शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Flashback 2015 - जानेवारी ते मार्च

By admin | Updated: December 19, 2015 00:00 IST

२७ मार्च रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना तर ३० मार्च रोजी दिवंगत स्वातंत्र्यसैनिक मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होणा-या नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणा-या अत्यंत वादग्रस्त अशा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट २००० मधले ६६ ए हे कलम घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ...

२७ मार्च रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना तर ३० मार्च रोजी दिवंगत स्वातंत्र्यसैनिक मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होणा-या नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणा-या अत्यंत वादग्रस्त अशा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट २००० मधले ६६ ए हे कलम घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २४ मार्च रोजी दिला. २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात फेसबुकवर टिप्पणी केलेल्या २ मुलींवर पोलीसांनी केलेल्या कारवाईनंतर हा प्रश्न ऐरणीवर आला होता.

आंध्रप्रदेशमधून तेलंगणा या स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्यात आली आणि आंध्रासाठी नवी राजधानी उभारण्याचे ठरले. विजयवाडा आणि गंटूरच्या मध्ये थुल्लूरजवळ उभारण्यात येणा-या या राजधानीचे नाव अमरावती असे ठेवण्याचा निर्णय २३ मार्च रोजी घेण्यात आला.

१६ फेब्रुवारी रोजी कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूरमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या. यातच २० फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. नरेंद्र दाभोलकरांच्या ह्तेयमागोमाग काही महिन्यांतच झालेल्या या हत्येचे पडसाद राज्यातच नव्हे तर देशभरात उमटले.

स्वाईन फ्ल्यूची भीती पश्चिमेकडच्या राज्यांना भेडसावत होती. १५ जानेवारीपर्यंत स्वाइन फ्ल्यूच्या बळींची संख्या ५८५ एवढी झाली. यामध्ये राजस्थान (१६५) गुजरात (१४४) मध्य प्रदेश (७६) व महाराष्ट्रात ५८ जणांनी प्राण गमावले.

फेब्रुवारीच्या १० तारखेला दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने इतिहास घडवला. दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६७ जागा जिंकत आपने भाजपाच्या विजयी रथ जमिनीवर आणला. या यशाचे शिल्पकार असलेल्या अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि दिल्ली हे भारतामधले पहिले भ्रष्टाचारमुक्त राज्य करण्याची ग्वाही दिली.

३१ जानेवारी रोजी भारताने सर्वाधिक लांबच्या पल्ल्याच्या अग्नी - ५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रवाहू असून याची क्षमता ५००० कि.मी. इतक्या अंतरावर मारा करण्याची आहे. म्हणजे पश्चिमेला जवळपास संपूर्ण युरोप आणि पूर्वेला चीनच्या बहुतांश भूभागापर्यंत हे क्षेपणास्त्र डागले जाऊ शकते.

२६ जानेवारी रोजी भारताच्या ६६ व्या प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. अमेरिकेच्या अध्यक्षांनी अशा प्रकारे सहभागी होण्याचा हा इतिहासातला पहिलाच प्रसंग. तीन दिवसांच्या ओबामांच्या भेटीने भारत अमेरिका संबंध घट्ट होत चालल्याचं दिसून आलं.

प्रेषित मोहम्मदांची व्यंगचित्रे छापणा-या फ्रान्समधल्या चार्ली हेब्दो या नियतकालिकाच्या पॅरीसमधल्या कार्यालयावर ७ जानेवारी रोजी दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ११ जण ठार झाले तर ११ जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी अल कायदाने घेतली.

महेंद्रसिंग धोनीने ३० डिसेंबर रोजी तडकाफडकी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. परदेशात मिळालेल्या सततच्या पराभवानंतर आणि भारतीय ड्रेसिंग रुममधील बदलत्या समीकरणांमुळे हा निर्णय घेतल्याचं समजते. ६ जानेवारी रोजी विराट कोहलीकडे भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले.

नवीन वर्षाची सुरुवातच गुजरातजवळ समुद्रात एका पाकिस्तानी बोटीच्या स्फोटानं झाली. भारताच्या सागरी तटरक्षक दलाने या बोटीला हटकल्यावर बोटीवर असलेल्या दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणल्याचे केंद्र सरकारने सांगितले आणि २६/११ सारख्या आणखी एका हल्ल्याचा कट उधळला गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली.