शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

या पठ्ठ्याने १,३६0 एकरमध्ये निर्माण केले जंगल

By admin | Updated: May 15, 2017 00:06 IST

जंगले वाचविण्याची चिंता सरकारला सतावत असते. विकासाच्या नावावर जंगलतोड मात्र सुरूच आहे. अशा या विचित्र परिस्थितीत एक व्यक्ती अशीही आहे

दिसपूर : जंगले वाचविण्याची चिंता सरकारला सतावत असते. विकासाच्या नावावर जंगलतोड मात्र सुरूच आहे. अशा या विचित्र परिस्थितीत एक व्यक्ती अशीही आहे, ज्याने खडकाळ, बरड जमिनीवर हिरवेगार जंगल निर्माण केले आहे. त्याच्या प्रयत्नांनी थोड्या थोडक्या नव्हे तब्बल १,३६० एकरवर विशाल आणि घनदाट जंगल उभे राहिले आहे. जादव मोलाई पायेंग असे या अवलियाचे नाव आहे. ३७ वर्षांपूर्वी जादव यांनी आपल्या अद्भुत वृक्षारोपणास सुरुवात केली. आसामच्या जोरहाट जिल्ह्याच्या रानावनातील प्रदेशात राहणारे जादव तेव्हा १६ वर्षांचे होते. ब्रह्मपुत्रेला येणाऱ्या भयंकर पुरामुळे जमिनीवरची माती, झाडे सगळे वाहून जातात. हळूहळू हा परिसर बरड आणि ओसाड झाला. पशु-पक्षी दिसेनासे झाले. पशु-पक्ष्यांचा लळा असलेले जादव त्यामुळे अस्वस्थ झाले. त्यांनी वस्तीवरील ज्येष्ठांकडे विचारणा केली. ज्येष्ठांनी सांगितले की, झाडेझुडपे नसल्याने प्राणी संपले आहेत. झाडे लावण्याची विनंती करण्यासाठी जादव मग सरकारकडे गेले, पण त्यांना कोणीच दाद दिली नाही. मग त्यांनी स्वत:च झाडे लावण्याचा संकल्प केला. गेली ३७ वर्षे ते रोज झाडे लावत आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड केली. त्यांच्या या मोहिमेमुळे १,३६० एकर जमीन हिरवीगार झाली आहे. सरकारच्या सेंट्रल पार्क जंगलाचे क्षेत्र फक्त ७७८ एकर आहे. यावरून जादव यांच्या कार्याची कल्पना यावी. जादव यांनी वाढविलेल्या जंगलात आता शेकडो हरणे, हजारो पक्षी तसेच वाघांसारखे शिकारी प्राणी आहेत. ११५ हत्तींचा एक कळप दरवर्षी त्यांच्या जंगलात येतो. सहा महिने राहून पिलांना जन्म देतो. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने २०१५ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांनी लावलेले जंगल त्यांच्याच नावाने ‘मोलाई फॉरेस्ट’ म्हणून ओळखले जाते.