शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पाच हजार भारतीयांना बनवले ‘सायबर गुलाम’, ५०० कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 05:47 IST

या सायबर गुन्ह्यांतून गेल्या सहा महिन्यांत भारतीय नागरिकांना सुमारे ५०० कोटी रुपयांना लुबाडण्यात आले आहे.

नवी दिल्ली : कंबोडिया या देशामध्ये सायबर गुलामगिरीत अडकलेल्या पाच हजारहून अधिक भारतीयांना सायबर गुन्हे करण्यास भाग पाडले जात आहे. त्यांच्याकडून भारतातील लोकांचीच फसवणूक करण्यात येते. या सायबर गुन्ह्यांतून गेल्या सहा महिन्यांत भारतीय नागरिकांना सुमारे ५०० कोटी रुपयांना लुबाडण्यात आले आहे.

कंबोडियातील सायबर गुलामगिरीत अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, इंडिया सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर व सुरक्षा तज्ज्ञांशी सल्लामसलत केली आहे. कंबोडियामध्ये भारतीयांची मानवी तस्करी झाली आहे. त्यांना त्या सापळ्यातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. विदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लाखो भारतीयांची अशी केली जाते फसवणूकभारतातील लोकांशी कंबोडियातून इंटरनेट, सोशल मीडियाद्वारे संपर्क डेटिंग ॲपवर महिला असल्याचे भासवून समोरच्या व्यक्तीशी चॅटिंग केले जाते. त्यानंतर त्या व्यक्तीला क्रिप्टोकरन्सी व्यवहारांमध्ये सहभागी होण्यासाठी राजी केले जाते. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांसाठी तयार केलेल्या ऑनलाइन ॲपमध्ये भारतातील व्यक्तीला पैसे गुंतविण्यास सांगितले जाते. एकदा हा आर्थिक व्यवहार झाला की गुंतवणूकदाराला लक्षात येते की, आपली फसवणूक झाली आहे. कारण, हे ॲप बनावट असतात.

...तर दिला जातो  इलेक्ट्रिक शॉक विदेशात नोकरी मिळवून देण्याचे एजंटांकडून आमिष दाखविले जाते. त्यानंतर भारतातील लोकांना विदेशात नेऊन तिथे त्यांची फसवणूक केली जाते. नोकरीच्या आशेने गेलेल्या भारतीयांना तिथे सायबर गुन्हे करण्यास भाग पाडण्यात आले. भारतातील लोकांना लक्ष्य करण्यास सांगितले जाते.कंपन्या पासपोर्ट घेतात आणि नंतर त्यांना घोटाळे करण्यासाठी १२ तास कामाला जुंपतात. असे काम करण्यास कोणी नकार दिल्यास त्याचा शारीरिक छळ केला जातो. त्यांना इलेक्ट्रिक शॉक दिला जातो. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम