शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मध्य प्रदेशात पोलिसांकडून शेतक-यांवर गोळीबार, पाच जणांचा मृत्यू

By admin | Updated: June 6, 2017 18:18 IST

मध्य प्रदेशातील मंदसौरच्या पार्श्वनाथ येथे सुरु असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात पाच शेतक-यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

ऑनलाइन लोकमत
मंदसौर, दि. 06 - मध्य प्रदेशातील मंदसौरच्या पार्श्वनाथ येथे सुरु असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात पाच शेतक-यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
दोन जूनपासून मंदसौरमध्ये शेतक-यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनादरम्यान, येथील पार्श्वनाथमध्ये काही आंदोलकांकडून बसेसची जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली. यावेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी सीआरपीएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. यावेळी आंदोलक शेतकरी आणि पोलीस यांच्यात संघर्ष सुरु झाला. यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार शेतकरी जखमी झाले असून पाच शेतक-यांचा मृत्यू झाल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे, मध्यप्रदेशातील मंदसौर, रतलाम आणि उज्जैनमधील शेतक-यांचे आंदोलन पाहता, या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. याप्रकरणी राष्ट्रीय किसान मजदूर संघाकडून उद्या बंद पुकारण्यात आला आहे.  
दरम्यान, पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला नाही. गोळीबाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, सरकारकडून कोणतीही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली नाही किंवा संचारबंदी लागू करण्यात आली नाही, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले होते. मात्र, आंदोलनाला हिंसक वळण आल्याने संवेदनशील भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 
सगल पाच वर्षे केंद्र सरकारकडून कृषी कर्मण पुरस्कार मिळविणा-या मध्य प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान, अद्याप या शेतक-यांच्या मागण्या मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या नसून शेतकरी सुद्धा आपल्या मागण्यावर ठाम असून आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.