शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

काश्मीरमध्ये चकमकीत पाच जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 04:40 IST

जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी ५६ तास चाललेल्या चकमकीत लष्कर-ए-तयब्बाचे दोन जण, सीमा सुरक्षादलाच्या (सीआरपीएफ) अधिकाऱ्यासह पाच सुरक्षादल कर्मचारी व एक नागरिक ठार झाला.

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी ५६ तास चाललेल्या चकमकीत लष्कर-ए-तयब्बाचे दोन जण, सीमा सुरक्षादलाच्या (सीआरपीएफ) अधिकाऱ्यासह पाच सुरक्षादल कर्मचारी व एक नागरिक ठार झाला. सुरक्षादलांकडून ही कारवाई कुपवाडाच्या बाबागुंड भागात झाली.सुरक्षादलांसाठी हा भाग अत्यंत कठीण समजला जातो. शुक्रवारी सकाळी सुरू झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी मारले गेले. पोलिसांनी सांगितले की लष्कर ए तयब्बाशी संबंधित या अतिरेक्यांचे मृतदेह चकमकीच्या ठिकाणी हाती लागले. दोन अतिरेक्यांपैकी एक जण हा पाकिस्तानचा आहे. दुसऱ्याची ओळख पटवली जात आहे. सीआरपीएफचे जवान शाम नारायण सिंह यादव हे शुक्रवारी चकमकीत जखमी झाले होते त्यांचा रविवारी मृत्यू झाला. यामुळे सुरक्षादलाच्या मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या पाच झाली आहे. सीआरपीएफचे निरीक्षक पिंटू आणि कॉन्स्टेबल विनोद आणि सिलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल नसीर अहमद आणि गुलाम मुस्तफा बाराह यांचा शुक्रवारी चकमकीत मृत्यू झाला. वसीम अहमद मिर हा नागरिकही बंदुकीची गोळी लागून जखमी झाला होता. त्याचा रुग्णालयात शुक्रवारी मृत्यू झाला. बाबागुंड भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी शुक्रवारी सकाळी त्या भागात त्यांचा शोध सुरू केला होता. अतिरेकी लपले होते तो भाग खूपच दाटीवाटीचा व अडचणींचा आहे. चकमकीच्या ठिकाणाहून तेथील घरांत राहणाºयांना हलवण्यात आले होते.