शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सीबीएसई १२ वीत दिल्लीची रक्षा पहिली

By admin | Updated: May 29, 2017 08:52 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा घेतलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत देशभरातील १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमधून प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा घेतलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत देशभरातील १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमधून प्रथम येण्याचा मान दिल्लीच्या रक्षा गोपाल या विद्यार्थिनीने तब्बल ९९.६ टक्के (५०० पैकी ४९८) गुण मिळवून पटकाविला आहे.चंदीगडची भूमी सावंत-डे या विद्यार्थिनीने ५०० पैकी ४९७ गुण मिळवून दुसरे स्थान मिळविले आणि ५०० पैकी ४९६ एवढे समान गुण मिळालेल्या आदित्य जैन व मन्नत लुथ्रा या दोघांनी देशात तिसरे स्थान पटकावले आहे.परीक्षा दिलेल्या देशातील एकूण १० लाख २० हजार ७६२ विद्यार्थ्यांपैकी ८ लाख ३७ हजार २२९ म्हणजेच ८२.२ टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या ८३.०५ टक्यांहून यंदाचे उत्तीर्णतेचे प्रमाण कमी आहे. मात्र यंदा १०हजार ९१ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक तर ६३ हजार २४० विद्यार्थ्यांनी ९० टक्कयांहून अधिक गुण मिळविले.परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेले विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत विशेष हेल्पलाइन चालविली. त्यावर फोन करणाऱ्यांचे मनोवैज्ञानिक समुपदेशन करण्यासाठी ६५ समुपदेशक नेमण्यात आले होते.