शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

केरळ, तामिळनाडू, कर्नाटकात पुराचा कहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 06:30 IST

पुरानंतर भूस्खलनाने संकट गडद; केरळात भूस्खलनानंतर ४० जण अडकले; विमान उड्डाणे थांबवली

उधगमंडलम : तामिळनाडूच्या पहाडी भागातील नीलगिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांत ५ जणांचा मृत्यू झाला. या भागात एका दिवसात रेकॉर्ड ९११ मि.मी. पाऊस झाला आहे. प्याकरा भागात एका घराची भिंत कोसळून माय- लेकींचा मृत्यू झाला, तर एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले. अमुथा (३५) आणि काव्या (१०), अशी मृतांची नावे आहेत, तर या महिलेचे पती कृष्णमूर्ती यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अन्य एका घटनेत दोन कामगार महिलांचे मृतदेह एका नाल्यात आढळून आले आहेत. भिंत कोसळून एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींशी चर्चानवी दिल्ली : केरळ आणि आपल्या लोकसभा मतदारसंघातील वायनाड येथील पूरस्थितीबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मदत मागितली. राहुल गांधी यांच्या टिष्ट्वटर हँडलनुसार, त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली आणि केरळ व विशेषत: पूर व भूस्खलनाचा तडाखा बसलेल्या लोकांना सर्वतोपरी मदत देण्याची मागणी केली. राहुल गांधी यांच्या टिष्ट्वटर हँडलवर म्हटले आहे की, पंतप्रधानांनी पूरग्रस्त लोकांना आवश्यक ती साहाय्यता देण्याचा शब्द दिला आहे. तत्पूर्वी, केरळातील पुराबाबत चिंता व्यक्त करताना राहुल गांधी यांनी गुरुवारी पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी पुढे यावे.

केरळमध्ये ३ दिवसांत पूर, भूस्खलनात 45 जणांचा मृत्यू14 जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी24 ठिकाणी भूस्खलनाच्या घटनावायनाड, मलप्पुरम, कन्नूर आणि इडुक्की या शहरांना पुराचा सर्वाधिक तडाखा64000 लोक आश्रय शिबिरातवायनाडमध्ये भूस्खलनाची सर्वात मोठी घटना. मेप्पाडीत दोन डोंगरांमधील भाग पूर्ण वाहून गेला. मेप्पाडीत पुथुमाला येथे भूस्खलनानंतर40 लोक फसले आहेत. एनडीआरएफ, पोलीस, वन अधिकारी मदतकार्यासाठी सरसावले आहेत.09 लोकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.मल्लपुरममध्ये घर कोसळून एकाच कुटुंबातील 04 जणांचा मृत्यू.राज्याच्या काही भागांत जोरदार वाऱ्यासह पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. राज्यातील शैक्षणिक संस्था शनिवारी राहणार बंद.विमान उड्डाणे रविवारपर्यंत केरळात रद्दकोची आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर पावसाचे पाणी साचल्याने येथील विमान उड्डाणे रविवारपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. विमानतळाच्या व्यवस्थापनाने सांगितले की, रविवारी दुपारी तीनपर्यंत विमान उड्डाणे बंद राहतील.कर्नाटकातील 80000 लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलविलेराज्यात पाऊस व पूर संबंधित विविध घटनांत 12येडियुरप्पा यांनी मुधोलमध्ये पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. बेळगावला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मलनाड जिल्ह्यात अनेक भागाला पुराचा तडाखा बसला आहे. ज्या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे त्यात बागलकोट, विजयपुरा, रायचूर, यादगिरी, उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, शिवमोगा, कोडागू आणि चिकमंगलूर यांचा समावेश आहे.उत्तराखंडात माय-लेकी वाहून गेल्यागोपेश्वर : फलदिया (जिल्हा चामोली) खेड्यात शुक्रवारी पहाटे जोरदार पावसामुळे घरात छोट्या ओढ्याचे चिखलमय पाणी शिरून सात वर्षांच्या मुलीसह तिची आई वाहून गेली, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. के. जोशी यांनी सांगितले. फलदिया खेड्यात चिखलमय पाण्याने वाहिलेल्या उलंगरा ओढ्याने डझनभर घरे आणि गोठे जलमय केले व जनावरे जिवंत गाडली गेली, असे जोशी म्हणाले.

टॅग्स :floodपूरKarnatakकर्नाटकTamilnaduतामिळनाडू