शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

कमी लढा, जास्त जिंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 06:21 IST

राहुल गांधी यांचा मंत्र : काँग्रेस लढणार लोकसभेच्या ३९६ जागा

- हरीश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २0१४ च्या निवडणुकीत काँग्रेसने ४६४ जागा लढवून फक्त ४४ जागा जिंकल्या होत्या. ही काँग्रेसच्या इतिहासातील नीचांकी कामगिरी ठरली होती. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्र, बिहार आणि केरळ या तीनच राज्यात आघाडी तर झारखंडमध्ये समझौता केला होता. यावेळी मात्र काँग्रेस फक्त ३९६ जागा लढवित असून जवळपास सर्व राज्यांत मित्रपक्षांसोबत आघाडी केली आहे. कमी जागा लढवून जास्त जागा जिंकणे, हा मंत्र राहुल गांधी यांनी या निवडणुकीत काँग्रेसला दिला आहे.

दिल्ली आणि शेजारच्या हरियाणात आम आदमी पार्टीसोबत आघाडी झाली असती तर काँग्रेस लढवित असलेल्या जागा आणखी कमी झाल्या असत्या. तथापि, जिंकण्याची शक्यता आणखी वाढली असती. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेस सर्व २५ जागा लढवित आहे. त्यातून तेलगू देसम पार्टी (तेदेपा) विरोधातील मतांचे काँग्रेस, वायएसआर काँग्रेस आणि भाजपा यांच्यात विभाजन होऊन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना लाभ होणार आहे. म्हणजेच या मतांचा भाजपाला थेट लाभ होणार नाही. निवडणुकीनंतर आघाडीचा पर्यायही खुला आहे.२0१४ मध्ये काँग्रेसने बिहारात १२ जागा लढवून २ जागा जिंकल्या होत्या. यंदा तेथे फक्त ९ जागा लढवून ४ ते ५ जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे. २0१४ मध्ये काँग्रेसने तामिळनाडूत सर्व ३९ जागा लढविल्या होत्या. तथापि, मिळाली मात्र एकही नव्हती. यंदा द्रमुकशी आघाडी करून काँग्रेस केवळ ८ जागा लढवित आहे. उत्त्तर प्रदेशात काँग्रेसची सपा-बसपाशी आघाडी नसली तरी यावेळी काँग्रेस फक्त ५१ जागा लढवित आहे. त्याचा फायदा सपा-बसपाला होईल. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्त्तीसगढ, पंजाब, उत्त्तराखंड जम्मू-काश्मीर आणि इशान्य भारतात चांगल्या जागा मिळतील अशी अपेक्षा आहे.अनेक राज्यांत मित्रपक्षांना सोडल्या जागामहाराष्ट्रात काँग्रेसने मजबूत आघाडी करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांना २३ जागा सोडल्या आहेत. कर्नाटक आणि केरळ या राज्यांत काँग्रेसने अधिक लक्ष घातले आहे. या राज्यांत काँग्रेसने अनुक्रमे ९ आणि ८ जागा गेल्या निवडणुकीत जिंकल्या होत्या. कर्नाटकात जेडीएससोबत आघडी करून मुख्यमंत्री पदावर पाणी सोडले. भाजपाला १८ जागांवरून खाली आणण्यासाठी हा त्याग राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेस-जेडीएस आघाडीला १६ ते १८ जागा मिळविण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. वायनाडची जागा लढवून राहुल गांधी केरळात काँग्रेसचा विस्तार करू इच्छित आहेत.