शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

पहिल्यांदाच रिटर्न फाईल करणा-यांची होणार नाही चौकशी

By admin | Updated: February 1, 2017 13:57 IST

जास्तीत जास्त लोकांनी इन्कम टॅक्स भरावा यासाठी पहिल्यांदाच इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणा-यांची चौकशी होणार नसल्याची घोषणा अरुण जेटलींनी केली.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १ - नोटाबंदीच्या धाडसी निर्णयानंतर २०१७-१८ चा केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात जास्तीत जास्त लोकांनी इन्कम टॅक्स भरावा यासाठी पहिल्यांदाच इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणा-यांची चौकशी होणार नसल्याची घोषणा अरुण जेटलींनी केली आहे.तसेच 50 लाख ते 1 कोटी करदायित्व असणा-यांना करावर 10 टक्के सरचार्ज लागणार असल्याची घोषणा करत श्रीमंतांनाही झटका दिला आहे. दरम्यान आज पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प व रेल्वे अर्थसंकल्प एकत्रित सादर झाला आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार 3 लाखांपेक्षा जास्त व्यवहार रोखीने व्यवहार करता येणार नाही. त्यामुळे रोखीने मोठ्या प्रमाणात व्यवहार करणा-यांना ही चपराक आहे. आतापर्यंत 1.48 लाख खात्यांमध्ये प्रत्येकी 80 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली असून, 1.09 कोटी खात्यांमध्ये 2 ते 80 लाखांपर्यंत रक्कम जमा झाल्याचीही माहिती अरुण जेटलींनी दिली आहे. मनरेगाच्या योजनेत महिलांचा लक्षणीय सहभाग वाढला असून, या माध्यमातून ५ लाख तलाव बांधण्याचे उद्दिष्ट असल्याचंही जेटली म्हणालेत.

(मध्यमवर्गीयांना दिलासा! 2.5 ते 5 लाखांपर्यंत उत्पन्नावर 10 ऐवजी 5 टक्के कर)(संघटीत क्षेत्रातील केवळ 1.74 कोटी कर्मचारीच भरतात टॅक्स रिटर्न)

काय आहे अर्थसंकल्पात?

- जास्तीत जास्त लोकांनी इन्कम टॅक्स भरावा यासाठी पहिल्यांदाच इन्कम रिटर्न फाईल करणा-यांची चौकशी होणार नाही.
- 50 लाख ते 1 कोटी करदायित्व असणा-यांना 10 टक्के सरचार्ज लागणार.
- एटीसी अंतर्गत गुंतवणूक केल्यास ४.५ लाख पर्यंत रक्कम असणा-यांवर ० टक्के कर.
- इन्कम टॅक्स स्लॅब : अडीच ते 5 लाखांपर्यंत 5 टक्के कर.- राजकीय पक्षांनी निधी उभारणीसाठी निवडणूक रोखे काढावेत असा प्रस्ताव जेटलींनी मांडला. यामुळे राजकीय निवडणूक क्षेत्रातील काळा पैसा संपुष्टात येईल अशी आशा आहे.
- राजकीय पक्षांना यापुढे चेक आणि डिजिटल माध्यमातून निधी स्वीकारावा लागेल.
- राजकीय पक्षांना २ हजारांपेक्षा जास्त निधी रोखीत घेता येणार नाही.
- आता 3 लाखांपेक्षा जास्त व्यवहार रोखीने करता येणार नाही.
- 50 कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांना आयकरामध्ये 5 टक्के सवलत, 30 टक्क्यांवरुन दर कमी करून 25 टक्के, 96 टक्के कंपन्यांना होणार फायदा.
- कॅपिटल गेन टॅक्सचा कालावधी आता २ वर्षांपर्यंत.
- 1.48 लाख खात्यांमध्ये प्रत्येकी 80 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा. 1.09 कोटी खात्यांमध्ये 2 ते 80 लाखांपर्यंत रक्कम जमा.
- परवडणा-या घराची व्याख्या कारपेट एरियावरून ठरणार.- वैयक्तिक प्राप्तिकर महसुलात नोटाबंदीमुळे 34.8 टक्क्यांची वाढ
- 76 लाख लोकांनी त्यांचे उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त दाखवले, 99 लाख लोकांनी त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी दाखवले.
- 99 लाख लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केले, परंतु त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा म्हणजे, करमुक्त असल्याचे दाखवले.
- कर चुकवणा-या लोकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे त्यांचा भार प्रामाणिकपणे कर चुकवणा-यांवर येतो.
- 24 लाख लोकांचे उत्पन्न वार्षिक 10 लाख रुपयांपेक्षा जास्त दाखवतात.
- 1 लाख 74 हजार जणांनी आपले उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त असल्याचे नमूद केले आहे.
- संघटित क्षेत्रात 4.1 कोटी कमर्चारी पण 1.74 कोटी कर्मचा-यांनीच रिटर्न फाईल केलं.
- नोटाबंदीमुळे बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅश जमा झाली असल्याने पुढील वर्षी महसुली तूट कमी होईल, अशी अपेक्षा.
- सध्या वित्तीय तूट 3.2 टक्के असून पुढच्यावर्षीपर्यंत 3 टक्क्याचे लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्टय आहे.
- यावर्षी वित्तीय तूट १.९ टक्के.- देश सोडून फरार झालेल्या आरोपींची संपत्ती जप्त करण्यासाठी विधेयक आणण्याचा विचार.
- संरक्षण क्षेत्रासाठी २ लाख ७४ हजार ११४ कोटींची तरतूद.
- यंदाच्या अर्थसंकल्पात एकूण 21 लाख 47 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक.
- सैनिकांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही.
- आता पोस्ट ऑफिसमधेही तुमचा पासपोर्ट बनवता येणार.
- IRCTCचे समभाग आता विक्रीस उपलब्ध, रेल्वेच्या इतर तीन कंपन्याही शेअर बाजारात येणार.
- रिझर्व्ह बँकेत डिजिटल पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड स्थापन करणार.
 - पंतप्रधान मुद्रा योजनेसाठी 2.44 लाख कोटींची तरतूद.
- सरकारी संस्थांमध्ये डिजीटल व्यवहारांना चालना देणार.
- भीम आधारीत डिजीटल व्यवहारांना चालना देणार, आधारच्या माध्यमातून डिजीटल व्यवहाराचे लक्ष्य,यामुळे मोबाईल नसला तरी व्यवहार शक्य, 20 लाख सर्विस टर्मिनल्स उभारण्याचे उद्दिष्टय.
- भीम अॅपच्या प्रमोशनसाठी कॅशबॅक आणि बक्षीस योजना.
- सौर ऊर्जेत २३ हजार अतिरिक्त मेगावॉटची क्षमता.
- सायबर गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची घोषणा.- वाहतूक क्षेत्रासाठी 2.41 लाख कोटींची तरतूद, भारत नेट प्रोजेक्टसाठी 10 हजार कोटींची तरतूद.
- पयाभूत सुविधांसाठी ३.९६ लाख कोटींची तरतूद.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी LIC पॉलिसीवर 8% टक्क रिटर्न मिळणार
- PPP मॉडेलनुसार छोट्या शहरांमध्ये विमानतळ उभारणार.
- 2014-15 पासून 1 लाख 40 हजार किमी लांबीचे रस्ते बांधले.
- राष्ट्रीय महामार्गांसाठी ६७ हजार कोटींची तरतूद.
- 2017-18 मध्ये 3500 किमीचे रेल्वे मार्ग उभारणार.
- मेट्रो रेल्वेसाठी नवीन धोरण आणणार.
- 500 रेल्वे स्थानकावर सरकते जिने आणि लिफ्ट बसवणार.
- IRCTCवरून ई-तिकीट बुक केल्यास सेवाकर लागणार नाही.
- पाचवर्षात 1 लाख कोटींचा रेल्वे सुरक्षा निधी उभारणार.
- पर्यंटन व तीर्थयात्रांसाठी नवीन खास, गाड्या सुरू करण्यात येणार.
- 2019 पर्यंत सर्व रेल्वेमध्ये बायोटॉयलेट्सची सुविधा होणार उपलब्ध.
- ऊस उत्पादनासाठी ९ हजार कोटींची तरतूद.
- रेल्वे अर्थसंकल्प 1 लाख 31 हजार कोटींचा असणार, 55 हजार कोटी सरकार देणार.
- मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएटच्या जागा 5 हजारने वाढवणार.- दलितांच्या कल्याणासाठी ५२, ३९३ कोटी रुपयांची तरतूद.
- झारखंड, गुजरातमध्ये दोन एम्स रुग्णालये स्थापन करणार.
- IIT, मेडिकल सह सर्व उच्चशैक्षणिक प्रवेश परीक्षा एकाच संस्थेकडून व्हाव्यात यासाठी 'राष्ट्रीय परीक्षा बोर्ड' स्थापन करणार.
- देशाबाहेर रोजगाराच्या संधी शोधणा-या युवकांसाठी देशभरात कौशल्य केंद्र स्थापन करणार.
- 2025 पर्यंत टीबी रोगाचा पूर्णपणे नायनाट करू.
- २०२२ पर्यंत ५ लाख लोकांना रोजगारासाठी ट्रेनिंग देण्याचे उद्दिष्ट.
- जानेवारीपर्यंत विदेशी चलन 361 अब्ज डॉलर्स इतके होते जे 12 महिन्यांच्या गरजेसाठी पुरेसे आहे.
- दूध प्रक्रिया उद्योगांसाठी 8 हजार कोटींची तरतूद.
- झारखंड आणि गुजरातमध्ये 'एम्स' स्थापन करण्यात येईल.
- तरुणांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी 'स्वयम' योजना.
- गर्भवती महिलांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा करणार
- 14 लाख अंगणवाडी सेंटर्समध्ये 500 कोटी रुपये खर्चून महिला शक्ती केंद्राची स्थापना करणार.
 - 60 टक्के गावांमध्ये शौचालये उभारण्यात आली.
- ग्रामीण भागतील विजेसाठी 4500 कोटींची तरतूद.
- ग्रामीण, शेती क्षेत्रासाठी एकूण 1लाख 87 हजार 223 कोटींची तरतूद, मागच्यावर्षीपेक्षा 24 टक्के जास्त तरतूद.
- ६०० जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कौशल्य विकास केंद्र.
- पारदर्शी व्यवहारांसाठी डिजिटल इकॉनॉमी
- अतिरेकी कारवाया, बनावट नोटा, भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी नोटाबंदी गरजेची होती- ग्रामीण भाग आणि पायाभूत सुविधा देण्यावर अर्थसंकल्पात भर दिला आहे. - उत्पादन क्षेत्रात भारत जगात सहावा क्रमांकाचा देश म्हणून समोर आला आहे - जुलै 2016 मध्ये 6 टक्के असणारा महागाई दर डिसेंबर 1016 मध्ये 3.4 टक्क्यापर्यंत कमी झाला- येत्या दोन वर्षांत विकास ७ टक्क्यांवरून ७.८ टक्क्यांवर पोहोचेल .- नोटाबंदीचे दूरगामी परिणाम होतील आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल, जे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत ठरतील- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्था वेगानं वाढत आहे- महागाई नियंत्रणात आणण्यात यश- उत्पादन क्षेत्रामध्ये भारताचा जगात सहावा क्रमांक - भारताकडे जागतिक विकासाचे इंजिन म्हणून बघितले जात आहे, मागच्या वर्षभरात अनेक सुधारणा झाल्या.- आयएमएफनुसार आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती होत आहे.- विकासाचे फायदे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पावले उचलत राहणार - एफडीआयमध्ये ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार जगातला जीडीपी 2017मध्ये वाढून 3.4 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे- मनरेगामध्ये महिलांचा सहभाग 55 टक्क्यांनी वाढला- शाळांमध्ये विज्ञानाच्या शिक्षणावर जोर देण्यात येणार- पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद.- दीनदयाल ग्राम ज्योती योजनेसाठी ४८१८ कोटींची तरतूद. २०१८ पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचणार.- ग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे.- 2017-18 वर्षामध्ये मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद, 40 हजार कोटींवरुन मनरेगाची तरतूद 8 हजार कोटींनी वाढवली.- 1 कोटी कुटुंब गरिबीमुक्त करणं हे सरकारचं लक्ष्य.- ग्रामविकासासाठी 3 लाख कोटी रुपये खर्च करणार.- कंत्राटी शेतीसाठी नवा कायदा लागू होणार.- बेघर आणि कच्च्या घरांत राहणा-यासाठी २०१९ पर्यंत १ कोटी घरे बांधणार, 15 हजार कोटींवरुन तरतूद 23 हजार कोटींपर्यंत वाढवली.- मनरेगाच्या माध्यमातून ५ लाख तलाव बांधण्याचे लक्ष्य.- डेअरी उद्योगाला नाबार्डच्या माध्यमातून 8 हजार कोटींची तरतूद, - मायक्रो सिंचन निधीसाठी 5 हजार कोटींची तरतूद.- १ कोटी कुटुंबासाठी मिशन अंत्योदय योजना- शेती उत्पादनांची स्वच्छता आणि पॅकेजिंगसाठी 75 लाखापर्यंत अर्थसहाय्य करणार.- पीक विम्यासाठी ९ हजार कोटींच्या निधीची तरतूद.- गेल्या वर्षी मान्सूनचे चांगला झाल्याने यंदा पीके चांगली येण्याची अपेक्षा.- यावर्षी कृषी विकासदर ४.१ टक्के इतका असेल.- टेक इंडिया हा सरकारचा आगामी काळातील अजेंडा.- शेतक-यांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजदरात कपात.- शेतक-यांच्या कर्जासाठी १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.- सरकारच्या सर्व योजना या गरीबांना लक्षात ठेवून आखल्या जातील.- शेतक-यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आमच्या सरकारने अनेक पावले उचलली.- शेतक-यांचे उत्पन्न पाचवर्षात दुप्पट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- नोटाबंदीचा निर्णय महत्त्वाचा आणि धाडसी, नोटाबंदीमुळे सरकारी महसूल वसुलीत वाढ- 92 वर्षात पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्पासोबत सादर होणार रेल्वे अर्थसंकल्प.- गोंधळामध्येच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास केली सुरुवात- महागाईवर सरकारने नियंत्रण मिळवले, काळयापैशा विरोधात सरकारने लढाई सुरु केली आहे.- हम आगे आगे चलते है, आईये आप असा शेर अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना ऐकवला- जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडलेली असतानाच मी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहे - मागच्या अडीच वर्षात सरकारच्या कारभारात बदल झाला असून, लोकांचा सरकारवरील विश्वास वाढला आहे - रेल्वे बजेट आणि केंद्रीय अर्थसंकल्प पहिल्यांदाच एकत्रित सादर होत आहे - परदेशी गुंतवणुकीत वाढ झाली आहे - नोटाबंदीच्या दरम्यान सहकार्य केल्याबद्दल देशाचे आभार - सरकारच्या सर्व योजना या गरीबांना लक्षात ठेवून आखल्या जातील.- शेतक-यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आमच्या सरकारने अनेक पावले उचलली.- शेतक-यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- देशातल्या प्रत्येक नागरिकाला घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.- करचुकवेगिरीमुळे देशातील जनतेचं मोठं नुकसान झाले.- गरिबी निर्मूलन सरकारचे मुख्य लक्ष्य आहे