शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

तोडगा काढा, अन्यथा मोठा फटका; व्यापारी संघटनांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 06:57 IST

गेल्या २० दिवसांमध्ये ५ हजार कोटींचा व्यापार प्रभावित झाला असल्याची माहिती व्यापारी संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने दिली.

नवी दिल्ली : दिल्लीकडे येणाऱ्या मालवाहतुकीपैकी जवळपास ४० टक्के वाहतूक शेतकरी आंदोलनामुळे प्रभावित झाली आहे. दिल्ली आणि एनसीआर व्यापारावर त्याचा प्रतिकूल प्रभाव पडला असून, गेल्या २० दिवसांमध्ये ५ हजार कोटींचा व्यापार प्रभावित झाला असल्याची माहिती व्यापारी संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने दिली.शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी त्यामुळे केंद्र सरकारसोबत चर्चा करून तोडगा काढावा, तसेच सरकारने खुल्या मनाने शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेत तात्काळ निर्णय घेण्याची विनंती संघटनेकडून करण्यात आली आहे. आंदोलन पुढेही असेच सुरू राहिले तर, व्यापारी, मालवाहतूकदार तसेच इतर वर्गांना व्यापारात मोठे नुकसान सहन करावे लागेल. कोरोनामुळे आधीच व्यापार प्रभावित झाला आहे. कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच दिवाळीनंतर व्यापार हळूहळू पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत होती; परंतु शेतकरी आंदोलनामुळे पुन्हा एकदा व्यापाऱ्यांवर संकट कोसळले आहे. शेतकरी आंदोलनामुळे मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा दावा असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचेम)कडून करण्यात आला आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, हरयाणालाही फटका आंदोलनामुळे पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचे दररोज ३,५०० कोटींचे नुकसान होत आहे. आंदोलनामुळे या राज्यातील परस्पर जोडल्या गेलेल्या अर्थव्यवस्थांना मोठा धक्का बसला आहे. या राज्यांतील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहेत.