शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

फोकस

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

राजकीय खेळी उलटली

राजकीय खेळी उलटली
भ्रष्टाचारप्रकरणी एखाद्या लोकप्रतिनिधीवर खटले दाखल होऊन त्याला अटक होण्याचे अनेक प्रकार महाराष्ट्रासह देशात घडले आहेत. यातील बर्‍याच जणांवर गुन्हे सिद्ध झाले तर काही जणांची यातून सहीसलामत सुटकाही झाली. परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात मोठ्या प्रमाणावर झालेल्या गैरकारभारातील प्रमुख आरोपी आमदार रमेश कदम यांचे प्रकरण हे वरवर साधे दिसत असले तरी याचे परिणाम संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावर होतील की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील गोराईसारख्या उपनगरात राहणारा एक युवक दहा-बारा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांच्या संपर्कात येतो काय आणि अल्पावधीत एका महामंडळाचा अध्यक्ष आणि पुढे आमदार होतो काय, हा साराच सिनेस्टाईल जीवनपट सामान्य माणसाला अचंबित करणारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाकांक्षी आणि दिग्गज नेत्यांच्या नावांची यादी पाहिली तर संघटनेत जेवढे नेते तेवढे गट असल्याचे कुणाही सामान्य माणसाला लक्षात आल्याशिवाय राहत नाही. असे जरी असले तरी शरद पवार आणि अजित पवार असे पक्षात प्रमुख दोन गट असल्याचे कुणीही नाकारू शकत नाही. या दोन गटांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या संधी कोणी सोडल्याचे आतापर्यंत कधी दिसले नाही. मोहोळ तालुक्यातील पक्षांतर्गत राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी रमेश कदमसारख्या उमेदवाराला संधी देऊन राष्ट्रवादीच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांनी जी खेळी केली ती आज त्यांच्याच अंगलट आली असल्याचे दिसते आहे. ४०० कोटी रुपयांच्या आसपास गैरव्यवहार केल्याप्रकरणी बेड्या ठोकलेले कदम हे या प्रकरणातील एकटेच लाभार्थी नाहीत, हे कोणाला सांगण्याची गरज नाही. त्यांनी गैरमार्गाने लुटलेली ही माया वेगवेगळ्या रूपाने पक्षाच्या किती नेत्यांपर्यंत पोहोचलेली आहे, हे सीआयडीच्या चौकशीत बाहेर येईलच. त्यातूनही कदम यांचा फटकळ आणि उद्धट स्वभाव पाहता हे सारे प्रकरण फार दिवस पडद्याआड राहील की नाही याबाबत शंका वाटते. एवढे सारे नाट्य होऊनही विद्यमान सरकारमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर सातत्याने आंदोलने करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांनी कदम यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून झालेली अटक यासंदर्भात एक चकार शब्दही काढला नाही किंवा त्यांना साधी शिस्तभंगाची नोटीसही दिली नाही, यावरून कदम यांनी केलेल्या गैरव्यवहाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे स्पष्टपणे दिसते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जरी १६ वर्षांपूर्वी स्थापन झाला असला तरी या संघटनेत काम करणार्‍या नेतेमंडळींच्या अनेक पिढ्या राजकारणात गेल्या आहेत. परंतु गेल्या आठ-दहा वर्षांपूर्वी पक्षात आलेले कदम हे आपल्या गैरवर्तनाने जेव्हा पक्षसंघटनेपेक्षा मोठे होऊ पाहत होते, तेव्हा त्यांना साधे फटकारण्याचे धाडसही कुठल्या नेत्याने केले नाही, यावरून ज्यांनी ही राजकीय खेळी केली त्यांच्यावरच उलटली आहे, असे म्हणावेसे वाटते.
- महेश कुलकर्णी