शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख विद्यार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती! कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 11:01 IST

आधार प्रमाणीकरण झाले ‘फेल’; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी

मुंबई : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, अद्याप ४ लाख २३ हजार विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण फेल ठरले आहे. त्यामुळे ते शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहेत.  महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने ‘लोकमत’ला दिलेल्या अहवालातून संबंधित विद्यार्थ्यांची संख्या समोर आली आहे. महाराष्ट्रात आधार प्रमाणीकरण फेल झालेल्या जिल्ह्यांमध्ये ठाणे (४३,७६८) सर्वांत वरच्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मुंबई, पुणे, पालघर, जळगाव, रायगड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे आधार फेल झाले आहेत. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा, वर्धा आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ६,००० पेक्षा कमी आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये ६,००० ते १०,००० दरम्यान विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण फेल झाले आहे.आधार प्रमाणीकरण झाले नसेल तर विद्यार्थ्यांची सांख्यिकी केंद्र शासनाच्या यूडायस ऑनलाइन प्रणालीत नोंद होत  नाही. केंद्र व राज्य सरकारच्या शैक्षणिक योजना व शिष्यवृत्तीसाठी आधार क्रमांक आणि त्याचे ओटीपी बायोमेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक असते. मात्र, आधाराविना विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचे  लाभ मिळू शकत नाही, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड अपूर्णप्रमाणीकरणाची प्रक्रिया न झाल्याने विद्यार्थ्यांचे  रेकॉर्ड अपूर्ण राहते. मुलांची डुप्लिकेट गणना टाळता येत नाही. तसेच पुढील शिक्षणात प्रवेशासाठी अनंत अडचणी येतात. आधार क्रमांकातील चूक, शाळा व आधारवरील माहितीमध्ये फरक, बँक खात्याशी लिंक नसणे व अपडेट न केलेला डेटा यामुळे व्हॅलिडेशन होत नाही, असेदेखील शिक्षकांनी सांगितले. 

जन्म दाखला आणि आधार अत्यंत आवश्यक आहे. आधार बँक खात्याला जोडलेले असले तरच विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो. अन्यथा लाभ मिळू शकत नाही.  - तानाजी माने, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना

टॅग्स :Studentविद्यार्थीAdhar Cardआधार कार्ड