शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अखेर स्थायी समितीच्या सदस्यांची यादी जाहीर *शिवसेनेमुळे अडली होती यादी *भाजपाचे संजय वाघुले यांना संधी

By admin | Updated: February 29, 2016 22:02 IST

ठाणे : मागील महासभेत स्थायी समिती सदस्यांची नावे अंतिम होत नसल्याने सभा तहकूब करणार्‍या शिवसेनेने अखेर सोमवारी झालेल्या महासभेत तब्बल दोन तास खलबते केल्यानंतर आपल्या सदस्यांची यादी जाहीर केली. त्यानुसार, निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांची नियुक्ती पीठासीन अधिकार्‍यांनी जाहीर केली. विशेष म्हणजे शिवसेनेने एक अनुभवी पदाधिकारी दिला असून भाजपाचे संजय वाघुले यांची पुन्हा स्थायीत वर्णी लागली आहे. त्यामुळेच आता शिवसेना भाजपाला दिलेला शब्द पाळणार, हे निश्चित मानले जात आहे.

ठाणे : मागील महासभेत स्थायी समिती सदस्यांची नावे अंतिम होत नसल्याने सभा तहकूब करणार्‍या शिवसेनेने अखेर सोमवारी झालेल्या महासभेत तब्बल दोन तास खलबते केल्यानंतर आपल्या सदस्यांची यादी जाहीर केली. त्यानुसार, निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांची नियुक्ती पीठासीन अधिकार्‍यांनी जाहीर केली. विशेष म्हणजे शिवसेनेने एक अनुभवी पदाधिकारी दिला असून भाजपाचे संजय वाघुले यांची पुन्हा स्थायीत वर्णी लागली आहे. त्यामुळेच आता शिवसेना भाजपाला दिलेला शब्द पाळणार, हे निश्चित मानले जात आहे.
स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांच्यासह रिपाइंचे रामभाऊ तायडे, सुधीर भगत, राधाफतेबहादूर सिंह, मिलिंद पाटील, सिराज महमद अली डोंगरे, दीपक वेतकर आणि भाजपाचे संजय वाघुले यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी नव्या आठ सदस्यांची निवड केली गेली आहे. २० फेबु्रवारी रोजी झालेल्या महासभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपली नावे पीठासीन अधिकार्‍यांकडे सुपूर्द केली होती. परंतु, शिवसेनेमध्ये काही नावांवरून मतभेद झाल्याने अखेर उपायुक्तांना झालेल्या मारहाणीचा निषेध करून ही महासभाच पूर्णवेळेसाठी तहकूब केली होती.
दरम्यान, सोमवारीसुद्धा दुपारी २ वाजता महासभा सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, शिवसेेनेत नावावरून मतभेद झाल्याने ही यादी लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. अखेर, १५ मिनिटांसाठी महासभा तहकूब करून त्यानंतर सुरू झालेल्या सभेत शिवसेनेच्या नावांवर एकमत झाले. त्यानुसार, शिवसेनेतून ज्येष्ठ नगरसेवक विलास सामंत, दशरथ पालांडे, उमेश पाटील आणि संभाजी पंडित यांची नावे जाहीर झाली. तर, भाजपामधून संजय वाघुले यांची पुन्हा निवड झाली. तसेच राष्ट्रवादीकडून सुहास देसाई आणि प्रमिला केणी आणि काँग्रेसकडून यासीन कुरेशी यांची नावे जाहीर करण्यात आली.
सुरुवातीला शिवसेना भाजपाला स्थायी समिती सोडणार नसल्याचा गवगवा केला गेला होता. परंतु, अखेर शिवसेनेने भाजपाला दिलेला शब्द पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेवटच्या वर्षी स्थायीच्या चाव्या भाजपाच्या वाटेला येणार आहेत.
.....................