शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

"मृत्यू डोळ्यासमोर होता, २०-२५ मिनिटेच शिल्लक होती..."; शेख हसीना यांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:37 IST

कोटालीपारा इथं शेख हसीना यांना मारण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला ज्याचा उल्लेख त्यांनी ऑडिओ संदेशमध्ये केला.

नवी दिल्ली - बांगलादेश ५ ऑगस्टचा तो दिवस सहजपणे विसरू शकत नाही. त्याचदिवशी शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत भारताकडे आश्रय घेतला. बांगलादेशातील बिकट परिस्थितीमुळे हसीना यांना देश सोडून पळून जावं लागले. त्यानंतर बांगलादेशात हिंदूंची घरे, मंदिरे यांना टार्गेट करण्यात आले. आता या संपूर्ण घडामोडीवर शेख हसीना यांनी गंभीर आरोप लावला आहे. सत्तेतून बाहेर पडताच मी आणि माझी बहीण शेख रेहाना यांच्या हत्येचं षडयंत्र रचण्यात आलं होते असा खुलासा त्यांनी केला.

शेख हसीना यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या बांगलादेश आवामी लीगच्या फेसबुकवर ऑडिओ संदेश पोस्ट केला आहे. त्यात त्या म्हणाल्या की, रेहाना आणि मी थोडक्यात वाचलो, मृत्यू आमच्या डोळ्यासमोर होता आणि आमच्याकडे फक्त २०-२४ मिनिटे बाकी शिल्लक होती. आमच्या हत्येचं षडयंत्र अनेकदा रचण्यात आले होते. २१ ऑगस्टला झालेल्या घटनेत वाचणे, कोटालीपारा इथं बॉम्ब स्फोटातून बचावणे आणि ५ ऑगस्टला जिवंत राहणे ही अल्लाहची इच्छा होती. जर अल्लाहची इच्छा नसती तर आतापर्यंत मी जिवंत राहिली नसती असं त्यांनी सांगितले.

तसेच मला कशाप्रकारे मारण्याचा डाव रचला होता ते सगळ्यांनी पाहिले. अल्लाहच्या कृपेने मी वाचले. मी पीडित असून माझ्या देशाविना, घराविना राहत आहे. सर्व काही जाळून टाकले असंही भावूक होत शेख हसीना यांनी म्हटलं. शेख हसीना यांची सुरक्षा व्यवस्था चोख असतानाही अनेकदा त्या हत्येच्या प्रयत्नातून वाचल्या. २००४ मध्ये ढाका ग्रेनेड हल्ला २१ ऑगस्ट  २००४ रोजी पक्षाच्या दहशतवाद विरोधी रॅलीत झाला होता. त्यावेळी २४ लोक मारले गेले आणि ५०० हून अधिक जखमी होते. हा हल्ला संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी झाला तेव्हा विपक्ष नेत्या शेख हसीना या २० हजारांच्या सभेला संबोधित करत होत्या. या हल्ल्यात हसीना या किरकोळ जखमी झाल्या. 

कोटालीपारा इथं शेख हसीना यांना मारण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला ज्याचा उल्लेख त्यांनी ऑडिओ संदेशमध्ये केला. २१ जुलै २००० रोजी ७६ किलो आरडीएक्स बॉम्ब जप्त करण्यात आले होते आणि २ दिवसांनी कोटालीपूराच्या शेख लुत्फोर रहमान आयडिएल कॉलेजमधून ४० किलो आरएडीएक्स जप्त केले होते. ज्याठिकाणी आवामी लीगच्या अध्यक्षा आणि तत्कालीन विरोधी पक्षनेत्या शेख हसीना या २२ जुलैला रॅली करणार होत्या. 

काय आहे प्रकरण?

मागील वर्षी बांगलादेशात आरक्षण प्रणाली रद्द करण्याच्या मागणीवरून आंदोलन उभं राहिले होते. बांगलादेशात १९७१ साली मिळालेल्या स्वातंत्र्यसंग्रमातील कुटुंबाला ३० टक्के सरकारी नोकरीत आरक्षण द्यावं याविरोधात हा मोर्चा होता. या आरक्षणविरोधी मोर्चाने देशात हिंसक रुप प्राप्त केले. त्यानंतर देशातील अवस्था इतकी बिकट झाली ज्यामुळे शेख हसीना यांना देशातून पळून भारतात आश्रय घ्यावा लागला. या हिंसक आंदोलनात ६०० हून अधिक लोक मारले गेले.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश