शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

मणिपुरातील आर्थिक नाकेबंदी संपवू - मोदी

By admin | Updated: February 25, 2017 23:46 IST

मणिपुरात भाजपा सत्तेत आल्यास सध्या सुरू असलेली आर्थिक नाकेबंदी संपविण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

इंफाळ : मणिपुरात भाजपा सत्तेत आल्यास सध्या सुरू असलेली आर्थिक नाकेबंदी संपविण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काँग्रेसने १५ वर्षांच्या जे केले नाही, ते भाजपा १५ महिन्यांत करून दाखवील, असेही मोदी म्हणाले.मणिपुरातही प्रचारासाठी मोदी यांनी येथे एक सभा घेतली. त्याप्रसंगी त्यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री इबोबी सिंह यांचे सरकार आतापर्यंतचे सर्वांत भ्रष्ट सरकार आहे. हे सरकार १0 टक्क्यांपर्यंत कमिशन खात आहे. काँग्रेसमुळे मणिपूरचा विकास ठप्प झाला आहे. नोकऱ्या, पायाभूत सेवा, पिण्याचे पाणी देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. मोदी म्हणाले की, इबोबी सरकार नागा समझोत्याबाबत खोटी मोहीत चालवित आहे. लोकांची दिशाभूल केली जात आहे. नागा समझोत्यात मणिपुरी लोकांच्या हितांच्या विरोधात एक ओळही नाही. हा समझोता दीड वर्षांपूर्वी झाला आहे. तेव्हा आपण काय करीत होतात? गाढ झोपला होतात का? युनायटेड नागा कौन्सिलच्या वतीने नोव्हेंबरमध्ये आर्थिक नाकेबंदी आंदोलन सुरू आहे. त्याबाबत मोदी म्हणाले की, जीवनाश्यक वस्तूंची उपलब्धता करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. तथापि, येथे लोकांना औषधी आणि अन्य आवश्यक वस्तू मिळेनाशा झाल्या आहेत. त्याला काँग्रेस सरकारच जबाबदार आहे. (वृत्तसंस्था)बंदने स्वागत : मोदी दाखल झाले असतानाच सहा बंडखोर गटांच्या आवाहनामुळे मणिपूर बंद होते. राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मोदी यांचे इम्फाळमध्ये आगमन झाले. कडक बंदोबस्तामुळे संपूर्ण शहराला लष्करी छावणीचे स्वरूप आले होते. रस्त्यावर फारच थोडी वाहने दिसून येत होती. सर्व दुकाने बंद होती.