शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

पाच हजार भारतीयांना बनवले ‘सायबर गुलाम’, ५०० कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 05:47 IST

या सायबर गुन्ह्यांतून गेल्या सहा महिन्यांत भारतीय नागरिकांना सुमारे ५०० कोटी रुपयांना लुबाडण्यात आले आहे.

नवी दिल्ली : कंबोडिया या देशामध्ये सायबर गुलामगिरीत अडकलेल्या पाच हजारहून अधिक भारतीयांना सायबर गुन्हे करण्यास भाग पाडले जात आहे. त्यांच्याकडून भारतातील लोकांचीच फसवणूक करण्यात येते. या सायबर गुन्ह्यांतून गेल्या सहा महिन्यांत भारतीय नागरिकांना सुमारे ५०० कोटी रुपयांना लुबाडण्यात आले आहे.

कंबोडियातील सायबर गुलामगिरीत अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, इंडिया सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर व सुरक्षा तज्ज्ञांशी सल्लामसलत केली आहे. कंबोडियामध्ये भारतीयांची मानवी तस्करी झाली आहे. त्यांना त्या सापळ्यातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. विदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लाखो भारतीयांची अशी केली जाते फसवणूकभारतातील लोकांशी कंबोडियातून इंटरनेट, सोशल मीडियाद्वारे संपर्क डेटिंग ॲपवर महिला असल्याचे भासवून समोरच्या व्यक्तीशी चॅटिंग केले जाते. त्यानंतर त्या व्यक्तीला क्रिप्टोकरन्सी व्यवहारांमध्ये सहभागी होण्यासाठी राजी केले जाते. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांसाठी तयार केलेल्या ऑनलाइन ॲपमध्ये भारतातील व्यक्तीला पैसे गुंतविण्यास सांगितले जाते. एकदा हा आर्थिक व्यवहार झाला की गुंतवणूकदाराला लक्षात येते की, आपली फसवणूक झाली आहे. कारण, हे ॲप बनावट असतात.

...तर दिला जातो  इलेक्ट्रिक शॉक विदेशात नोकरी मिळवून देण्याचे एजंटांकडून आमिष दाखविले जाते. त्यानंतर भारतातील लोकांना विदेशात नेऊन तिथे त्यांची फसवणूक केली जाते. नोकरीच्या आशेने गेलेल्या भारतीयांना तिथे सायबर गुन्हे करण्यास भाग पाडण्यात आले. भारतातील लोकांना लक्ष्य करण्यास सांगितले जाते.कंपन्या पासपोर्ट घेतात आणि नंतर त्यांना घोटाळे करण्यासाठी १२ तास कामाला जुंपतात. असे काम करण्यास कोणी नकार दिल्यास त्याचा शारीरिक छळ केला जातो. त्यांना इलेक्ट्रिक शॉक दिला जातो. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम