शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख विद्यार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती! कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 11:01 IST

आधार प्रमाणीकरण झाले ‘फेल’; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी

मुंबई : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, अद्याप ४ लाख २३ हजार विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण फेल ठरले आहे. त्यामुळे ते शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहेत.  महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने ‘लोकमत’ला दिलेल्या अहवालातून संबंधित विद्यार्थ्यांची संख्या समोर आली आहे. महाराष्ट्रात आधार प्रमाणीकरण फेल झालेल्या जिल्ह्यांमध्ये ठाणे (४३,७६८) सर्वांत वरच्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मुंबई, पुणे, पालघर, जळगाव, रायगड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे आधार फेल झाले आहेत. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा, वर्धा आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ६,००० पेक्षा कमी आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये ६,००० ते १०,००० दरम्यान विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण फेल झाले आहे.आधार प्रमाणीकरण झाले नसेल तर विद्यार्थ्यांची सांख्यिकी केंद्र शासनाच्या यूडायस ऑनलाइन प्रणालीत नोंद होत  नाही. केंद्र व राज्य सरकारच्या शैक्षणिक योजना व शिष्यवृत्तीसाठी आधार क्रमांक आणि त्याचे ओटीपी बायोमेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक असते. मात्र, आधाराविना विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचे  लाभ मिळू शकत नाही, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड अपूर्णप्रमाणीकरणाची प्रक्रिया न झाल्याने विद्यार्थ्यांचे  रेकॉर्ड अपूर्ण राहते. मुलांची डुप्लिकेट गणना टाळता येत नाही. तसेच पुढील शिक्षणात प्रवेशासाठी अनंत अडचणी येतात. आधार क्रमांकातील चूक, शाळा व आधारवरील माहितीमध्ये फरक, बँक खात्याशी लिंक नसणे व अपडेट न केलेला डेटा यामुळे व्हॅलिडेशन होत नाही, असेदेखील शिक्षकांनी सांगितले. 

जन्म दाखला आणि आधार अत्यंत आवश्यक आहे. आधार बँक खात्याला जोडलेले असले तरच विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो. अन्यथा लाभ मिळू शकत नाही.  - तानाजी माने, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना

टॅग्स :Studentविद्यार्थीAdhar Cardआधार कार्ड