शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

फक्त टोमॅटोच नव्हे तर 'या' खाण्या-पिण्याच्या वस्तूही महागल्या, संसदेत सरकारकडून आकडेवारी सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 17:11 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या आठवड्यात खाद्यपदार्थांची सरकारी आकडेवारीही सादर केली आहे.

नवी दिल्ली : खाद्यपदार्थांच्या गगनाला भिडलेल्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पावसाळ्यात फक्त टोमॅटोचे दर वाढले नाहीत, तर इतर खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या आठवड्यात खाद्यपदार्थांची सरकारी आकडेवारीही सादर केली आहे. ही सरकारी आकडेवारी दाखवते की, बटाट्याशिवाय इतर खास खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या आठवड्यात संसदेत सांगितले की, गेल्या एका वर्षात तूर डाळीच्या किमती कमाल २८ टक्के वाढल्या आहेत. यानंतर तांदूळ १०.५ टक्के, उडीद डाळ आणि मैदाच्या किमतीत प्रत्येकी ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुरुवारी तांदळाची सरासरी किरकोळ किंमत ४१ रुपये प्रति किलो होती, जी एका वर्षापूर्वी ३७ रुपये होती.

तूर डाळीच्या किमतीत वाढ होण्याचे कारण देशांतर्गत उत्पादनातील कमतरता असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. यामध्ये म्हटले आहे की २०२२-२३ पीक वर्षासाठी कृषी मंत्रालयाच्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, मागील पीक वर्षातील ४२.२ लाख टनांच्या तुलनेत तूर डाळीचे उत्पादन ३४.३ लाख टन इतके होईल, असा अंदाज आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या किंमत मॉनिटरिंग सेलनुसार, गुरुवारी तूर डाळीची सरासरी किरकोळ किंमत १३६ रुपये प्रति किलो होती, जी गेल्या वर्षी १०६.५ रुपये प्रति किलो होती. उडीद डाळीचा भाव गेल्या वर्षीच्या १०६.५ रुपयांवरून ११४ रुपये किलो झाला आहे. मूग डाळीचा भावही आता १०२ रुपये प्रतिकिलो झाला आहे, जो गेल्या वर्षी १११ रुपये होता. मंत्रालयाने सांगितले की, भाज्यांमध्ये, बटाट्याची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १२ टक्के कमी आहे, तर कांद्याची किंमत एक वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे ५ टक्क्यांनी जास्त आहे. 

याचबरोबर, टोमॅटोच्या किमतींबाबत मंत्रालयाने म्हटले आहे की, पिकाची हंगामी स्थिती, कोलारमधील पांढऱ्या माशीचा रोग आणि देशाच्या उत्तर भागात मान्सूनचे तत्काळ आगमन या कारणांमुळे अलिकडच्या आठवड्यात टोमॅटोच्या किमतीत वाढ झाली आहे. हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात टोमॅटो पिकांना फटका बसला असून मुसळधार पावसामुळे विविध भागात पुरवठा विस्कळीत झाला आहे.गुरुवारी टोमॅटोचा सरासरी भाव १४० रुपये प्रतिकिलो होता, जो गेल्या वर्षी ३४ रुपये होता, असे सरकारी आकडे सांगतात. 

टॅग्स :businessव्यवसायParliamentसंसद