शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

या पठ्ठ्याने १,३६0 एकरमध्ये निर्माण केले जंगल

By admin | Updated: May 15, 2017 00:06 IST

जंगले वाचविण्याची चिंता सरकारला सतावत असते. विकासाच्या नावावर जंगलतोड मात्र सुरूच आहे. अशा या विचित्र परिस्थितीत एक व्यक्ती अशीही आहे

दिसपूर : जंगले वाचविण्याची चिंता सरकारला सतावत असते. विकासाच्या नावावर जंगलतोड मात्र सुरूच आहे. अशा या विचित्र परिस्थितीत एक व्यक्ती अशीही आहे, ज्याने खडकाळ, बरड जमिनीवर हिरवेगार जंगल निर्माण केले आहे. त्याच्या प्रयत्नांनी थोड्या थोडक्या नव्हे तब्बल १,३६० एकरवर विशाल आणि घनदाट जंगल उभे राहिले आहे. जादव मोलाई पायेंग असे या अवलियाचे नाव आहे. ३७ वर्षांपूर्वी जादव यांनी आपल्या अद्भुत वृक्षारोपणास सुरुवात केली. आसामच्या जोरहाट जिल्ह्याच्या रानावनातील प्रदेशात राहणारे जादव तेव्हा १६ वर्षांचे होते. ब्रह्मपुत्रेला येणाऱ्या भयंकर पुरामुळे जमिनीवरची माती, झाडे सगळे वाहून जातात. हळूहळू हा परिसर बरड आणि ओसाड झाला. पशु-पक्षी दिसेनासे झाले. पशु-पक्ष्यांचा लळा असलेले जादव त्यामुळे अस्वस्थ झाले. त्यांनी वस्तीवरील ज्येष्ठांकडे विचारणा केली. ज्येष्ठांनी सांगितले की, झाडेझुडपे नसल्याने प्राणी संपले आहेत. झाडे लावण्याची विनंती करण्यासाठी जादव मग सरकारकडे गेले, पण त्यांना कोणीच दाद दिली नाही. मग त्यांनी स्वत:च झाडे लावण्याचा संकल्प केला. गेली ३७ वर्षे ते रोज झाडे लावत आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड केली. त्यांच्या या मोहिमेमुळे १,३६० एकर जमीन हिरवीगार झाली आहे. सरकारच्या सेंट्रल पार्क जंगलाचे क्षेत्र फक्त ७७८ एकर आहे. यावरून जादव यांच्या कार्याची कल्पना यावी. जादव यांनी वाढविलेल्या जंगलात आता शेकडो हरणे, हजारो पक्षी तसेच वाघांसारखे शिकारी प्राणी आहेत. ११५ हत्तींचा एक कळप दरवर्षी त्यांच्या जंगलात येतो. सहा महिने राहून पिलांना जन्म देतो. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने २०१५ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांनी लावलेले जंगल त्यांच्याच नावाने ‘मोलाई फॉरेस्ट’ म्हणून ओळखले जाते.