शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कमी लढा, जास्त जिंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 06:21 IST

राहुल गांधी यांचा मंत्र : काँग्रेस लढणार लोकसभेच्या ३९६ जागा

- हरीश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २0१४ च्या निवडणुकीत काँग्रेसने ४६४ जागा लढवून फक्त ४४ जागा जिंकल्या होत्या. ही काँग्रेसच्या इतिहासातील नीचांकी कामगिरी ठरली होती. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्र, बिहार आणि केरळ या तीनच राज्यात आघाडी तर झारखंडमध्ये समझौता केला होता. यावेळी मात्र काँग्रेस फक्त ३९६ जागा लढवित असून जवळपास सर्व राज्यांत मित्रपक्षांसोबत आघाडी केली आहे. कमी जागा लढवून जास्त जागा जिंकणे, हा मंत्र राहुल गांधी यांनी या निवडणुकीत काँग्रेसला दिला आहे.

दिल्ली आणि शेजारच्या हरियाणात आम आदमी पार्टीसोबत आघाडी झाली असती तर काँग्रेस लढवित असलेल्या जागा आणखी कमी झाल्या असत्या. तथापि, जिंकण्याची शक्यता आणखी वाढली असती. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेस सर्व २५ जागा लढवित आहे. त्यातून तेलगू देसम पार्टी (तेदेपा) विरोधातील मतांचे काँग्रेस, वायएसआर काँग्रेस आणि भाजपा यांच्यात विभाजन होऊन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना लाभ होणार आहे. म्हणजेच या मतांचा भाजपाला थेट लाभ होणार नाही. निवडणुकीनंतर आघाडीचा पर्यायही खुला आहे.२0१४ मध्ये काँग्रेसने बिहारात १२ जागा लढवून २ जागा जिंकल्या होत्या. यंदा तेथे फक्त ९ जागा लढवून ४ ते ५ जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे. २0१४ मध्ये काँग्रेसने तामिळनाडूत सर्व ३९ जागा लढविल्या होत्या. तथापि, मिळाली मात्र एकही नव्हती. यंदा द्रमुकशी आघाडी करून काँग्रेस केवळ ८ जागा लढवित आहे. उत्त्तर प्रदेशात काँग्रेसची सपा-बसपाशी आघाडी नसली तरी यावेळी काँग्रेस फक्त ५१ जागा लढवित आहे. त्याचा फायदा सपा-बसपाला होईल. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्त्तीसगढ, पंजाब, उत्त्तराखंड जम्मू-काश्मीर आणि इशान्य भारतात चांगल्या जागा मिळतील अशी अपेक्षा आहे.अनेक राज्यांत मित्रपक्षांना सोडल्या जागामहाराष्ट्रात काँग्रेसने मजबूत आघाडी करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांना २३ जागा सोडल्या आहेत. कर्नाटक आणि केरळ या राज्यांत काँग्रेसने अधिक लक्ष घातले आहे. या राज्यांत काँग्रेसने अनुक्रमे ९ आणि ८ जागा गेल्या निवडणुकीत जिंकल्या होत्या. कर्नाटकात जेडीएससोबत आघडी करून मुख्यमंत्री पदावर पाणी सोडले. भाजपाला १८ जागांवरून खाली आणण्यासाठी हा त्याग राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेस-जेडीएस आघाडीला १६ ते १८ जागा मिळविण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. वायनाडची जागा लढवून राहुल गांधी केरळात काँग्रेसचा विस्तार करू इच्छित आहेत.