शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

पोलीस गोळीबारातच पाच शेतकऱ्यांचा मृत्यू

By admin | Updated: June 9, 2017 03:50 IST

मंदसौरमध्ये पोलीस गोळीबारातच पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची कबुली गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी गुरुवारी दिली.

भोपाळ : मंदसौरमध्ये पोलीस गोळीबारातच पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची कबुली गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी गुरुवारी दिली. आधी पोलिसांनी गोळीबार केलाच नव्हता, असा दावा मध्य प्रदेश सरकार करीत होते. पण पोलीस गोळीबार करीत असल्याची चित्रफीत जाहीर झाल्यानंतर गृहमंत्र्यांना ही कबुली द्यावी लागली. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा दावा सरकारने केला असला तरी पोलिसांनी बुधवारी रात्रीपासून सुमारे ७0 शेतकऱ्यांना अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्यामुळे मंदसौर भागात अद्याप तणाव असून, तिथे रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या तुकड्या पाठवण्यात आल्या. पोलीस अधीक्षक ओ. पी. त्रिपाठी व जिल्हाधिकारी स्वतंत्रकुमार यांच्यामुळे मंदसौरमधील वातावरण बिघडले, असा शेतकऱ्यांचा आरोप होता. अखेर त्या दोघांच्या बदलीचे आदेशही सरकारला द्यावे लागले. त्या भागातील आयपीएस व आयएएस अशा आठ अधिकाऱ्यांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. त्यांनी परिस्थिती नीट हाताळली नाही, असे सरकारचेही मत असल्याचे सांगण्यात येते. पिपलीमंडीचे पोलीस निरीक्षक अनिलसिंह ठाकूर यांना फिल्ड ड्यूटीवरून हटविण्यात आले आहे.राज्यात रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचे १,१०० जवान तैनात करण्यात आले आहेत. स्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात असल्याचे पोलीस सांगत आहेत. डीआयजी अविनाश शर्मा पिपलीमंडीत स्वत: लक्ष ठेवून आहेत. कर्जमाफी आणि शेतमालाला रास्त भाव मिळण्याच्या मागणीसाठी येथील शेतकरी सात दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. संतप्त शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी सरकारने ‘लोन सेटलमेंट स्कीम’ सुरू केली आहे. सहा लाख शेतकऱ्यांना लाभ देत ६,००० कोटी सरकारजमा करणार आहे. >शेतकऱ्यांच्या पैशातून गोळ्यांची खरेदी?नवी दिल्ली : कृषिकल्याण उपकरातून सरकार गोळीबाराच्या गोळ्या खरेदी करीत आहे का? यासाठीच नागरिक हा कर भरत आहेत का? असा संतप्त सवाल माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी केला आहे. येचुरी यांनी टिष्ट्वट केले आहे की, तीन वर्षांतील कृषिमंत्रालयाच्या कामाची माहिती देण्यासाठी कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती; पण ती आता रद्द करण्यात आली आहे....तर उत्तर प्रदेशातही मंदसौर घडेल!उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत नाही तर राज्यात मंंदसौरसारख्या परिस्थितीला तोंड द्यायची तयारी ठेवावी, असा इशारा राष्ट्रीय किसान मंचचे अध्यक्ष शेखर दीक्षित यांनी गुरुवारी येथे दिला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पीक कर्जमाफीची योजना जाहीर केली होती. त्यावर टीका करताना दीक्षित म्हणाले की, शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न आहेत तो त्यांना किमान आधारभूत किंमत मिळण्याचा व हा भाव बहुसंख्य शेतकऱ्यांना मिळतच नाही.