शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

'परराष्ट्र मंत्रालयाला काम करताना गाजावाजा करायची सवय नाही, आणि सरतेशेवटी काम पुर्णही होतं'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 4:06 PM

ख्रिश्चन धर्मगुरू फादर टॉम उझुन्नलिल यांच्या सुटकेसाठी कोणतीही खंडणी देण्यात आली नव्हती असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. गतवर्षी येमेनमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेले ख्रिश्चन धर्मगुरू फादर टॉम उझुन्नलिल यांची दीड वर्षाने सुटका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगतवर्षी येमेनमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेले ख्रिश्चन धर्मगुरू फादर टॉम उझुन्नलिल यांची दीड वर्षाने सुटका करण्यात आली फादर टॉम उझुन्नलिल यांच्या सुटकेसाठी कोणतीही खंडणी देण्यात आली नव्हती असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं 'परराष्ट्र मंत्रालयाने कोणताही गाजावाजा न करता, शांतपणे आपलं काम पुर्ण केलं आहे', असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं

थिरुअनंतपुरम, दि. 13 - ख्रिश्चन धर्मगुरू फादर टॉम उझुन्नलिल यांच्या सुटकेसाठी कोणतीही खंडणी देण्यात आली नव्हती असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. गतवर्षी येमेनमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेले ख्रिश्चन धर्मगुरू फादर टॉम उझुन्नलिल यांची दीड वर्षाने सुटका करण्यात आली आहे. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी ट्विटरवरून ही माहिती दिली. 'परराष्ट्र मंत्रालयाने कोणताही गाजावाजा न करता, शांतपणे आपलं काम पुर्ण केलं आहे', असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. 

फादर टॉम उझुन्नलिल हे मूळ केरळचे असून, ख्रिश्चन मिशन-यांकडून चालविण्यात येत असलेल्या वृद्धाश्रमात ते कार्यरत होते. गेल्या वर्षी 6 मार्च 2016 रोजी इसिसच्या दहशतवाद्यांनी येमेनमधील अदेन शहरात हल्ला करून फादर टॉम यांचे अपहरण केले होते. या हल्ल्यात 15 जण ठार झाले होते. 

'फादर टॉम उझुन्नलिल यांच्या सुटकेमुळे परराष्ट्र मंत्रालय अत्यंत शांतपणे कोणताही गाजावाजा न करता काम करत असल्याचं स्पष्ट झालं आहे, आणि सरतेशेवटी आपलं काम पुर्णदेखील करत आहे', असं परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. यावेळी त्यांना फादर टॉम उझुन्नलिल यांच्या सुटकेसाठी खंडणी द्यावी लागली का ? असा प्रश्न विचारला असता त्यांनी नकार दिला. 

'फादर टॉम उझुन्नलिल यांचं येमेन येथून अपहरण झाल्यानंतर कोणत्या प्रकारची टीका झाली होती हे आजही माझ्या लक्षात आहे. फादर टॉम उझुन्नलिल सुरक्षित परतल्याचा मला आनंद आहे. त्यांना आम्ही सुरक्षित आणू शकलो याचा लोकांना आनंद आहे याची आम्हाला खात्री आहे', असंही व्ही के सिंह यांनी यावेळी बोलताना सांगितलं. 

मे महिन्यात फादर टॉम हे मदतीसाठी याचना करीत असल्याचा एक व्हिडीओ स्थानिक वृतवाहिनीवरून प्रसारित झाला होता. त्यात ते माझी प्रकृती ढासळत असून, तत्काळ उपचाराची गरज असल्याचे सांगत होते. त्यानंतर, केरळ सरकार आणि केंद्र सरकारकडून त्यांच्या सुटकेसाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नाला यश आले असून, त्यांची सुटका करण्यात आली आहे. फादर टॉम यांना मस्कतमध्ये नेण्यात आले असून, त्यांना विमानाने भारतात परत आणले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज