शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

बिहारमधील  पूरस्थिती बिकट, मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 22:23 IST

नेपाळमधील मैदानी भाग आणि सीमांचलमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे  बिहारमधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे पूर्णिया किशनगंज, कटिहार, अररिया, दरभंगासह एकूण १८ जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे.

पाटणा, दि. १४ - नेपाळमधील मैदानी भाग आणि सीमांचलमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे  बिहारमधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे पूर्णिया किशनगंज, कटिहार, अररिया, दरभंगासह एकूण १८ जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. या जिल्ह्यांमधील दूर्गम भागात वसलेल्या गावांमध्ये परिस्थिती अधिकच खराब झाली आहे. तसेच परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. या पुरस्थितीमुळे सुमारे एक कोटी नागरिकांना फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिहार आणि नेपाळच्या सीमेलगतच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच नेपाळकडून धरणांमधील पाणी सोडण्यात येत असल्याने परिस्थिती अधिकच बिघडली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारकडून लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली आहे. तसेच हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्तांसाठी खाद्यान्नाची पॅकेट टाकण्यात येत आहेत.  या पूरस्थितीबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, "पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू  आहे. आम्ही उद्या आपातकालीन विभाग, रस्तेबांधणी विभाग आणि ग्रामीण कार्य विभागाचे मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठवणार आहोत." तसेच पुराचा फटका बसलेल्यांसाठी मदत आणि भोजन केंद्रेही सुरू केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील रणनीती ठरवण्यासाठी आम्ही एक बैठक बोलावली आहे. तसेच एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके सीतामढी, मधुबनी आणि चंपारण्य जिल्ह्यात पाठवण्यात आली आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन राज्य सरकारला दिले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांच्याशी राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा केली आहे.