शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

दहशतवादाविरोधातील लढाई कोणत्याही धर्माविरुद्ध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 06:12 IST

दहशतवादाविरुद्धची लढाई ही कोणत्याही धर्माविरुद्ध नाही तर, तरुणांची दिशाभूल करणा-या मानसिकतेविरुद्ध आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : दहशतवादाविरुद्धची लढाई ही कोणत्याही धर्माविरुद्ध नाही तर, तरुणांची दिशाभूल करणा-या मानसिकतेविरुद्ध आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.जॉर्डनचे राजे अब्दुल्ला व्दितीय बिन अल हुसैन यांच्या उपस्थितीत इस्लामिक हेरिटेज या विषयावर एका समारंभात बोलताना मोदी म्हणाले की, आमचा वारसा, मूल्य याची अशी एक ताकद आहे ज्याच्या बळावर आम्ही हिंसा आणि दहशतवाद यासारखे आव्हाने पार करु शकतो. भारताला त्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अभिमान आहे. या देशात जगातील प्रत्येक धर्माला आणि विचारसरणीला आश्रय देऊन येथे आदराचे स्थान दिले आहे.गौतम बुद्धाच्या काळापासून भारताने जगाला शांतता व सलोख्याचा संदेश दिला आहे. आमचा असा प्रयत्न आहे की, सर्वांच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन चालावे. भारतात लोकशाही एक राजकीय व्यवस्था तर आहेच. पण, समानता, विविधता आणि सामंजस्य यांचा मूळ आधार आहे. मोदी यांच्या विचारांशी सहमती दाखवत जॉर्डनचे राजे अब्दुल्ला व्दितीय बिन अल हुसैन म्हणाले की, धर्म सर्वांवर प्रेम करायला शिकवितो. सर्व शेजाºयांना सोबत घेऊन चालायला शिकवितो. कट्टरपंथ चिंतेचा विषय आहे. तर, माणुसकी हेच जगाचे मूळ आहे.>चांगली मूल्ये रुजवावीदहशतवादाविरुद्धची लढाई ही उदारमतवादी आणि कट्टरपंथ यांच्यातील विचारांची आहे. तिरस्कार पसरविणारे विचार आम्हाला दाबून तरुणांमध्ये उदारमतवाद आणि चांगले मूल्ये रुजवावी लागतील.जगात शांतता नांदावी आणि सर्वेधर्मीय लोकात स्रेहपूर्ण संबंध वाढविणे ही आमची जबाबदारी आहे, असे राजे अब्दुल्ला व्दितीय बिन अल हुसैन म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी