शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 15:24 IST

Mamata Banerjee And Narendra Modi : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात ममता यांनी राज्यात पुरामुळे झालेल्या प्रचंड विध्वंसाचा सामना करण्यासाठी केंद्राकडून निधी तातडीने जारी करण्याची विनंती केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देखील ममता यांनी याबाबत ट्विट केलं आहे. 

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "डीव्हीसी (दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन) च्या मालकीच्या मॅथॉन आणि पंचेत धरणांतून सुमारे ५ लाख क्युसेक पाणी सोडण्यात आलं. इतकं पाणी सोडल्यामुळे दक्षिण बंगालमधील सर्व जिल्हे म्हणजेच पूर्व बर्धमान, पश्चिम बर्धमान, बांकुरा, हावडा, हुगळी, पूर्व मेदिनीपूर आणि पश्चिम मेदिनीपूर मोठ्या समस्यांना तोंड देत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी कधीच सोडण्यात आलं नव्हतं."

"२००९ नंतरचा सर्वात मोठा पूर"

"राज्य सध्या २००९ नंतरच्या सर्वात मोठ्या पुराचा सामना करत आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करा आणि संबंधित मंत्रालयांना या समस्या लवकर सोडवण्यासंबंधित महत्त्वाच्या सूचना द्या." ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटलं आहे की, "मी याला मानवनिर्मित पूर म्हणत आहे कारण ही परिस्थिती नीट माहिती न घेतल्यामुळे निर्माण झाली आहे."

"पुरामुळे रस्त्यांचं मोठं नुकसान"

"पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि ग्रामीण भागातील रस्त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मी गेल्या दोन दिवसांतील पूरग्रस्त भागाच्या भेटी दरम्यान हे पाहिलं आहे. राज्य सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून DVC अधिकाऱ्यांना आधीच धोक्याच्या पातळीच्या जवळ किंवा वर वाहणाऱ्या नद्यांच्या अशा गंभीर स्थितीबद्दल माहिती दिली होती" असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीfloodपूर