शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

चेन्नईत जलप्रलय

By admin | Updated: December 3, 2015 04:03 IST

तामिळनाडूत गेले दोन दिवस सुरू असलेल्या अभूतपूर्व पावसाने चेन्नई व उत्तर तामिळनाडूमधील जनजीवन कल्पनातीत पद्धतीने विस्कळीत झाले असून, पावसाचे हे पाणी

चेन्नई : तामिळनाडूत गेले दोन दिवस सुरू असलेल्या अभूतपूर्व पावसाने चेन्नई व उत्तर तामिळनाडूमधील जनजीवन कल्पनातीत पद्धतीने विस्कळीत झाले असून, पावसाचे हे पाणी अक्षरश: आणीबाणी घेऊन आले आहे. ना वृत्तपत्रे, ना विमानसेवा, ना रेल्वे वाहतूक ना रस्त्यावर वाहतूक, शिवाय वीज गायब, मोबाइलचे नेटवर्क डेड, बँका, आयटी कंपन्या, सर्व कार्यालये, शिक्षणसंस्था, तसेच एटीएम सेवाही बंद अशी अभूतपूर्व स्थिती चेन्नईवासीय अनुभवत आहेत.पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे तळातील वा खालच्या मजल्यांवरील लोक वरच्या मजल्यांवरच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या आश्रयाला गेले आहेत. गेल्या काही दिवसांत हाहाकार उडवून देणाऱ्या या पावसाने १९७ जणांचा बळी घेतला आहे. या भीषण पावसाने २६ जुलै २००५ मध्ये जलमय झालेल्या मुंबईच्या आठवणीही फिक्या ठरविल्या आहेत. तशात पुढचे तीन दिवस असाच भीषण पाऊस कोसळण्याच्या अंदाजाने चेन्नईकरांचा थरकाप उडाला आहे. या परिस्थितीत लोकांचे जीव वाचविण्यासाठी थेट लष्कर आणि नौदलाला पाचारण करण्यात आले असून, युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. १०० वर्षांतील पावसाचा विक्रममंगळवारी चेन्नईत केवळ १४ तासांत २०० मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली. गेल्या १०० वर्षांत चेन्नईत एका दिवसात पडलेला हा सर्वाधिक पाऊस होता. बुधवारीही पावसाचा जोर कायम असल्याने, अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून, रस्तेही जलमय झाले. चेन्नई शहराच्या मधोमध वाहणाऱ्या अड्यार नदीवरील सईदापेठ पुलावरून पुराचे पाणी वाहत असून, चेन्नई शहराचा आजूबाजूंच्या जिल्ह्यांशी संपर्क तुटला आहे. कांचीपूरम, तिरवल्लूर व कुड्डलूर जिल्ह्यांमध्येही पावसाने कहर केला आहे. रेल्वेमार्ग व रस्ते जलमय झाल्याने बसस्थानक, रेल्वेस्थानकांत शेकडो लोक अडकून पडले आहेत. अनेक भागांतील वीजसेवा खंडित करण्यात आली असून, लोकांना दूध आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.सैन्य सक्रियचेन्नईत, तसेच अन्य भागांत तिन्ही सैन्य दलांच्या जवानांनी युद्धस्तरावर मदत व बचाव कार्य आरंभले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची ३० पेक्षा अधिक पथकेही मदत कार्यात गुंतली आहेत. चेन्नई विमानतळावरील रन-वेवर पुराचे पाणी साचल्याने गुरुवारी सकाळपर्यंत विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. १५०० प्रवाशांसह एकूण ३५०० लोक अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी लष्कर आणि नौदलाने युद्धस्तरावर मदत व बचाव कार्य आरंभले आहे.१३७ वर्षांची परंपरा खंडित कर्मचारीच पोहोचू न शकल्याने इतर वृत्तपत्रांसारखीच गत झालेल्या ‘दि हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राचे १३७ वर्षांत प्रथमच चेन्नईत प्रकाशन झाले नाही. 48तास अटीतटीचेहवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईत येत्या ७२ तासांपर्यंत पावसाचा जोर कायम असेल. मात्र, त्यातही पुढील ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता बघता, अटीतटीचे आहेत.काश्मिरात थंडीची लाटकाश्मिरात थंडीची लाट असून, कारगीलमध्ये सर्वाधिक कमी उणे १०.३ अंश से. तापमानाची नोंद झाली.मोदींची चर्चा; राहुल यांची चिंतादिल्लीत पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी वरिष्ठ सहकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री जयललिता यांना फोेन करून केंद्राकडून सर्वतोपरी मदत देण्याची हमीही त्यांनी दिली, तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर चेन्नई व तामिळनाडूच्या अन्य भागांतील मुसळधार पावसावर चिंता प्रकट करीत, काँग्रेस कार्यकर्त्यांना मदतकार्यांत भाग घेण्याचे आवाहन केले.