शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

ताप पळाला, केजरीवाल लागले कामाला!

By admin | Updated: February 17, 2015 02:40 IST

गेल्या पाच दिवसांपासून असलेला ताप पळून गेला असल्याचे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी कार्यालयाचा पहिला दिवस कामात घालविला.

नवी दिल्ली : गेल्या पाच दिवसांपासून असलेला ताप पळून गेला असल्याचे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी कार्यालयाचा पहिला दिवस कामात घालविला.माझा ताप गेला आहे. आता खूप चांगले वाटत आहे. मी दैनंदिन योगा करीत माझ्या सकाळच्या कामांना प्रारंभ केला. निवडणुकीमुळे ते शक्य नव्हते, असे केजरीवाल यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. पाच दिवस तापाने फणफणत असतानाही केजरीवाल यांनी भेटीगाठी आणि आपले कार्यक्रम सुरूच ठेवले होते. मतमोजणीनंतर विजयोत्सव सुरू असताना ते मिरवणूक सोडून विश्रांतीसाठी घरी परतले होते. जनतेशी संवादात अडचणी निर्माण होत असल्याने केजरीवाल सुरक्षा स्वीकारण्याबाबत अनिच्छुक असले तरी त्यांच्या गरजेनुसार ती पुरविण्याची तयारी असल्याचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी म्हणाले.पत्रपरिषदेतून काढता पायकेजरीवाल सरकारने सोमवारी पत्रकारांची नाराजी ओढवून घेतली़ पहिल्यावहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती देण्यासाठी बोलविण्यात आलेल्या पत्रपरिषदेत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि पत्रकारांत खडाजंगी उडाली़ यानंतर सिसोदिया पत्रपरिषद सोडून निघून गेले़ आप सरकारने मीडियाला सचिवालयात जाण्यास मज्जाव केल्याचा आरोप पत्रकारांनी यानिमित्ताने केला़ पत्रकारांना सचिवालयाच्या आत जाण्यापासून रोखण्यात आले़ मंत्रिमंडळाची बैठक आटोपून बाहेर आलेले मनीष सिसोदिया यांच्याकडे पत्रकारांनी याबाबत तक्रार नोंदवली़ पत्रकारांनी सिसोदिया यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला़ मात्र सिसोदिया यांनी या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी तेथून काढता पाय घेतला़ (लोकमत न्यूज नेटवर्क)दरम्यान, आम आदमी पार्टीने पत्रकारांना सचिवालयात परवानगी नाकारल्याच्या मुद्यावर कानावर हात ठेवले़ हा निर्णय सचिवालयात आधीपासून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा होता़ पत्रकारांना माहिती देण्यासाठी वेळ आणि ठिकाण निश्चित करण्यात आले आहे़ मात्र याउपरही सरकार अधिकाऱ्यांशी चर्चा करून या मुद्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करेल, असे पक्षप्रवक्ते आतिशी मलेर्ना यांनी सांगितले़४अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पूर्ण सहकार्य द्या, असा आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिल्ली पोलिसांना दिला आहे. सांघिक सहकार्याचे वातावरण जपण्यासाठी पक्षभेद बाजूला सारत प्रत्येक राज्याला मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. सोमवारी दिल्ली पोलिसांच्या ६८ व्या स्थापना दिनाच्या पथसंचलन कार्यक्रमात ते बोलत होते.