शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

अग्निशामक बंबाला मिळेना वाट़़़

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

नाशिक : आगीच्या घटनेच्या ठिकाणी तातडीने मदत पोहोचविणे गरजेचे आहे याचे भान अग्निशामक दलाला नेहमीच असते वा त्यांना ते ठेवावेही लागते़ कारण वेळेवर न पोहोचल्यास त्याचे गंभीर परिणाम त्यांना ठावूक असतात़ अग्निशामक दलाला अशा घटनांच्या वेळी शहर वाहतूक शाखा, पोलीस आणि नागरिक यांनी सहकार्य करणे गरजेचे असते़ मात्र दुर्दैवाने शनिवारी कोठुळे वाड्याला लागलेल्या आगीत हे सहकार्य दिसून आले नाही़ सीबीएसपासून तर घारपुरे घाटापर्यंत झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अग्निशामक दलाला घटनेपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला़

नाशिक : आगीच्या घटनेच्या ठिकाणी तातडीने मदत पोहोचविणे गरजेचे आहे याचे भान अग्निशामक दलाला नेहमीच असते वा त्यांना ते ठेवावेही लागते़ कारण वेळेवर न पोहोचल्यास त्याचे गंभीर परिणाम त्यांना ठावूक असतात़ अग्निशामक दलाला अशा घटनांच्या वेळी शहर वाहतूक शाखा, पोलीस आणि नागरिक यांनी सहकार्य करणे गरजेचे असते़ मात्र दुर्दैवाने शनिवारी कोठुळे वाड्याला लागलेल्या आगीत हे सहकार्य दिसून आले नाही़ सीबीएसपासून तर घारपुरे घाटापर्यंत झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अग्निशामक दलाला घटनेपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला़
रविवार पेठेतील गाडगीळ गल्लीतील कोठुळे वाड्याला आग लागल्यानंतर पंचवटी, सिडको, सातपूर, शिंगाडा तलाव या सर्व ठिकाणांहून अग्निशामक बंबांना पाचारण करण्यात आले़ मात्र हे बंब घटनास्थळी वेळेवर पोहोचूच शकले नाही़ याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे शहरातील वाहतूक समस्या़ सीबीएसपासून ते अशोकस्तंभापर्यंत आणि त्याही पुढे घारपुरे घाटापर्यंत वाहतुकीची कोंेडी झाली होती़ या घटनेची माहिती असणार्‍या नागरिकांनी याची माहिती तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला दिली़ मात्र या नागरिकांना मनुष्यबळ कमी आहे, आम्हाला इतकेच काम आहे का अशा प्रकारची उत्तरे ऐकायला लागली़
वास्तविक पाहता कोणत्याही प्रकारची दुर्दैवी घटना घडल्यानंतर मदतीसाठी जाणार्‍या वाहनांना रस्ता मोकळा करून देणे हे पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेचे तसेच सुज्ञ नागरिकांचेही काम आहे़ परंतु सुज्ञ नागरिक जर आपले कर्तव्य विसरत असतील तर त्यांना कायद्याने धडा शिकविणे हे पोलिसांचे काम आहे़ जेणे दुर्दैवी घटना घडलेल्या ठिकाणी मदत लवकर पोहोचेल व आर्थिक व जीवितहानी होण्यापासून वाचेल़ पोलिसांच्या भूमिकेबाबत या ठिकाणी नाराजी व्यक्त केली जात होती़ (प्रतिनिधी)

--इन्फो--
आम्हाला हेच काम आहे का?
गाडगीळ लेनमधील कोठुळे वाड्याला आग लागल्यानंतर अग्निशामक दलाची वाहने तातडीने घटनास्थळासाठी रवाना झाली; मात्र वाहतूक कोंडीमुळे त्यांनाही पुढे जाणे शक्य होत नव्हते़ अशा वेळी शहर पोलीस कंट्रोल रुमला नागरिकांनी माहिती दिली असता आम्हाला हेच काम आहे का अशाप्रकारची उद्धट उत्तरे देण्यात आली़

फोटो:- २० पीएचडीसी १११-११२-११३
सीबीएसपासून ते अशोकस्तंभापर्यंत झालेली वाहतूक कोंडी