नवी दिल्ली : आता ‘उडान’ (उडे देश का आम नागरिक) या योजनेखाली साधारणपणे एक तासाच्या विमानप्रवासाचा खर्च अडीच हजार रुपये असेल. देशातील ७0 शहरांतील आणि १२८ मार्गांवर विमानप्रवासासाठी ही सोय करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, पुणे, जळगाव या सहा ठिकाणी मुंबईहून अवघ्या अडीच हजार रुपयांमध्ये विमानाने प्रवास करता येईल. अर्थातच या ठिकाणहून मुंबईलाही तुम्ही तेवढ्याच रकमेत येऊ शकाल. याखेरीज पुणे ते नाशिक हा प्रवासही अडीच हजार रुपयांमध्ये करता येणार आहे. देशातील ७0 शहरांसाठीच्या विमानसेवेसाठी पाच विमान कंपन्यांना मान्यता देण्यात आली आहे. इंडियन एअरलाइन्सशी संबंधित एअरलाइन अलाइड सर्विसेस, स्पाइसजेट, एअर डेक्कन, एअर ओडिशा, टर्बो मेघा अशी कंपन्यांची नावे आहेत. स्पाइसजेट, एअर डेक्कन व एअरलाइन अलाइड सर्विसेस या कंपन्यांनी सेवा महाराष्ट्रात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)या सेवेसाठी सुरुवातीला १७/१८ आसनक्षमता असलेल्या विमानांचा वापर केला जाणार आहे. या कंपन्यांनी एका तासाच्या प्रवासासाठी अडीच हजार रुपयांहून अधिक रक्कम आकारू नये, असे बंधन घालण्यात आले आहे.नागरी विमान वाहतूक सचिव आर. एन. चौबे यांनी सांगितले की, ७0 शहरांची सध्या उडानसाठी निवड करण्यात आली आहे. या ७0पैकी ३१ विमानतळांवर सध्या विमाने येत वा जात नाहीत, तर १२ विमानतळे पूर्ण क्षमतेने वापरली जात नाहीत. सिमला-कुल्लु मनाली आले टप्प्यातही सेवा सिमला व कुल्लु-मनालीसाठीही असेल. सध्या मुंबईहून हिमाचल प्रदेशात जाण्यासाठी विमानसेवा नाही; आणि दिल्लीहूनही तिथे जाण्यासाठी विमानसेवा नाही.त्यामुळे दिल्लीहून बसने सिमला वा रेल्वेने चंदीगढ व तेथून सिमला असे जावे लागते आणि त्यात खूपच वेळ लागतो. आता मात्र दिल्लीहून तिथे थेट विमानाने जाता येईल.
अडीच हजार रुपयांत विमानाने प्रवास!
By admin | Updated: March 31, 2017 04:41 IST