शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आंदोलनाची आग विझू लागली

By admin | Updated: February 23, 2016 00:26 IST

जाट समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण देण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या भाजपाच्या घोषणेनंतर जाट आंदोलकांनी रेल्वे मार्ग व रस्त्यांवर निर्माण केलेले

चंदीगड : जाट समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण देण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या भाजपाच्या घोषणेनंतर जाट आंदोलकांनी रेल्वे मार्ग व रस्त्यांवर निर्माण केलेले अडथळे हटविण्याला सुरुवात केली आहे आणि संचारबंदीही टप्प्याटप्प्यात उठविण्यात येत असल्याने हरियाणातील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. तथापि सोनीपतमध्ये सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले आहेत. अन्य काही भागांतही मात्र जाळपोळीच्या तुरळक घटना घडल्याचे वृत्त आहे. हे आंदोलन संपल्याबद्दल मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी समाधान व्यक्त केले आहे. दुसरीकडे सरकारने या आंदोलनात मरण पावलेल्यांच्या कुटंबीयांना १0 लाख रुपयांची मदत आणि घरातील एका व्यक्तीला राज्य सरकारमध्ये नोकरी देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. मात्र आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि भाजपचे खा. राजकुमार सैनी यांच्यावर विद्वेषाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जाट नेत्यांनी केली आहे. हरियाणामधून दिल्लीला होणारा पाणी पुरवठा जाट आंदोलनामुळे खंडित झाला होता, सुरक्षा दलांनी मुनाक कालव्यावर पुन्हा ताबा मिळविल्यामुळे तो सुरू झााला असला तरी मंगळवारी सकाळपर्यंत तो पूर्ववत होईल. मात्र काही भागांतून अद्याप हिंसक घटनांच्या बातम्या येत असून, रोहतकच्या मेहाम येथे आंदोलकांनी एका सरकारी वाहनाला आग लावली आणि रास्ता रोको केले. दिल्ली-अंबाला महामार्गासह भिवानी, रोहतक व हिसारमधील काही मार्ग अद्यापही बंदच आहेत. रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. हरियाणाच्या कैथल जिल्ह्यात सोमवारी जाट आंदोलकांनी एक मॉल व अन्य अनेक दुकानांची तोडफोड केली. यावेळी दोन दुचाकीही जाळण्यात आल्या. बिगर-जाट समाजाच्या लोकांनी मोर्चा काढून या जाळपोळीचा निषेध केला. रेल्वे तिकिटाचे पैसे परतसोमवारी समझोता एक्स्प्रेस आणि दिल्ली-लाहोर बससेवा आंदोलनामुळे रद्द करण्यात आली. रेल्वे आणि बससेवा अद्याप सुरळीत सुरू न झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मात्र रद्द करण्यात आलेल्या रेल्वेच्या तिकिटांचे पूर्ण पैसे रेल्वे प्रवाशांना परत करण्यात येणार आहेत. तिकिटाचे पैसे परत करताना कॅन्सेलेशन शुल्क आकारण्यात येणार नाही आणि प्रवाशांना पूर्ण रक्कम परत केली जाईल, असे रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले.