शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

आधी अतिरेकी हल्ला, नंतर पुराचा हाहाकार

By admin | Updated: September 10, 2014 03:11 IST

आधी अतिरेकी हल्ला आणि नंतर पुरामुळे उडालेला हाहाकार यातून मरणाशी दोनहात करून एकाच कुटुंबातील तिघे जण मुंबईत सुखरूप परतले आहेत

मनीष म्हात्रे , मुंबईआधी अतिरेकी हल्ला आणि नंतर पुरामुळे उडालेला हाहाकार यातून मरणाशी दोनहात करून एकाच कुटुंबातील तिघे जण मुंबईत सुखरूप परतले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.चेंबूर कॅम्पमध्ये राहणारे विजय ठाकूर आणि त्यांची पत्नी सविता परिचितांच्या विवाहासाठी श्रीनगरला गेले होते. या वेळी त्यांच्यासोबत कौटुंबिक मित्र अमित ओबेरॉय, पिंकी ओबेरॉय, त्यांची मुलगी रिया आणि बंटी हुडा, कांचन हुडा व त्यांंचा मुलगा पृथ्वी हे देखील होते. २ सप्टेंबरला कॉलेजमधील मैत्रिणीचे लग्न असल्याने हे सर्व कुटुंबीय ३० आॅगस्टलाच श्रीनगरकडे रवाना झाले. या वेळी सविताने विक्रोळीमध्ये राहणाऱ्या तिच्या आई-बाबांना श्रीनगरला उतरल्यावर कॉलही केला होता. लग्नसोहळ्यानंतर काही दिवस जम्मू-काश्मीरमध्ये घालवण्याच्या विचारात त्यांनी श्रीनगर परिसरातील कोहलीज हॉटेलमध्ये बुकिंग केले होते, मात्र लग्नसोहळ्याच्या दिवशीच ते अतिरेक्यांच्या जाळ्यात अडकले. लग्नस्थळी अतिरेकी घुसल्याच्या सविताच्या कॉलने तिच्या आई-वडिलांची-कांबळे कुटुंबीयांची झोपच उडाली. मात्र त्यातून ते सुखरूप बाहेर निघाल्याचे समजताच त्यांच्या जिवात जीव आला. त्यातून सुटका होते न् होते तोच काश्मीरमधल्या पुराने त्यांना गाठले. त्यामुळे घरी परतणे शक्यच नसल्याचे सविताने कळवले. त्यांचे कुटुंबीय त्यांना मदत करण्यासाठी धडपडत होते, मात्र संपर्क होत नव्हता. नंतर मात्र सविताचा कॉल आला आणि कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ते मुंबईत दाखल झाल्याने कुटुंबीय निश्चिंत झाले. (प्रतिनिधी)