शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
4
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
5
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
6
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
7
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
8
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
9
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
10
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
11
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
12
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
13
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
14
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
15
साखरपुडा झाल्यानंतर प्राजक्ता गायकवाड तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, म्हणाली "खूप वर्षांपासून"
16
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी
17
"आता या लग्नाच्या हॉलमध्ये आग लागो, काहीही होवो पण....", लग्नाच्या दिवशी उमेश प्रियाला असं का म्हणाला?
18
Sangli Murder: तिसंगी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
19
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
20
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...

मणिपुरातील आर्थिक नाकेबंदी संपवू - मोदी

By admin | Updated: February 25, 2017 23:46 IST

मणिपुरात भाजपा सत्तेत आल्यास सध्या सुरू असलेली आर्थिक नाकेबंदी संपविण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

इंफाळ : मणिपुरात भाजपा सत्तेत आल्यास सध्या सुरू असलेली आर्थिक नाकेबंदी संपविण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काँग्रेसने १५ वर्षांच्या जे केले नाही, ते भाजपा १५ महिन्यांत करून दाखवील, असेही मोदी म्हणाले.मणिपुरातही प्रचारासाठी मोदी यांनी येथे एक सभा घेतली. त्याप्रसंगी त्यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री इबोबी सिंह यांचे सरकार आतापर्यंतचे सर्वांत भ्रष्ट सरकार आहे. हे सरकार १0 टक्क्यांपर्यंत कमिशन खात आहे. काँग्रेसमुळे मणिपूरचा विकास ठप्प झाला आहे. नोकऱ्या, पायाभूत सेवा, पिण्याचे पाणी देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. मोदी म्हणाले की, इबोबी सरकार नागा समझोत्याबाबत खोटी मोहीत चालवित आहे. लोकांची दिशाभूल केली जात आहे. नागा समझोत्यात मणिपुरी लोकांच्या हितांच्या विरोधात एक ओळही नाही. हा समझोता दीड वर्षांपूर्वी झाला आहे. तेव्हा आपण काय करीत होतात? गाढ झोपला होतात का? युनायटेड नागा कौन्सिलच्या वतीने नोव्हेंबरमध्ये आर्थिक नाकेबंदी आंदोलन सुरू आहे. त्याबाबत मोदी म्हणाले की, जीवनाश्यक वस्तूंची उपलब्धता करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. तथापि, येथे लोकांना औषधी आणि अन्य आवश्यक वस्तू मिळेनाशा झाल्या आहेत. त्याला काँग्रेस सरकारच जबाबदार आहे. (वृत्तसंस्था)बंदने स्वागत : मोदी दाखल झाले असतानाच सहा बंडखोर गटांच्या आवाहनामुळे मणिपूर बंद होते. राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मोदी यांचे इम्फाळमध्ये आगमन झाले. कडक बंदोबस्तामुळे संपूर्ण शहराला लष्करी छावणीचे स्वरूप आले होते. रस्त्यावर फारच थोडी वाहने दिसून येत होती. सर्व दुकाने बंद होती.