शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

एनआरसीची अंतिम यादी आज प्रसिद्ध होणार; आसाममध्ये वाढविली सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 09:00 IST

'एनआरसीमधून एखाद्याचे नाव वगळले गेले म्हणजे ती व्यक्ती काही लगेच विदेशी नागरिक ठरणार नाही.'

गुवाहाटी : वैध नागरिकांची आसाममधील नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची (एनआरसी) अंतिम यादी आज प्रसिद्ध होणार आहे. यापार्श्वभूमीवर लोकांनी अजिबात घाबरून जाऊ नये, असे आवाहन आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले आहे. जे मूळ भारतीय आहेत त्यांना नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य करण्यात येईल, गरिबांना सरकारतर्फे कायदेशीर मदत पुरविली जाईल असेही सर्वानंद सोनोवाल सांगितले आहे. 

याचबरोबर, एनआरसीमधून एखाद्याचे नाव वगळले गेले म्हणजे ती व्यक्ती काही लगेच विदेशी नागरिक ठरणार नाही. फॉरिनर ट्रायब्युनलच्या पुढे या प्रकरणाची सुनावणी होऊन मगच त्याच्या नागरिकत्वाबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटले आहे. 

मुस्लिमांंमध्ये भीतीएनआरसीची अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध होत असल्याने आसाममध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. अंतिम यादीतून आसाममधील ४१ लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आपण विदेशी नागरिक ठरू अशी भीती असंख्य लोकांना विशेषत: मुस्लिमांना वाटत आहे.

या यादीमध्ये अनेकांची नावे चुकीच्या पद्धतीने समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांवर अन्याय होऊन प्रसंगी घुसखोरांनाही या यादीत स्थान मिळू शकते अशी भीती भाजप, काँग्रेस, आॅल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंट आदी पक्षांनी व्यक्त केली आहे. या प्रक्रियेला आॅल आसाम स्टुडंटस् युनियनने पाठिंबा दिला आहे.