शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

Flood in UP: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघाला पूराचा फटका; मदतीला कुणीच नाही, गावकरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 07:36 IST

पूरामुळे केवळ शहरी भागातच नाही तर गावातही जलप्रलय आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतपिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे.

ठळक मुद्देप्रशासनाकडून मदत मिळत नसल्यानं २०२२ मध्ये विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारारमना गावातील अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी पाण्याखाली यंदा पूर आल्यानंतरही कुणी आमदार, मंत्री किंवा अधिकारी गावात पोहचला नाही

वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीतपूराचा मोठा फटका बसला आहे. याठिकाणी अनेक गावांमध्ये पूर आला आहे. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणातील पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. पूराच्या तडाख्यातून वाराणसीतील गावंही बुडाली आहे. वाराणसीत गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकिनारच्या गावांचा त्याचा फटका बसला आहे.(Flood In Varanasi) 

पूरामुळे केवळ शहरी भागातच नाही तर गावातही जलप्रलय आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतपिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. वाराणसीतील रमना गावात तर निम्मे गाव जलमय झालं आहे. अनेक शेती गंगा नदीच्या पाण्याखाली आली आहे. बोटीच्या माध्यमातून लोकांना वाचवलं जात आहे. प्रशासनाकडून मदत मिळत नसल्यानं २०२२ मध्ये विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा गावकरी देत आहेत. वाराणसीतील रोहनिया विधानसभा मतदारसंघात रमना गाव येते. ४० हजारपेक्षा जास्त लोकांना पूराचा फटका बसल्यानं त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अंगणवाडी केंद्र, आरोग्य उपकेंद्रही बुडाले

गावांना जोडणारे मार्ग पाण्याखाली गेल्यानं संपर्क तुटला आहे. वाराणसीत गंगा नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरामुळे रमना गावातील अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. ४० हजार लोकसंख्या असलेल्या या गावात १५ हजाराहून जास्त मतदार आहेत. गावातील ७० टक्के लोकसंख्या भाजीपाल्याच्या शेतीवर निर्भर आहेत. गंगा नदीला पूर आल्याने अर्ध्याहून जास्त शेती पाण्यात गेली आहे.

पूरग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी लोकप्रतिनिधी फिरकलेच नाही

जेव्हा पूरामुळे गावकरी अडचणीत आले आहेत. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र याठिकाणी नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर सरकार ब्रिटिशाप्रमाणे वागतं. नुकसान भरपाई म्हणून २००, २५० ते ५०० रुपये काही शेतकऱ्यांना मिळतात. नदीकिनारी संरक्षक भिंत बनवल्यास पूराचं पाणी रोखता येऊ शकतं. यासाठी अनेकदा सर्वेक्षण झालं आहे. परंतु ते केले जात नाही. यंदा पूर आल्यानंतरही कुणी आमदार, मंत्री किंवा अधिकारी गावात पोहचला नाही. गावात पूर येऊन १ आठवडा झाला आहे असा आरोप स्थानिक गावकरी सुजीत सिंह यांनी केला आहे.

प्रशासन काय म्हणतंय?

रमना गावात सरकारी मदत पोहचत नाही या आरोपावर ग्रामसचिव लालबहादुर पटेल सांगतात की, गावात मेडिकल पथक, पंचायत सचिव आणि लेखापाल तैनात केले आहेत. गावातील जमिनीवर काही नुकसान झालं नाही. केवळ शेतजमिनी पाण्याखाली आल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. गावकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी सरकारनं तयारी दर्शवली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVaranasiवाराणसीfloodपूर