शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

वनविभागाने मागविले पाच पिंजरे आजपासून जनजागृती मोहीम राबविणार :

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

जळगाव- बिबट्या सारख्या वन्यजीवांना कै द करणारे पाच पिंजरे वन विभागाकडून मागविण्यात आले आहेत़ पूर्वतयारी म्हणून पिंजरे मागविण्यात आले आहेत़ वरिष्ठ अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय त्यांचा वापर केला जाणार नसल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे़

जळगाव- बिबट्या सारख्या वन्यजीवांना कै द करणारे पाच पिंजरे वन विभागाकडून मागविण्यात आले आहेत़ पूर्वतयारी म्हणून पिंजरे मागविण्यात आले आहेत़ वरिष्ठ अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय त्यांचा वापर केला जाणार नसल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे़
गेल्या काही दिवसांपासून शिरसोली आणि हिंगळे शिवारात बिट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे़ यामुळे नागरिकांच्या मनात अनैक गैरसमज निर्माण झाले आहेत़ शेतकर्‍यांमध्य ेभीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ यापार्श्वभूमिवर पूर्व तयारी म्हणून वन विभागाकडून मंगळवारी ५ पिंजरे मागविण्यात आले आहेत़ जळगाव वन विभागाचे सहायक वन संरक्षक डी़आऱ पाटील यांनी ही माहिती दिली़

इन्फो
आजपासून जनजागृती
बिबट आणि वाघ यासारख्या वन्यजीवांपासून आपला बचाव कसा करावा़ वन्यजीवांची मानसिकता कशी ओळखावी़ त्यांचा अधिवास कसा ओळखावा, याबाबत वन विभागाकडून वनक्षेत्र लगतच्या गावांमध्ये गुरुवारपासून जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे़ या मोहिमेंतर्गत विविध ठिकाणी कार्यशाळा, शिबिरे घेतली जातील़ तसेच माहितीपत्रके वाटली जाणार आहेत़
पिंजरे लावणे अशक्य
वन विभागाच्या नियमानुसार आणि सध्यस्थिती पाहता बिबट्याला कैद करण्यासाठी पिंजरे लावणे अशक्य असल्याचे वन विभागाच्या एका अधिकार्‍याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले़ तशी परिस्थिती निर्माण झाल्यास वरिष्ठांच्या परवानगीने पिंजरे लावले जातील़ जैन हिल्स मध्ये दिसलेला बिबट्या हा पौढ नाही़ दोन ते अडीच वर्षाचे ते पिल्लू आहे़ त्यामुळे खुलेआमपणे तो परिसरात भटकत असून त्यापासून कोणालाही भीती नसल्याचेदेखील त्या अधिकार्‍याने सांगितले़
प्रत्येक १० कि़मी़ बिबट्याच वावर
जिल्‘ाची भौगोलिक स्थिती पाहता १० ते १२ कि़मी़ अंतरावर बिबट्याचा वावर आहे़ वनक्षेत्रापर्यंत मानवी वस्ती येऊन ठेपलेली आहे़ अन्नाच्या शोधात बिबट्यासारखे वन्यजीव गावात येतात़ मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष भविष्यात वाढत जाणारा आहे़ त्यांच्यासोबत राहण्याचे मानवाला शिकावे लागेल़ त्यांचा अधिवास आपल्याला मान्य केला पाहिजे, असे वन विभागाच्या एका अधिकार्‍याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले़
नागरिकांनी धीर धरवा
बिबट्या मानवी वस्तीत अन्नाच्या शोधात येतो़ तो माणसांवर एकाकी हल्ला चढवत नाही़ त्याचा वावर नैसर्गिक आहे़ नागरिकांनी धीर धरवा़ काही समस्या असल्यास वन विभागशी संपर्क साधावा़ दक्ष रहावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे़