शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
4
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
5
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
6
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
7
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
8
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
9
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
10
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
11
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
12
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
13
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
14
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
15
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
16
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
17
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
18
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
19
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
20
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका

केरळ, तामिळनाडू, कर्नाटकात पुराचा कहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 06:30 IST

पुरानंतर भूस्खलनाने संकट गडद; केरळात भूस्खलनानंतर ४० जण अडकले; विमान उड्डाणे थांबवली

उधगमंडलम : तामिळनाडूच्या पहाडी भागातील नीलगिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांत ५ जणांचा मृत्यू झाला. या भागात एका दिवसात रेकॉर्ड ९११ मि.मी. पाऊस झाला आहे. प्याकरा भागात एका घराची भिंत कोसळून माय- लेकींचा मृत्यू झाला, तर एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले. अमुथा (३५) आणि काव्या (१०), अशी मृतांची नावे आहेत, तर या महिलेचे पती कृष्णमूर्ती यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अन्य एका घटनेत दोन कामगार महिलांचे मृतदेह एका नाल्यात आढळून आले आहेत. भिंत कोसळून एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींशी चर्चानवी दिल्ली : केरळ आणि आपल्या लोकसभा मतदारसंघातील वायनाड येथील पूरस्थितीबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मदत मागितली. राहुल गांधी यांच्या टिष्ट्वटर हँडलनुसार, त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली आणि केरळ व विशेषत: पूर व भूस्खलनाचा तडाखा बसलेल्या लोकांना सर्वतोपरी मदत देण्याची मागणी केली. राहुल गांधी यांच्या टिष्ट्वटर हँडलवर म्हटले आहे की, पंतप्रधानांनी पूरग्रस्त लोकांना आवश्यक ती साहाय्यता देण्याचा शब्द दिला आहे. तत्पूर्वी, केरळातील पुराबाबत चिंता व्यक्त करताना राहुल गांधी यांनी गुरुवारी पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी पुढे यावे.

केरळमध्ये ३ दिवसांत पूर, भूस्खलनात 45 जणांचा मृत्यू14 जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी24 ठिकाणी भूस्खलनाच्या घटनावायनाड, मलप्पुरम, कन्नूर आणि इडुक्की या शहरांना पुराचा सर्वाधिक तडाखा64000 लोक आश्रय शिबिरातवायनाडमध्ये भूस्खलनाची सर्वात मोठी घटना. मेप्पाडीत दोन डोंगरांमधील भाग पूर्ण वाहून गेला. मेप्पाडीत पुथुमाला येथे भूस्खलनानंतर40 लोक फसले आहेत. एनडीआरएफ, पोलीस, वन अधिकारी मदतकार्यासाठी सरसावले आहेत.09 लोकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.मल्लपुरममध्ये घर कोसळून एकाच कुटुंबातील 04 जणांचा मृत्यू.राज्याच्या काही भागांत जोरदार वाऱ्यासह पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. राज्यातील शैक्षणिक संस्था शनिवारी राहणार बंद.विमान उड्डाणे रविवारपर्यंत केरळात रद्दकोची आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर पावसाचे पाणी साचल्याने येथील विमान उड्डाणे रविवारपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. विमानतळाच्या व्यवस्थापनाने सांगितले की, रविवारी दुपारी तीनपर्यंत विमान उड्डाणे बंद राहतील.कर्नाटकातील 80000 लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलविलेराज्यात पाऊस व पूर संबंधित विविध घटनांत 12येडियुरप्पा यांनी मुधोलमध्ये पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. बेळगावला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मलनाड जिल्ह्यात अनेक भागाला पुराचा तडाखा बसला आहे. ज्या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे त्यात बागलकोट, विजयपुरा, रायचूर, यादगिरी, उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, शिवमोगा, कोडागू आणि चिकमंगलूर यांचा समावेश आहे.उत्तराखंडात माय-लेकी वाहून गेल्यागोपेश्वर : फलदिया (जिल्हा चामोली) खेड्यात शुक्रवारी पहाटे जोरदार पावसामुळे घरात छोट्या ओढ्याचे चिखलमय पाणी शिरून सात वर्षांच्या मुलीसह तिची आई वाहून गेली, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. के. जोशी यांनी सांगितले. फलदिया खेड्यात चिखलमय पाण्याने वाहिलेल्या उलंगरा ओढ्याने डझनभर घरे आणि गोठे जलमय केले व जनावरे जिवंत गाडली गेली, असे जोशी म्हणाले.

टॅग्स :floodपूरKarnatakकर्नाटकTamilnaduतामिळनाडू