शहरं
Join us  
Trending Stories
1
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
2
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
3
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
4
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
5
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
8
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
9
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
10
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
11
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
12
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
13
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
14
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
15
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
16
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
17
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
18
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
19
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
20
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा

पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या

By admin | Updated: October 11, 2015 03:38 IST

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येत्या १२ आॅक्टोबरला मतदान होत असून यासाठीच्या प्रचार तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. उमेदवारांनी आता घरोघरी जाऊन

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येत्या १२ आॅक्टोबरला मतदान होत असून यासाठीच्या प्रचार तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. उमेदवारांनी आता घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याचा धूमधडाका लावला आहे.दरम्यान, या निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला असून नक्षलवादी आणि अन्य समाजकंटकांवर जल, थल आणि वायूमार्गे नजर ठेवण्यासोबत प्रथमच ड्रोनचाही वापर केला जाणार आहे.राज्याचे अवर मुख्य निवडणूक अधिकारी आर. लक्ष्मणन यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात ४९ जागांसाठी मतदान होणार असून एकूण ५८६ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक १८ उमेदवार मोहिउद्दीननगर आणि मोरवा येथून रिंगणात आहेत, तर वारिसलीगंजमध्ये सर्वात कमी सहा उमेदवार भविष्य अजमावत आहेत. सहा जिल्हे नक्षलग्रस्तपहिल्या टप्प्यात ज्या १० जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यात समस्तीपूर, बेगुसराय, खगडिया, लखीसराय, शेखपुरा, भागलपूर, मुंगेर, बांका, नवादा आणि जमुईचा समावेश आहे. यापैकी सहा जिल्हे नक्षलग्रस्त असून तेथील बहुतांश मतदान केंद्रे अतिसंवेदनशील आहेत.निवडणूक आयोगाने या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील मतदान शांततापूर्ण आणि भयमुक्त वातावरणात पार पडावे यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचे आदेश दिले आहेत. या भागात निमलष्करी दलाचे दोन हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच मतदानाच्या दिवशी नक्षलवाद्यांच्या हालचाली टिपण्याकरिता प्रथमच ड्रोनचा वापर केला जाणार असून याद्वारे मिळणाऱ्या सूचनांच्या आधारे सुरक्षा जवान संभाव्य ठिकाणांवर त्वरित कारवाई करू शकतील. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुंगेर, खगडिया, लखीसराय, बांका, नवादा आणि जमुई जिल्ह्यात १५ दिवसांपूर्वीच निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांनी इ.स. २००० सालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान रोहतास जिल्ह्यात चैनपूरजवळ भूसुरुंग स्फोटात पोलिसांची जीप उडविली होती. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) आठ जवान शहीद झाले होते. २००५ च्या निवडणुकीत शिवहर जिल्ह्यात श्यामपूर भटहाजवळ स्फोटात सहा जवान शहीद झाले होते. (वृत्तसंस्था)माओवाद्यांचे बहिष्काराचे आवाहनदुसरीकडे नेहमीप्रमाणे माओवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्काराची घोषणा केली असून ठिकठिकाणी यासंदर्भात पोस्टर्स लावले आहेत. नक्षलवाद्यांचे वर्चस्व असलेल्या भागात त्यांच्या परवानगीशिवाय कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराचे प्रचार वाहन अथवा स्वत: उमेदवाराला प्रवेश करता येत नाही. यासाठी उमेदवाराला संबंधित क्षेत्राच्या स्वयंभू एरिया कमांडरची परवानगी घ्यावी लागते. हे लक्षात घेता या संपूर्ण भागात हेलिकॉप्टरने पाळत ठेवली जाणार आहे. शिवाय नद्यांमध्ये मोटर बोट सशस्त्र जवानांसह सज्ज राहतील. राज्यालगतची झारखंड सीमा शुक्रवारी रात्रीच सील करण्यात आली.