शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
2
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
3
PBSK vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
4
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
5
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
6
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
7
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
8
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
9
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
10
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
11
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
12
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
13
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
14
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
15
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
16
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
17
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
18
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
19
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
20
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका

फोकस

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

राजकीय खेळी उलटली

राजकीय खेळी उलटली
भ्रष्टाचारप्रकरणी एखाद्या लोकप्रतिनिधीवर खटले दाखल होऊन त्याला अटक होण्याचे अनेक प्रकार महाराष्ट्रासह देशात घडले आहेत. यातील बर्‍याच जणांवर गुन्हे सिद्ध झाले तर काही जणांची यातून सहीसलामत सुटकाही झाली. परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात मोठ्या प्रमाणावर झालेल्या गैरकारभारातील प्रमुख आरोपी आमदार रमेश कदम यांचे प्रकरण हे वरवर साधे दिसत असले तरी याचे परिणाम संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावर होतील की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील गोराईसारख्या उपनगरात राहणारा एक युवक दहा-बारा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांच्या संपर्कात येतो काय आणि अल्पावधीत एका महामंडळाचा अध्यक्ष आणि पुढे आमदार होतो काय, हा साराच सिनेस्टाईल जीवनपट सामान्य माणसाला अचंबित करणारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाकांक्षी आणि दिग्गज नेत्यांच्या नावांची यादी पाहिली तर संघटनेत जेवढे नेते तेवढे गट असल्याचे कुणाही सामान्य माणसाला लक्षात आल्याशिवाय राहत नाही. असे जरी असले तरी शरद पवार आणि अजित पवार असे पक्षात प्रमुख दोन गट असल्याचे कुणीही नाकारू शकत नाही. या दोन गटांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या संधी कोणी सोडल्याचे आतापर्यंत कधी दिसले नाही. मोहोळ तालुक्यातील पक्षांतर्गत राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी रमेश कदमसारख्या उमेदवाराला संधी देऊन राष्ट्रवादीच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांनी जी खेळी केली ती आज त्यांच्याच अंगलट आली असल्याचे दिसते आहे. ४०० कोटी रुपयांच्या आसपास गैरव्यवहार केल्याप्रकरणी बेड्या ठोकलेले कदम हे या प्रकरणातील एकटेच लाभार्थी नाहीत, हे कोणाला सांगण्याची गरज नाही. त्यांनी गैरमार्गाने लुटलेली ही माया वेगवेगळ्या रूपाने पक्षाच्या किती नेत्यांपर्यंत पोहोचलेली आहे, हे सीआयडीच्या चौकशीत बाहेर येईलच. त्यातूनही कदम यांचा फटकळ आणि उद्धट स्वभाव पाहता हे सारे प्रकरण फार दिवस पडद्याआड राहील की नाही याबाबत शंका वाटते. एवढे सारे नाट्य होऊनही विद्यमान सरकारमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर सातत्याने आंदोलने करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांनी कदम यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून झालेली अटक यासंदर्भात एक चकार शब्दही काढला नाही किंवा त्यांना साधी शिस्तभंगाची नोटीसही दिली नाही, यावरून कदम यांनी केलेल्या गैरव्यवहाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे स्पष्टपणे दिसते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जरी १६ वर्षांपूर्वी स्थापन झाला असला तरी या संघटनेत काम करणार्‍या नेतेमंडळींच्या अनेक पिढ्या राजकारणात गेल्या आहेत. परंतु गेल्या आठ-दहा वर्षांपूर्वी पक्षात आलेले कदम हे आपल्या गैरवर्तनाने जेव्हा पक्षसंघटनेपेक्षा मोठे होऊ पाहत होते, तेव्हा त्यांना साधे फटकारण्याचे धाडसही कुठल्या नेत्याने केले नाही, यावरून ज्यांनी ही राजकीय खेळी केली त्यांच्यावरच उलटली आहे, असे म्हणावेसे वाटते.
- महेश कुलकर्णी