शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी झुंबड; निकालामुळे आनंदाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 06:06 IST

रामजन्मभूमी वादाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाने अयोध्येमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अयोध्या : रामजन्मभूमी वादाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाने अयोध्येमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी रविवारी सकाळपासून भाविकांची रीघ लागली होती. या शहरातील हनुमानगढी, नया घाट परिसरातील मंदिरात भाविक मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी आले होते. रिकबगंज व शहरातील अन्य भागांतील रहिवासी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत रविवारी सकाळी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या बारकाईने वाचताना व त्यावर चर्चा करताना दिसून आले. अयोध्येतील एका हॉटेलमधील मॅनेजर संदीपसिंह यांनी सांगितले की, अयोध्यावासीयांसाठी निकालानंतरचा रविवार वेगळा आहे. अनेक वर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न सुटल्याने अयोध्यावासीयांना हायसे वाटले आहे. हनुमानगढी येथील मिठाई व पुष्पहार दुकानाचे मालक अनुप सैनी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडणार हे लक्षात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या दोन दिवस आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासंदर्भात चर्चा केली होती. निकालानंतर राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ केंद्र सरकारला कळवा असे शहा यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.>९० जणांना अटकसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर दक्षतेचा उपाय म्हणून आतापर्यंत ९० लोकांना अटक तसेच समाजमाध्यमांवरील ८ हजारांहून अधिक आक्षेपार्ह पोस्टविरोधात कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये शनिवारपासून ७७ लोकांना अटक झाली आहे. त्यात या राज्यात रविवारी ताब्यात घेतलेल्या ४० लोकांचा समावेश आहे. सोशल मिडियवरील ८२७५ आक्षेपार्ह पोस्टविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.>अनुचित प्रकार नाहीअयोध्येत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बाराबंकी, आझमगढ, आंबेडकर नगर व लखनऊला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही सुरळीत सुरू आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त अयोध्येत रविवारी काढण्यात येणारी मिरवणूक रद्द करण्यात आली.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर