शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

गाझियाबादमध्ये ५ हजार जणांवर गुन्हे दाखल, ३२ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:22 IST

दलित अत्याचारविरोधी कायदा (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे बोथट झाल्याचा आरोप करीत आयोजिलेल्या भारत बंदच्या दिवशी गाझियाबादमध्ये दंगल घडविणाऱ्या, सार्वजनिक तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल पाच हजार अज्ञात लाकांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले असून, ३२ दंगलखोरांना अटक झाली आहे.

गाझियाबाद - दलित अत्याचारविरोधी कायदा (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे बोथट झाल्याचा आरोप करीत आयोजिलेल्या भारत बंदच्या दिवशी गाझियाबादमध्ये दंगल घडविणाऱ्या, सार्वजनिक तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल पाच हजार अज्ञात लाकांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले असून, ३२ दंगलखोरांना अटक झाली आहे.आतापर्यंत २८५ जणांवर भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. शहरी भागातील ४३ तसेच ग्रामीण भागातील १७ ठिकाणे अतिसंवेदशील असून तिथे पुन्हा हिंसक निदर्शने होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भारतबंदच्या दिवशी सोमवारी झालेल्या हिंसक निदर्शनांत जखमी झालेल्या नऊ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. (वृत्तसंस्था)गांधीजींच्या पुतळ््याची विटंबनाराजस्थानमधील नाथद्वारा येथे महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ््याची विटंबना करण्यात आल्याचे बुधवारी सकाळी लक्षात आले. या अर्धपुतळ््याचे शिर अज्ञात दंगेखोरांनी तोडले आहे. य्याआधी ८ मार्चला केरळमधील तलीपरम्बा येथे गांधीजींच्या पुतळ््याची विटंबना करण्यात आली होती. देशामध्ये गेल्या काही महिन्यापासून महापुरुषांच्या पुतळ््यांच्या विटंबनेचे प्रकार घडत आहेत. तामिळनाडूमध्ये द्रविडी नेते पेरियर, पश्चिम बंगालमध्ये जनसंघाचे नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, मावना येथे डॉ. आंबेडकर, त्रिपुरामध्ये व्लादिमीर लेनिन यांच्या पुतळ््यांच्या विटंबनेचे प्रकार घडले आहेत.संचारबंदी कायम- मध्य प्रदेशमध्ये भारत बंदच्या दिवशी झालेल्या हिंसक निदर्शने झालेल्या ग्वाल्हेर, भिंड, मुरेना जिल्ह्यातील काही भागांमध्ये लागू केलेली संचारबंदी यापुढेही कायम राहाणार आहे.- रोज सकाळी १० ते दुपारी १२च्या दरम्यान संचारबंदी शिथिल करण्यात येईल.- मुरेना येथे मंगळवारी पोलिसांवर दगडफेक करणा-या ५० निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. आणखी एक मृतदेह मिळाल्याने राज्यात बंदच्या दिवशी ठार झालेल्यांची संख्या सात झाली आहे.

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाBharat Bandhभारत बंदUttar Pradeshउत्तर प्रदेश