शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 15:24 IST

Mamata Banerjee And Narendra Modi : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात ममता यांनी राज्यात पुरामुळे झालेल्या प्रचंड विध्वंसाचा सामना करण्यासाठी केंद्राकडून निधी तातडीने जारी करण्याची विनंती केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देखील ममता यांनी याबाबत ट्विट केलं आहे. 

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "डीव्हीसी (दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन) च्या मालकीच्या मॅथॉन आणि पंचेत धरणांतून सुमारे ५ लाख क्युसेक पाणी सोडण्यात आलं. इतकं पाणी सोडल्यामुळे दक्षिण बंगालमधील सर्व जिल्हे म्हणजेच पूर्व बर्धमान, पश्चिम बर्धमान, बांकुरा, हावडा, हुगळी, पूर्व मेदिनीपूर आणि पश्चिम मेदिनीपूर मोठ्या समस्यांना तोंड देत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी कधीच सोडण्यात आलं नव्हतं."

"२००९ नंतरचा सर्वात मोठा पूर"

"राज्य सध्या २००९ नंतरच्या सर्वात मोठ्या पुराचा सामना करत आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करा आणि संबंधित मंत्रालयांना या समस्या लवकर सोडवण्यासंबंधित महत्त्वाच्या सूचना द्या." ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटलं आहे की, "मी याला मानवनिर्मित पूर म्हणत आहे कारण ही परिस्थिती नीट माहिती न घेतल्यामुळे निर्माण झाली आहे."

"पुरामुळे रस्त्यांचं मोठं नुकसान"

"पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि ग्रामीण भागातील रस्त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मी गेल्या दोन दिवसांतील पूरग्रस्त भागाच्या भेटी दरम्यान हे पाहिलं आहे. राज्य सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून DVC अधिकाऱ्यांना आधीच धोक्याच्या पातळीच्या जवळ किंवा वर वाहणाऱ्या नद्यांच्या अशा गंभीर स्थितीबद्दल माहिती दिली होती" असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीfloodपूर