiharबिहारCentral Governmentकेंद्र सरकार