शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
4
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
5
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
6
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
7
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
8
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
9
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
10
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
11
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 11:35 IST

निवृत्तीनंतर त्यांना नियमांप्रमाणे तात्पुरते निवासस्थान म्हणून टाईप ७ बंगला देण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालय प्रशासनाकडे विनंती करत, त्यांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत ५ कृष्ण मेनन मार्ग बंगल्यातच राहण्याची परवानगी मागितली होती. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही, विद्यमान सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी त्यांना ३१ मे पर्यंत संबंधित निवासस्थानात राहण्याची परवानगी दिली होती.

माजी सरन्यायाधीश (CJI) डीवाय चंद्रचूड यांना निवृत्त होऊन साधारणपणे ८ महिने झाले आहेत. मात्र, ते अद्यापही सरकारी निवासस्थानातच राहत आहेत. यावरून आता सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात न्यायालय प्रशासनाने केंद्रीय नगरविकास मंत्रालयाला पत्र लिहून चंद्रचूड राहत असलेले निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले आहे. नियमांनुसार, निवृत्तीनंतर कुणीही एवढे दिवस सरकारी निवासस्थानात राहू शकत नाही, असे या पत्रात म्हणण्यात आले आहे.

चंद्रचूड हे २ वर्षे भारताचे सरन्यायाधीश होते. ते १० नोव्हेंबर २०२४ रोजी निवृत्त झाले आहेत. पदावर असताना मुख्य न्यायाधीशांचे निवासस्थान म्हणून त्यांना ५ कृष्ण मेनन मार्ग बंगला मिळाला होता. हा टाईप ८ प्रकारचा बंगला आहे. निवृत्तीनंतर त्यांना नियमांप्रमाणे तात्पुरते निवासस्थान म्हणून टाईप ७ बंगला देण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालय प्रशासनाकडे विनंती करत, त्यांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत ५ कृष्ण मेनन मार्ग बंगल्यातच राहण्याची परवानगी मागितली होती. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही, विद्यमान सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी त्यांना ३१ मे पर्यंत संबंधित निवासस्थानात राहण्याची परवानगी दिली होती.

सर्वोच्च न्यायालय प्रशासनाचं सरकारला पत्र? -सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने सरकारला लिहिलेल्या पत्रानुसार, "निवृत्तीच्या ८ महिन्यांनंतरही चंद्रचूड यांनी बंगला रिकामा केलेला नाही. त्यांच्या विनंतीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ३१ मे पर्यंत बंगल्यात राहण्याची परवानगी दिली होती. हा कालावधीही संपला आहे. नवीन न्यायाधीशांना निवासस्थान वाटपात अडचणी येत आहेत. यामुळे, माजी सरन्यायाधीशांकडून तात्काळ बंगला रिकामा करून घेण्यात यावा."

महत्वाचे म्हणजे, ५ कृष्णा मेनन मार्ग हे अधिकृतपणे सरन्यायाधीशांचे निवासस्थान आहे. मात्र, चंद्रचूड यांच्यानंतर सरन्यायाधीश झालेले संजीव खन्ना आणि विद्यमान सरन्यायाधीश बी.आर. गवई यांना, ते आतापर्यंत ज्या बंगल्यात राहत होते, तेथेच राहणे योग्य वाटले. यामुळेच चंद्रचूड यांनाही अधिक काळ सरकारी निवासस्थानात राहण्याची संधी मिळाली. 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्लीCourtन्यायालय