शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या कोरोना संसर्गामुळे नव्या लाटेची भीती! डॉक्टर म्हणाले, "कोरोना संपला असे समजू नये"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 19:38 IST

Coronavirus Cases in India : आरोग्य तज्ज्ञांनी इशारा देत लोकांना कोरोनानुसार वागण्याचे आवाहन केले आहे. कोरोना संपला असे समजू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. 

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा (Coronavirus Cases in India) वेग पुन्हा वाढला आहे. गुरुवारी देशभरात कोरोनाचे 3 हजार रुग्ण आढळले. दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी इशारा देत लोकांना कोरोनानुसार वागण्याचे आवाहन केले आहे. कोरोना संपला असे समजू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. 

बंगळुरूमधील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ जेनेटिक्स अँड सोसायटीचे डॉ. राकेश मिश्रा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बातचीत केली. यावेळी कोरोना विषाणूशी संबंधित धोका अद्याप कमी झालेला नाही आणि लोकांनी या विषाणूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली पाहिजे. या विषाणूचा प्रभाव टाळण्यासाठी पुरेशी खबरदारी आणि पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे, असे डॉ. राकेश मिश्रा म्हणाले. तसेच, ते म्हणाले की, असे दिसून आले आहे की कोणत्याही क्षेत्रात प्रकरणे वाढत असतील तर तेथे नवीन प्रकार उपस्थित होण्याची शक्यता आहे. जरी आपण हे निश्चितपणे सांगू शकत नाही.

डॉ. राकेश मिश्रा यांनी सांगितले की, कोरोना टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह इतर खबरदारी घेणे. या सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्यास, तुम्ही पुन्हा या विषाणूला बळी पडण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळेही त्रास होऊ शकतो. मात्र, भारतात अद्ययावत आलेल्या कोरोनाच्या प्रकरणांमुळे घाबरून जाण्याची गरज नाही. परंतु नंतर आपल्याला पाळत ठेवण्याची यंत्रणा मजबूत करावी लागेल, ज्यामध्ये कोरोना चाचणी आणि जीनोम अनुक्रम पद्धतीचा समावेश आहे.

याचबरोबर, डॉ विकास मिश्रा म्हणाले की, आजच्या तारखेला समोर आलेली कोरोनाची प्रकरणे जुन्या आकडेवारीच्या तुलनेत खूपच कमी आहेत, परंतु याचा अर्थ आपण काळजी करू नये असा नाही. कारण कोरोना विषाणू कुठेही गेला नसून तो आपल्या अवतीभवती आहे. या विषाणूचे आणखी बरेच नवीन म्यूटेशन देखील बाहेर येऊ शकतात. त्यामुळे पुढचे काही महिने आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस