शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

केरळ, तामिळनाडू, कर्नाटकात पुराचा कहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 06:30 IST

पुरानंतर भूस्खलनाने संकट गडद; केरळात भूस्खलनानंतर ४० जण अडकले; विमान उड्डाणे थांबवली

उधगमंडलम : तामिळनाडूच्या पहाडी भागातील नीलगिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांत ५ जणांचा मृत्यू झाला. या भागात एका दिवसात रेकॉर्ड ९११ मि.मी. पाऊस झाला आहे. प्याकरा भागात एका घराची भिंत कोसळून माय- लेकींचा मृत्यू झाला, तर एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले. अमुथा (३५) आणि काव्या (१०), अशी मृतांची नावे आहेत, तर या महिलेचे पती कृष्णमूर्ती यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अन्य एका घटनेत दोन कामगार महिलांचे मृतदेह एका नाल्यात आढळून आले आहेत. भिंत कोसळून एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींशी चर्चानवी दिल्ली : केरळ आणि आपल्या लोकसभा मतदारसंघातील वायनाड येथील पूरस्थितीबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मदत मागितली. राहुल गांधी यांच्या टिष्ट्वटर हँडलनुसार, त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली आणि केरळ व विशेषत: पूर व भूस्खलनाचा तडाखा बसलेल्या लोकांना सर्वतोपरी मदत देण्याची मागणी केली. राहुल गांधी यांच्या टिष्ट्वटर हँडलवर म्हटले आहे की, पंतप्रधानांनी पूरग्रस्त लोकांना आवश्यक ती साहाय्यता देण्याचा शब्द दिला आहे. तत्पूर्वी, केरळातील पुराबाबत चिंता व्यक्त करताना राहुल गांधी यांनी गुरुवारी पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी पुढे यावे.

केरळमध्ये ३ दिवसांत पूर, भूस्खलनात 45 जणांचा मृत्यू14 जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी24 ठिकाणी भूस्खलनाच्या घटनावायनाड, मलप्पुरम, कन्नूर आणि इडुक्की या शहरांना पुराचा सर्वाधिक तडाखा64000 लोक आश्रय शिबिरातवायनाडमध्ये भूस्खलनाची सर्वात मोठी घटना. मेप्पाडीत दोन डोंगरांमधील भाग पूर्ण वाहून गेला. मेप्पाडीत पुथुमाला येथे भूस्खलनानंतर40 लोक फसले आहेत. एनडीआरएफ, पोलीस, वन अधिकारी मदतकार्यासाठी सरसावले आहेत.09 लोकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.मल्लपुरममध्ये घर कोसळून एकाच कुटुंबातील 04 जणांचा मृत्यू.राज्याच्या काही भागांत जोरदार वाऱ्यासह पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. राज्यातील शैक्षणिक संस्था शनिवारी राहणार बंद.विमान उड्डाणे रविवारपर्यंत केरळात रद्दकोची आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर पावसाचे पाणी साचल्याने येथील विमान उड्डाणे रविवारपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. विमानतळाच्या व्यवस्थापनाने सांगितले की, रविवारी दुपारी तीनपर्यंत विमान उड्डाणे बंद राहतील.कर्नाटकातील 80000 लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलविलेराज्यात पाऊस व पूर संबंधित विविध घटनांत 12येडियुरप्पा यांनी मुधोलमध्ये पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. बेळगावला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मलनाड जिल्ह्यात अनेक भागाला पुराचा तडाखा बसला आहे. ज्या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे त्यात बागलकोट, विजयपुरा, रायचूर, यादगिरी, उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, शिवमोगा, कोडागू आणि चिकमंगलूर यांचा समावेश आहे.उत्तराखंडात माय-लेकी वाहून गेल्यागोपेश्वर : फलदिया (जिल्हा चामोली) खेड्यात शुक्रवारी पहाटे जोरदार पावसामुळे घरात छोट्या ओढ्याचे चिखलमय पाणी शिरून सात वर्षांच्या मुलीसह तिची आई वाहून गेली, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. के. जोशी यांनी सांगितले. फलदिया खेड्यात चिखलमय पाण्याने वाहिलेल्या उलंगरा ओढ्याने डझनभर घरे आणि गोठे जलमय केले व जनावरे जिवंत गाडली गेली, असे जोशी म्हणाले.

टॅग्स :floodपूरKarnatakकर्नाटकTamilnaduतामिळनाडू