शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

शस्त्रसंधी पाळा, अन्यथा वाटाघाटी बंद

By admin | Updated: June 16, 2014 03:50 IST

परिस्थिती सामान्य ठेवण्यासाठी कुरापतींना लगाम घालण्यावर भर देतानाच नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरी सुरू राहिल्यास पाकिस्तानशी वाटाघाटी बंद करण्यात येतील

श्रीनगर : परिस्थिती सामान्य ठेवण्यासाठी कुरापतींना लगाम घालण्यावर भर देतानाच नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरी सुरू राहिल्यास पाकिस्तानशी वाटाघाटी बंद करण्यात येतील, असा इशारा संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी दिला आहे. संरक्षणमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आखलेल्या जम्मू-काश्मीरच्या पहिल्याच दौऱ्यात जेटली पत्रकारांशी बोलत होते. नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी सुरू राहिल्यानंतरही वाटाघाटी प्रक्रिया सुरू राहील काय, असे विचारले असता, त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. ते म्हणाले, परिस्थिती सामान्य राहण्यासाठी नियंत्रण रेषेवरील मर्यादांचे उल्लंघन थांबणे अत्यंत आवश्यक आहे. दोन्ही देशात विश्वास भावना निर्माण होण्यासाठी ते महत्त्वाचे पाऊल आहे, असे जेटली म्हणाले. पाकिस्तानसह सर्व शेजारी देशांसोबत शांततापूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास इच्छुक आहे, असे भारताने म्हटले आहे. दोन्ही देशांमधील संबंध सामान्य ठेवण्यासाठी सीमेवर अमन-शांती ठेवणे ही पूर्वअट असल्याचे स्मरण देखील भारताने पाकिस्तानला करून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथविधी सोहळ्यात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रित केले होते. यावेळी मोदींनी शरीफ यांच्याशी मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणाचा पाकिस्तानात सुरू असलेल्या सुनावणीला वेग देण्याबद्दल चर्चा केली होती. या घटनेला भारत-पाकिस्तानमधील संबंधाबाबत सकारात्मकतेने बघितले गेले होते. पाकिस्तानी सैन्यांनी भारताच्या एका जवानाचे शीर छाटल्याच्या घटनेनंतर गेल्या वर्षी जानेवारीत भारत-पाकिस्तानमधील वाटाघाटीचा तिसरा टप्पा ठप्प झाला होता. जेटली यांनी राज्यपाल एन.एन. व्होरा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि वरिष्ठ लष्कर अधिकाऱ्यांशी वेगवेगळी बैठक घेतली त्यांनी आज सकाळी ओमर अब्दुल्ला आणि प्रशासन, लष्कर, पोलीस आणि निमलष्कर दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विशेष सुरक्षेचा आढावा घेतला. (वृत्तसंस्था)