शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

वनविभागाने मागविले पाच पिंजरे आजपासून जनजागृती मोहीम राबविणार :

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

जळगाव- बिबट्या सारख्या वन्यजीवांना कै द करणारे पाच पिंजरे वन विभागाकडून मागविण्यात आले आहेत़ पूर्वतयारी म्हणून पिंजरे मागविण्यात आले आहेत़ वरिष्ठ अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय त्यांचा वापर केला जाणार नसल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे़

जळगाव- बिबट्या सारख्या वन्यजीवांना कै द करणारे पाच पिंजरे वन विभागाकडून मागविण्यात आले आहेत़ पूर्वतयारी म्हणून पिंजरे मागविण्यात आले आहेत़ वरिष्ठ अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय त्यांचा वापर केला जाणार नसल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे़
गेल्या काही दिवसांपासून शिरसोली आणि हिंगळे शिवारात बिट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे़ यामुळे नागरिकांच्या मनात अनैक गैरसमज निर्माण झाले आहेत़ शेतकर्‍यांमध्य ेभीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ यापार्श्वभूमिवर पूर्व तयारी म्हणून वन विभागाकडून मंगळवारी ५ पिंजरे मागविण्यात आले आहेत़ जळगाव वन विभागाचे सहायक वन संरक्षक डी़आऱ पाटील यांनी ही माहिती दिली़

इन्फो
आजपासून जनजागृती
बिबट आणि वाघ यासारख्या वन्यजीवांपासून आपला बचाव कसा करावा़ वन्यजीवांची मानसिकता कशी ओळखावी़ त्यांचा अधिवास कसा ओळखावा, याबाबत वन विभागाकडून वनक्षेत्र लगतच्या गावांमध्ये गुरुवारपासून जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे़ या मोहिमेंतर्गत विविध ठिकाणी कार्यशाळा, शिबिरे घेतली जातील़ तसेच माहितीपत्रके वाटली जाणार आहेत़
पिंजरे लावणे अशक्य
वन विभागाच्या नियमानुसार आणि सध्यस्थिती पाहता बिबट्याला कैद करण्यासाठी पिंजरे लावणे अशक्य असल्याचे वन विभागाच्या एका अधिकार्‍याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले़ तशी परिस्थिती निर्माण झाल्यास वरिष्ठांच्या परवानगीने पिंजरे लावले जातील़ जैन हिल्स मध्ये दिसलेला बिबट्या हा पौढ नाही़ दोन ते अडीच वर्षाचे ते पिल्लू आहे़ त्यामुळे खुलेआमपणे तो परिसरात भटकत असून त्यापासून कोणालाही भीती नसल्याचेदेखील त्या अधिकार्‍याने सांगितले़
प्रत्येक १० कि़मी़ बिबट्याच वावर
जिल्‘ाची भौगोलिक स्थिती पाहता १० ते १२ कि़मी़ अंतरावर बिबट्याचा वावर आहे़ वनक्षेत्रापर्यंत मानवी वस्ती येऊन ठेपलेली आहे़ अन्नाच्या शोधात बिबट्यासारखे वन्यजीव गावात येतात़ मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष भविष्यात वाढत जाणारा आहे़ त्यांच्यासोबत राहण्याचे मानवाला शिकावे लागेल़ त्यांचा अधिवास आपल्याला मान्य केला पाहिजे, असे वन विभागाच्या एका अधिकार्‍याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले़
नागरिकांनी धीर धरवा
बिबट्या मानवी वस्तीत अन्नाच्या शोधात येतो़ तो माणसांवर एकाकी हल्ला चढवत नाही़ त्याचा वावर नैसर्गिक आहे़ नागरिकांनी धीर धरवा़ काही समस्या असल्यास वन विभागशी संपर्क साधावा़ दक्ष रहावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे़