शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

मुंबईच्या बेशिस्त प्रवाशावर पाच वर्षे विमान प्रवासबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:44 IST

जेट एअरवेजने व्यवसायाने ज्वेलर असलेल्या बिरजू प्रसाद सल्ला या मुंबईच्या प्रवाशावर पाच वर्षांसाठी हवाई प्रवासबंदी लागू केली आहे.

नवी दिल्ली : विमानाचे अपहरण करण्यात आल्याची आवई उठवून विमान आणि प्रवाशांच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केल्याबद्दल जेट एअरवेजने व्यवसायाने ज्वेलर असलेल्या बिरजू प्रसाद सल्ला या मुंबईच्या प्रवाशावर पाच वर्षांसाठी हवाई प्रवासबंदी लागू केली आहे.बेशिस्त प्रवाशांवर अशा प्रकारची कारवाई करण्याची आणि त्यांना ‘नो प्लार्इंग लिस्ट’वर टाकण्याची नियमावली नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लागू केल्यानंतर प्रवाशावर अशा प्रकारची कारवाई केली जाण्याची ही पहिली वेळ आहे.सल्ला यांचे नाव जेट एअरवेजने ‘नो फ्लाइंग लिस्ट’ मध्ये टाकले असले तरी ही बंदी फक्त त्याच कंपनीच्या विमानांच्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांना लागू होईल. बंदी घातलेल्या प्रवाशास विमानाने प्रवास करू द्यायचा की नाही याचा निर्णय इतर कंपन्या घेऊ शकतील.गेल्या वर्षी ३० आॅक्टोबर रोजी जेटच्या मुंबई-दिल्ली विमानाने प्रवास करत असताना सल्ला यांनी बिझनेस क्लासच्या स्वच्छतागृहात विमान अपहरणाची घबराट निर्माण करणारी एक चिठ्ठी ठेवली होती. त्यात ‘१२ अपहरणकर्त्यांनी विमान ताब्यात घेतले आहे व सामान ठेवायच्या जागेत स्फोटकेही आहेत. विमान दिल्लीला न उतरविता थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेऊन जावे. तसे न केल्यास अनेक प्रवाशांना हकनाक प्राणास मुकावे लागेल’, असे लिहिले होते.यानंतर विमान अहमदाबादला उतरवून तपासणी केली असता सल्ला यांनी चिठ्ठीत लिहिलेली धमकीवजा माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे निष्पन्न झाले होते.समितीने केली चौकशी‘नो फ्लाइंग लिस्ट’साठी तयार करण्यात आलेल्या नियमानुसार जेट एअरवेजने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या घटनेची चौकशी केली व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन समितीच्या शिफारशीनुसार सल्ला यांच्यावर पाच वर्षांसाठी प्रवासबंदी लागू केली.

टॅग्स :Jet Airwaysजेट एअरवेज