शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या

By admin | Updated: October 11, 2015 03:38 IST

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येत्या १२ आॅक्टोबरला मतदान होत असून यासाठीच्या प्रचार तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. उमेदवारांनी आता घरोघरी जाऊन

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येत्या १२ आॅक्टोबरला मतदान होत असून यासाठीच्या प्रचार तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. उमेदवारांनी आता घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याचा धूमधडाका लावला आहे.दरम्यान, या निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला असून नक्षलवादी आणि अन्य समाजकंटकांवर जल, थल आणि वायूमार्गे नजर ठेवण्यासोबत प्रथमच ड्रोनचाही वापर केला जाणार आहे.राज्याचे अवर मुख्य निवडणूक अधिकारी आर. लक्ष्मणन यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात ४९ जागांसाठी मतदान होणार असून एकूण ५८६ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक १८ उमेदवार मोहिउद्दीननगर आणि मोरवा येथून रिंगणात आहेत, तर वारिसलीगंजमध्ये सर्वात कमी सहा उमेदवार भविष्य अजमावत आहेत. सहा जिल्हे नक्षलग्रस्तपहिल्या टप्प्यात ज्या १० जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यात समस्तीपूर, बेगुसराय, खगडिया, लखीसराय, शेखपुरा, भागलपूर, मुंगेर, बांका, नवादा आणि जमुईचा समावेश आहे. यापैकी सहा जिल्हे नक्षलग्रस्त असून तेथील बहुतांश मतदान केंद्रे अतिसंवेदनशील आहेत.निवडणूक आयोगाने या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील मतदान शांततापूर्ण आणि भयमुक्त वातावरणात पार पडावे यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचे आदेश दिले आहेत. या भागात निमलष्करी दलाचे दोन हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच मतदानाच्या दिवशी नक्षलवाद्यांच्या हालचाली टिपण्याकरिता प्रथमच ड्रोनचा वापर केला जाणार असून याद्वारे मिळणाऱ्या सूचनांच्या आधारे सुरक्षा जवान संभाव्य ठिकाणांवर त्वरित कारवाई करू शकतील. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुंगेर, खगडिया, लखीसराय, बांका, नवादा आणि जमुई जिल्ह्यात १५ दिवसांपूर्वीच निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांनी इ.स. २००० सालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान रोहतास जिल्ह्यात चैनपूरजवळ भूसुरुंग स्फोटात पोलिसांची जीप उडविली होती. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) आठ जवान शहीद झाले होते. २००५ च्या निवडणुकीत शिवहर जिल्ह्यात श्यामपूर भटहाजवळ स्फोटात सहा जवान शहीद झाले होते. (वृत्तसंस्था)माओवाद्यांचे बहिष्काराचे आवाहनदुसरीकडे नेहमीप्रमाणे माओवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्काराची घोषणा केली असून ठिकठिकाणी यासंदर्भात पोस्टर्स लावले आहेत. नक्षलवाद्यांचे वर्चस्व असलेल्या भागात त्यांच्या परवानगीशिवाय कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराचे प्रचार वाहन अथवा स्वत: उमेदवाराला प्रवेश करता येत नाही. यासाठी उमेदवाराला संबंधित क्षेत्राच्या स्वयंभू एरिया कमांडरची परवानगी घ्यावी लागते. हे लक्षात घेता या संपूर्ण भागात हेलिकॉप्टरने पाळत ठेवली जाणार आहे. शिवाय नद्यांमध्ये मोटर बोट सशस्त्र जवानांसह सज्ज राहतील. राज्यालगतची झारखंड सीमा शुक्रवारी रात्रीच सील करण्यात आली.