शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

फ्रान्समध्ये अडवलेले विमान भारतात पोहोचले, ३०३ प्रवासी गेले होते, २७६ परतले; राहिलेले २७ भारतीय कुठे आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 08:21 IST

फ्रान्सने अडवलेले रोमानियन विमान मुंबईत उतरले आहे. त्यात २७६ प्रवासी होते. हे विमान दुबईहून निकाराग्वाला जात होते, तेव्हा त्यात ३०३ प्रवासी होते.

मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्समध्ये अडवलेले रोमानियन विमान भारतात पोहोचले आहे. या विमानात २७६ प्रवासी होते. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास विमान मुंबईत पोहोचले. हे विमान सोमवारी दुपारी २.३० वाजता निघाले होते. हे विमान दुबईहून निकाराग्वाला जात होते, तेव्हा त्यात ३०३ प्रवासी होते.

पण जेव्हा हे विमान भारतात परतले तेव्हा त्यात फक्त २७६ प्रवासी होते. यातील २७ प्रवासी कुठे गेले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गुरूवारी या विमानाला मानवी तस्करीच्या संशयावरून पॅरिसपासून १५० किमी पूर्वेला वेट्री विमानतळावर थांबवण्यात आले होते. या विमानात २१ महिन्यांच्या मुलासह ११ अल्पवयीनांचाही समावेश होता. फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी रविवारी विमानाला पुन्हा उड्डाण करण्याची परवानगी दिली.

लेह, लडाख हादरले! पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के

२ भारतीय कुठे आहेत?

सोमवारी या विमानाने २७६ प्रवाशांसह भारताकडे उड्डाण केले. उर्वरित २७ प्रवाशांपैकी २५ प्रवाशांनी फ्रान्समध्ये राहण्यासाठी अर्ज केला आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. अन्य दोन प्रवाशांना न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले, तेथून त्यांची सुटका करण्यात आली. सोमवारी हे विमान भारतात रवाना झाल्यानंतर फ्रान्समधील भारतीय दूतावासाने फ्रेंच अधिकाऱ्यांचे आभार मानले.

फ्रान्समधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले तसेच प्रवाशांच्या सुरक्षित परतीची खात्री करण्यासाठी घटनास्थळी उपस्थित असलेल्या दूतावासाच्या टीमसोबत काम केल्याबद्दल धन्यवाद. भारतातील एजन्सींनाही धन्यवाद.

मानवी तस्करीसाठी २० वर्षांची शिक्षा

मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रेंच अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दोन जणांना ताब्यात घेतले. शनिवारी त्यांच्या कोठडीत ४८ तासांची वाढ करण्यात आली. दरम्यान, विमान कंपनीने तस्करीत सहभाग असल्याचा नकार दिला. फ्रान्समध्ये मानवी तस्करीसाठी २० वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.

टॅग्स :Franceफ्रान्स