शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

पोलीस गोळीबारातच पाच शेतकऱ्यांचा मृत्यू

By admin | Updated: June 9, 2017 03:50 IST

मंदसौरमध्ये पोलीस गोळीबारातच पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची कबुली गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी गुरुवारी दिली.

भोपाळ : मंदसौरमध्ये पोलीस गोळीबारातच पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची कबुली गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी गुरुवारी दिली. आधी पोलिसांनी गोळीबार केलाच नव्हता, असा दावा मध्य प्रदेश सरकार करीत होते. पण पोलीस गोळीबार करीत असल्याची चित्रफीत जाहीर झाल्यानंतर गृहमंत्र्यांना ही कबुली द्यावी लागली. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा दावा सरकारने केला असला तरी पोलिसांनी बुधवारी रात्रीपासून सुमारे ७0 शेतकऱ्यांना अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्यामुळे मंदसौर भागात अद्याप तणाव असून, तिथे रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या तुकड्या पाठवण्यात आल्या. पोलीस अधीक्षक ओ. पी. त्रिपाठी व जिल्हाधिकारी स्वतंत्रकुमार यांच्यामुळे मंदसौरमधील वातावरण बिघडले, असा शेतकऱ्यांचा आरोप होता. अखेर त्या दोघांच्या बदलीचे आदेशही सरकारला द्यावे लागले. त्या भागातील आयपीएस व आयएएस अशा आठ अधिकाऱ्यांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. त्यांनी परिस्थिती नीट हाताळली नाही, असे सरकारचेही मत असल्याचे सांगण्यात येते. पिपलीमंडीचे पोलीस निरीक्षक अनिलसिंह ठाकूर यांना फिल्ड ड्यूटीवरून हटविण्यात आले आहे.राज्यात रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचे १,१०० जवान तैनात करण्यात आले आहेत. स्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात असल्याचे पोलीस सांगत आहेत. डीआयजी अविनाश शर्मा पिपलीमंडीत स्वत: लक्ष ठेवून आहेत. कर्जमाफी आणि शेतमालाला रास्त भाव मिळण्याच्या मागणीसाठी येथील शेतकरी सात दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. संतप्त शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी सरकारने ‘लोन सेटलमेंट स्कीम’ सुरू केली आहे. सहा लाख शेतकऱ्यांना लाभ देत ६,००० कोटी सरकारजमा करणार आहे. >शेतकऱ्यांच्या पैशातून गोळ्यांची खरेदी?नवी दिल्ली : कृषिकल्याण उपकरातून सरकार गोळीबाराच्या गोळ्या खरेदी करीत आहे का? यासाठीच नागरिक हा कर भरत आहेत का? असा संतप्त सवाल माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी केला आहे. येचुरी यांनी टिष्ट्वट केले आहे की, तीन वर्षांतील कृषिमंत्रालयाच्या कामाची माहिती देण्यासाठी कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती; पण ती आता रद्द करण्यात आली आहे....तर उत्तर प्रदेशातही मंदसौर घडेल!उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत नाही तर राज्यात मंंदसौरसारख्या परिस्थितीला तोंड द्यायची तयारी ठेवावी, असा इशारा राष्ट्रीय किसान मंचचे अध्यक्ष शेखर दीक्षित यांनी गुरुवारी येथे दिला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पीक कर्जमाफीची योजना जाहीर केली होती. त्यावर टीका करताना दीक्षित म्हणाले की, शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न आहेत तो त्यांना किमान आधारभूत किंमत मिळण्याचा व हा भाव बहुसंख्य शेतकऱ्यांना मिळतच नाही.