शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

व्यंकय्या नायडू स्वातंत्र्यानंतर जन्मलेले देशाचे पहिले उपराष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 11:49 IST

देशाचे 13 वे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी पदाची शपथ घेतली. शपथग्रहण केल्यानंतर व्यंकय्या नायडू संसदेत आले त्यावेळी राज्यसभेत सर्वपक्षीय खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले.

ठळक मुद्दे5 ऑगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीत एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी मोठया मताधिक्क्याने विजय मिळवला.

नवी दिल्ली, दि. 11 - देशाचे 13 वे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी पदाची शपथ घेतली. शपथग्रहण केल्यानंतर व्यंकय्या नायडू संसदेत आले त्यावेळी राज्यसभेत सर्वपक्षीय खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले. व्यंकय्या नायडू स्वातंत्र्यानंतर जन्मलेले देशाचे पहिले उपराष्ट्रपती आहेत असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. व्यंकय्या नायडू यांनी बराचकाळ राज्यसभेत काढला आहे त्यामुळे राज्यसभेचे कामकाज कसे चालते याची त्यांना माहिती आहे असे मोदी म्हणाले. 

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची भेट कोणी दिली असेल तर, ते व्यंकय्या नायडू आहेत. शेती, शेतकरी यांच्या समस्या त्यांना चांगल्या प्रकारे समजतात अशा शब्दात मोदींनी त्यांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यंकय्या यांच्या सन्मानार्थ खास शायरीचेही वाचन केले. काँग्रेसतर्फे गुलाम नबी आझाद यांनीही व्यंकय्या नायडूंचे कौतुक केले. तळागाळातून आलेल्या व्यक्तीने देशाचे उपराष्ट्रपती होणे ही मोठी बाब आहे. हेच आपल्या लोकशाहीचे वैशिष्टय आहे असे आझाद म्हणाले.  

राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते.

5 ऑगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीत नायडू यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव केला होता. राष्ट्रपतिपदापाठोपाठ उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बाजी मारली. 5 ऑगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीत एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी मोठया मताधिक्क्याने विजय मिळवला. पहिल्या फेरीपासून व्यंकय्या नायडू आघाडीवर होते.  एकूण 771 लोकप्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला. व्यंकय्या नायडू यांना 516 तर, विरोधी पक्षांचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांना 244 मते मिळाली होती. तर 11 मतं बाद गेली. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने गोपाळकृष्ण गांधी यांना मतदान केले होते. 

शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यक्तीने उपराष्ट्रपती होणे हा सन्मान - व्यंकय्या नायडूउपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवल्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी त्यांना पाठिंबा देणा-या सर्व खासदारांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली होती. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा आज देशाचा उपराष्ट्रपती होतोय हा माझा  सन्मान आहे. देशाच्या संविधानाला सर्वोच्च मानून आणि माझ्या पूर्वसुरींनी ज्या परंपरा, मापदंड घालून दिलेत त्यानुसार काम करीन, अशी प्रतिक्रिया व्यंकय्या नायडू यांनी विजयानंतर दिली होती.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी