शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

आधी अतिरेकी हल्ला, नंतर पुराचा हाहाकार

By admin | Updated: September 10, 2014 03:11 IST

आधी अतिरेकी हल्ला आणि नंतर पुरामुळे उडालेला हाहाकार यातून मरणाशी दोनहात करून एकाच कुटुंबातील तिघे जण मुंबईत सुखरूप परतले आहेत

मनीष म्हात्रे , मुंबईआधी अतिरेकी हल्ला आणि नंतर पुरामुळे उडालेला हाहाकार यातून मरणाशी दोनहात करून एकाच कुटुंबातील तिघे जण मुंबईत सुखरूप परतले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.चेंबूर कॅम्पमध्ये राहणारे विजय ठाकूर आणि त्यांची पत्नी सविता परिचितांच्या विवाहासाठी श्रीनगरला गेले होते. या वेळी त्यांच्यासोबत कौटुंबिक मित्र अमित ओबेरॉय, पिंकी ओबेरॉय, त्यांची मुलगी रिया आणि बंटी हुडा, कांचन हुडा व त्यांंचा मुलगा पृथ्वी हे देखील होते. २ सप्टेंबरला कॉलेजमधील मैत्रिणीचे लग्न असल्याने हे सर्व कुटुंबीय ३० आॅगस्टलाच श्रीनगरकडे रवाना झाले. या वेळी सविताने विक्रोळीमध्ये राहणाऱ्या तिच्या आई-बाबांना श्रीनगरला उतरल्यावर कॉलही केला होता. लग्नसोहळ्यानंतर काही दिवस जम्मू-काश्मीरमध्ये घालवण्याच्या विचारात त्यांनी श्रीनगर परिसरातील कोहलीज हॉटेलमध्ये बुकिंग केले होते, मात्र लग्नसोहळ्याच्या दिवशीच ते अतिरेक्यांच्या जाळ्यात अडकले. लग्नस्थळी अतिरेकी घुसल्याच्या सविताच्या कॉलने तिच्या आई-वडिलांची-कांबळे कुटुंबीयांची झोपच उडाली. मात्र त्यातून ते सुखरूप बाहेर निघाल्याचे समजताच त्यांच्या जिवात जीव आला. त्यातून सुटका होते न् होते तोच काश्मीरमधल्या पुराने त्यांना गाठले. त्यामुळे घरी परतणे शक्यच नसल्याचे सविताने कळवले. त्यांचे कुटुंबीय त्यांना मदत करण्यासाठी धडपडत होते, मात्र संपर्क होत नव्हता. नंतर मात्र सविताचा कॉल आला आणि कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ते मुंबईत दाखल झाल्याने कुटुंबीय निश्चिंत झाले. (प्रतिनिधी)