शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गाझियाबादमध्ये ५ हजार जणांवर गुन्हे दाखल, ३२ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:22 IST

दलित अत्याचारविरोधी कायदा (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे बोथट झाल्याचा आरोप करीत आयोजिलेल्या भारत बंदच्या दिवशी गाझियाबादमध्ये दंगल घडविणाऱ्या, सार्वजनिक तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल पाच हजार अज्ञात लाकांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले असून, ३२ दंगलखोरांना अटक झाली आहे.

गाझियाबाद - दलित अत्याचारविरोधी कायदा (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे बोथट झाल्याचा आरोप करीत आयोजिलेल्या भारत बंदच्या दिवशी गाझियाबादमध्ये दंगल घडविणाऱ्या, सार्वजनिक तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल पाच हजार अज्ञात लाकांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले असून, ३२ दंगलखोरांना अटक झाली आहे.आतापर्यंत २८५ जणांवर भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. शहरी भागातील ४३ तसेच ग्रामीण भागातील १७ ठिकाणे अतिसंवेदशील असून तिथे पुन्हा हिंसक निदर्शने होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भारतबंदच्या दिवशी सोमवारी झालेल्या हिंसक निदर्शनांत जखमी झालेल्या नऊ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. (वृत्तसंस्था)गांधीजींच्या पुतळ््याची विटंबनाराजस्थानमधील नाथद्वारा येथे महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ््याची विटंबना करण्यात आल्याचे बुधवारी सकाळी लक्षात आले. या अर्धपुतळ््याचे शिर अज्ञात दंगेखोरांनी तोडले आहे. य्याआधी ८ मार्चला केरळमधील तलीपरम्बा येथे गांधीजींच्या पुतळ््याची विटंबना करण्यात आली होती. देशामध्ये गेल्या काही महिन्यापासून महापुरुषांच्या पुतळ््यांच्या विटंबनेचे प्रकार घडत आहेत. तामिळनाडूमध्ये द्रविडी नेते पेरियर, पश्चिम बंगालमध्ये जनसंघाचे नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, मावना येथे डॉ. आंबेडकर, त्रिपुरामध्ये व्लादिमीर लेनिन यांच्या पुतळ््यांच्या विटंबनेचे प्रकार घडले आहेत.संचारबंदी कायम- मध्य प्रदेशमध्ये भारत बंदच्या दिवशी झालेल्या हिंसक निदर्शने झालेल्या ग्वाल्हेर, भिंड, मुरेना जिल्ह्यातील काही भागांमध्ये लागू केलेली संचारबंदी यापुढेही कायम राहाणार आहे.- रोज सकाळी १० ते दुपारी १२च्या दरम्यान संचारबंदी शिथिल करण्यात येईल.- मुरेना येथे मंगळवारी पोलिसांवर दगडफेक करणा-या ५० निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. आणखी एक मृतदेह मिळाल्याने राज्यात बंदच्या दिवशी ठार झालेल्यांची संख्या सात झाली आहे.

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाBharat Bandhभारत बंदUttar Pradeshउत्तर प्रदेश