शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

फोकस

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

राजकीय खेळी उलटली

राजकीय खेळी उलटली
भ्रष्टाचारप्रकरणी एखाद्या लोकप्रतिनिधीवर खटले दाखल होऊन त्याला अटक होण्याचे अनेक प्रकार महाराष्ट्रासह देशात घडले आहेत. यातील बर्‍याच जणांवर गुन्हे सिद्ध झाले तर काही जणांची यातून सहीसलामत सुटकाही झाली. परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात मोठ्या प्रमाणावर झालेल्या गैरकारभारातील प्रमुख आरोपी आमदार रमेश कदम यांचे प्रकरण हे वरवर साधे दिसत असले तरी याचे परिणाम संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावर होतील की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील गोराईसारख्या उपनगरात राहणारा एक युवक दहा-बारा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांच्या संपर्कात येतो काय आणि अल्पावधीत एका महामंडळाचा अध्यक्ष आणि पुढे आमदार होतो काय, हा साराच सिनेस्टाईल जीवनपट सामान्य माणसाला अचंबित करणारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाकांक्षी आणि दिग्गज नेत्यांच्या नावांची यादी पाहिली तर संघटनेत जेवढे नेते तेवढे गट असल्याचे कुणाही सामान्य माणसाला लक्षात आल्याशिवाय राहत नाही. असे जरी असले तरी शरद पवार आणि अजित पवार असे पक्षात प्रमुख दोन गट असल्याचे कुणीही नाकारू शकत नाही. या दोन गटांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या संधी कोणी सोडल्याचे आतापर्यंत कधी दिसले नाही. मोहोळ तालुक्यातील पक्षांतर्गत राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी रमेश कदमसारख्या उमेदवाराला संधी देऊन राष्ट्रवादीच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांनी जी खेळी केली ती आज त्यांच्याच अंगलट आली असल्याचे दिसते आहे. ४०० कोटी रुपयांच्या आसपास गैरव्यवहार केल्याप्रकरणी बेड्या ठोकलेले कदम हे या प्रकरणातील एकटेच लाभार्थी नाहीत, हे कोणाला सांगण्याची गरज नाही. त्यांनी गैरमार्गाने लुटलेली ही माया वेगवेगळ्या रूपाने पक्षाच्या किती नेत्यांपर्यंत पोहोचलेली आहे, हे सीआयडीच्या चौकशीत बाहेर येईलच. त्यातूनही कदम यांचा फटकळ आणि उद्धट स्वभाव पाहता हे सारे प्रकरण फार दिवस पडद्याआड राहील की नाही याबाबत शंका वाटते. एवढे सारे नाट्य होऊनही विद्यमान सरकारमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर सातत्याने आंदोलने करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांनी कदम यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून झालेली अटक यासंदर्भात एक चकार शब्दही काढला नाही किंवा त्यांना साधी शिस्तभंगाची नोटीसही दिली नाही, यावरून कदम यांनी केलेल्या गैरव्यवहाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे स्पष्टपणे दिसते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जरी १६ वर्षांपूर्वी स्थापन झाला असला तरी या संघटनेत काम करणार्‍या नेतेमंडळींच्या अनेक पिढ्या राजकारणात गेल्या आहेत. परंतु गेल्या आठ-दहा वर्षांपूर्वी पक्षात आलेले कदम हे आपल्या गैरवर्तनाने जेव्हा पक्षसंघटनेपेक्षा मोठे होऊ पाहत होते, तेव्हा त्यांना साधे फटकारण्याचे धाडसही कुठल्या नेत्याने केले नाही, यावरून ज्यांनी ही राजकीय खेळी केली त्यांच्यावरच उलटली आहे, असे म्हणावेसे वाटते.
- महेश कुलकर्णी